शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

आरक्षणासाठी १० हजार रक्तांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 16:08 IST

आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर रक्त सांडण्यापेक्षा आरक्षणाच्या मागणीच्या भावना शासनापर्यंत पोहचविण्यासाठी रक्तांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात आली.

ठळक मुद्देरस्त्यावर रक्त सांडण्यापेक्षा भावना पोहचविण्यासाठी रक्ताच्या सह्यांची मोहीम- सावजी यासाठी मराठा, मुस्लीम, धनगर, लिंगायत, महादेव कोळी यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले.या उपक्रमाची दखल राज्यस्तरावर घेण्यात येईल, अशी अपेक्षा यावेळी सुबोध सावजी यांनी व्यक्त केली.

बुलडाणा : मराठा आरक्षणाला आमचा पाठींबा असून मराठा समाजासह मुस्लीम, धनगर, लिंगायत व महादेव काळी या समाजाला त्वरित आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर रक्त सांडण्यापेक्षा आरक्षणाच्या मागणीच्या भावना शासनापर्यंत पोहचविण्यासाठी रक्तांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात आली. या रक्तांच्या सह्यांचे निवेदन ७ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे.

या मोहीमेस सर्वधर्मातील व्यक्ती, राजकीय पक्षाच्या पधाधिकाºयांनी पाठींबा दिल्याची माहिती माजी राज्यमंत्री सुबोध सावजी स्थानिक विश्राम भवनात ७ आॅगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शाम उमाळकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रिजवान सौदागर, समिती संपर्क प्रमुख शैलेश सावजी आदींची उपस्थिती होती. सावजी पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात मराठा समाजासह मुस्लीम, धनगर, लिंगायत व महादेव काळी या समाजाला त्वरित आरक्षण मिळावे, अशी मागणी आहे. आरक्षण मिळण्यासाठी अनेक ठिकाणी मोर्चे, आंदोलने काढण्यात येत आहेत. काही ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडत आहेत. मात्र हिंसाचाराने काहीही साध्य होत नाही. त्यामुळे रस्त्यावर रक्त सांडते. मात्र आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर रक्त न सांडता आरक्षण मागणीच्या तिव्र भावना शासनापर्यंत पोहचविण्यासाठी १० हजार रक्ताने लिहिलेल्या सह्याची मोहीम १ ते ७ आॅगस्ट रोजी राबविण्यात आली. या रक्तांच्या सह्यांचे निवेदन ७ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे. यासाठी मराठा, मुस्लीम, धनगर, लिंगायत, महादेव कोळी यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले. त्यात काँग्रेसचे आमदार राहूल बोंद्रे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, शाम उमाळकर, माजी जि.प.अध्यक्ष प्रकाश पाटील, रिजवान सौदागर, बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष वा.रा.पिसे, शैलेश सावजी, अबरार मिल्ली, समितीचे सहसचिव सुनिता भांड, दामुअण्णा ढोणे, अविनाश अकोटकार, चंद्रकांत माने, जगन्नाथ भांड, संजय तारापुरे, खुशालराव गायकवाड आदींनी सहभाग घेत १० हजार रक्तांच्या सह्यांची मोहीम राबविली. या १० हजार रक्तांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार असून या उपक्रमाची दखल राज्यस्तरावर घेण्यात येईल, अशी अपेक्षा यावेळी सुबोध सावजी यांनी व्यक्त केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSubodh Savjiसुबोध सावजी