शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

सातपुड्यात यशस्वी होतोय अद्रक शेतीचा प्रयोग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 13:20 IST

खामगाव: बुलडाणा जिल्ह्यात घाटाखाली जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अद्रक शेतीचा प्रयोग यशस्वी होताना दिसतोय. सध्या भावात तेजी असल्याने यावर्षी अद्रक उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे दिसून येत आहे.

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: बुलडाणा जिल्ह्यात घाटाखाली जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अद्रक शेतीचा प्रयोग यशस्वी होताना दिसतोय. सध्या भावात तेजी असल्याने यावर्षी अद्रक उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे दिसून येत आहे.बुलडाणा जिल्ह्यात तसे अद्रक उत्पादन घेणाऱ्यांची संख्या फार नाही. सामान्य शेतकºयांना न झेपावणारा उत्पादन खर्च, पाण्याची कमरता व अद्रकासाठी उपयुक्त जमिन अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. परंतु तरीही काही शेतकरी त्यांच्या शेतात नवनविन प्रयोग करून उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न करतात. बुलडाणा जिल्ह्यात दरवर्षी साधारणपणे १०० एकरावर अद्रक लागवड केली जाते. घाटावर देऊळगावराजा व घाटाखाली जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात हे प्रमाण जास्त आहे. अद्रक हे जास्त कालावधीचे पिक असल्याने व उत्पादन खर्च अधिक असल्याने याकडे शेतकºयांचा कल कमी असल्याचे दिसून येते. परंतु ज्या शेतकऱ्यांनी अद्रक शेतीत सातत्य टिकवून ठेवले त्यांच्यासाठी सध्याचा काळ म्हणजे ‘सोन्याचे दिवस’ असेच चित्र आहे. सध्या ठोक बाजारात अद्रकाचे भाव ५० ते ६० हजार रूपये क्विंटलवर येऊन पोहचेले आहेत. त्यामुळे अद्रक उत्पादनातून शेतकºयांची घडी सावरताना दिसतेय. सध्या अद्रक शेतीतून एकरी १२५ ते १५० क्विंटल उत्पादन होत आहे. सध्याचे भाव पाहता एकरी ७  ते ८ लाख रूपयांचे अद्रक शेतकरी घेत आहेत. उत्पादन खर्च एकरी १ ते दीड लाख रूपयांच्या घरात आहे. त्यामुळे सध्या शेतकºयांना साधारपणपणे ५ ते ७ लाख रूपये निव्वळ नफा उरत असल्याचे दिसून येते. अद्रक विक्री करण्याकरीता बुलडाणा तसेच अकोला येथेही मोठी बाजारपेठ नसल्याने शेतकरी जळगाव खान्देश येथे अद्रकाची विक्री करतात.

मालाची आवक घटल्याने वाढले भाव!महाराष्ट्रात केरळमधूनही अद्रक मोठ्या प्रमाणावर येते. परंतु सरत्या वर्षात केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अद्रक शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. विदर्भात पावसाळाच झाला नसल्याने येथीलही उत्पादन घटले. परिणामी मागील वर्षी २ ते ३ हजार रूपये प्रतिक्विंटल असलेले  भाव वाढत जावून सध्या ५० ते ६० हजार रूपयांवर जावून पोहचले आहेत. किरकोळ बाजारात तर २०० रूपये किलोने ग्राहकांना अद्रक खरेदी करावे लागत आहे.

पिकासाठी लागतो सर्वाधिक कालावधी!अद्रक शेती न करण्यामागचे एक महत्वाचे कारण म्हणजे या पिकासाठी १० ते ११ महिन्यांचा कालावधी लागतो. म्हणजे साधारणपणे एक वर्षच यात निघून जाते. शेवटी योग्य भाव मिळाला नाही, तर केवळ उत्पादनखर्चच निघतो. परंतु अशाही परिस्थीतीत सातत्य टिकवून ठेवणाºया शेतकºयांसाठी २०१९ हे वर्ष आशेचा किरण घेवून आले आहे.

 

गेल्या चार ते पाच वर्षांपासून अद्रक शेती करीत आहे. दरवर्षीच चांगले भाव राहतात, असे नाही. परंतु यावर्षी मात्र भावात तेजी असल्यामुळे  अद्रक उत्पादनात सातत्य ठेवल्याचे समाधान वाटते.देविदास वानखडे, अद्रक उत्पादक शेतकरीलहूगाव (भगतपुरा) ता.संग्रामपूर

 

अद्रक उत्पादनासाठी भेगा न पडणारी व गाळाची जमिन आवश्यक आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशी जमिन आहे. परंतु  अद्रक उत्पादन घेणाºया शेतकºयांची संख्या मोठी नाही. यावर्षी भावात तेजी असल्याने नवनविन प्रयोग करू पाहणाºया शेतकºयांसमोर आशेचा किरण निर्माण झाला आहे.डॉ.अनिल गाभणेशास्त्रज्ञ,  कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद

टॅग्स :khamgaonखामगावSangrampurसंग्रामपूरagricultureशेतीFarmerशेतकरी