शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

'अ‍ॅनिमियामुक्त' भारतासाठी शासनाच्या आठ विभागांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 16:35 IST

१ ते ३० सप्टेंबर दरम्यान पोषण महिना साजरा करण्यात येत असून पोषणाविषयी जनजागृती करण्यासाठी शासनाच्या आठ विभागांनी पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागाच्यावतीने राज्यात पोषण अभियान राबविण्यात येत आहे. विविध कार्यक्रम, स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.

- हर्षनंदन वाघ

बुलडाणा : अ‍ॅनिमिया म्हणजे रक्ताक्षय मुक्त भारतासाठी केंद्र शासनाच्या महिला व बाल मंत्रालयाअंतर्गंत आरोग्य विभागाच्यावतीने राज्यात पोषण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातर्गंत १ ते ३० सप्टेंबर दरम्यान पोषण महिना साजरा करण्यात येत असून पोषणाविषयी जनजागृती करण्यासाठी शासनाच्या आठ विभागांनी पुढाकार घेतला आहे.अ‍ॅनिमिया म्हणजे रक्ताक्षय हा आजार स्त्री, पुरुष असा दोघांनाही होतो. पण यामध्ये पुरुषांचं प्रमाण कमी आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेतर्फे दरवर्षी विविध निकषांच्या आधारे आरोग्यासंबंधी आकडेवारी जाहीर केली जाते. ६ महिने ते ५ वर्ष या वयोगटातील लहान मुलांमध्ये अ‍ॅनिमिया असण्याचं प्रमाण ग्रामीण भागात ५४.० टक्के तर शहरी भागात ५३.६ टक्के आहे. १५-४९ वयोगटातील सर्व महिलांमध्ये ग्रामीण भागातील प्रमाण ४७.८ टक्के तर शहरी भागात ४८.२ टक्के आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या महिला व बाल मंत्रालयातर्फे अ‍ॅनिमिया मुक्त भारतासाठी पोषण अभियान कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाअतर्गंत राज्य शासनाने विविध आठ विभागाच्या सहकार्याने १ ते ३० सप्टेंबर दरम्यान पोषण महिना साजरा करण्यात येत आहे. या महिन्यात महिलांच्या आरोग्यविषयी काळजी घेवून विविध कार्यक्रम, स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.याबाबत करण्यात येते जनजागृतीपोषण महिन्यात गरोदर महिलांची काळजी, प्रसुतीनंतर बालकाला तात्काळ व सहा महिने निव्वळ स्तनपान, वयाचे सहा महिने पूर्ण झालेल्या बालकाला वरचा आहार, बालके, महिला व किशोरवयीन मुली यामधील रक्तक्षयावर उपचार, बालकांमध्ये वृध्दी सनियंत्रण, मुलींचे शिक्षण, पोषण आहार व विवाहाचे वय, वैयक्तीक व परिसर स्वच्छता, आरोग्यदायी व सुक्ष्म पोषणमुल्य असलेल्या आहाराचे सेवन याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.प्रशासनाच्या या आठ विभागाचा सक्रीय सहभागपोषण महिन्यात राबविण्यात येणारे विविध उपक्रम केवळ कार्यक्रम न राहता जन आंदोलन तसेच लोकव्यापी चळवळ व्हावी म्हणून प्रशासनाच्या महिला व बाल विकास विभाग, ग्राम बाल विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, आदिवासी विकास विभाग, शालेय शिक्षण विभाग, युवक कल्याण व माहिती व प्रसिध्दी विभाग यांच्या समन्वयातून जनजागृती करण्यात येत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना