शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

निधी उपलब्ध, पण गाळ काढण्याची मोहीम थंड

By admin | Published: April 20, 2015 10:38 PM

गाळ काढण्याला चालना नाही; एसडीओंनी लक्ष देण्याची गरज.

बुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानाच्या अंतर्गत महात्मा फुले जलभूमी अभियानातून विविध प्रकल्प व तलावांमधील गाळ काढण्यासाठी प्राधान्य देण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. या कामासाठी जेसीबी, पोकलंडसह निधीही उपलब्ध करून दिला व सदर निधी प्रत्येक तालुकास्तरावर तसेच विविध शासकीय यंत्रणांकडे सुपूर्दही केला आहे; मात्र प्रशासनाच्या उदासिनतेमुळे गाळ काढण्याची मोहीम संपूर्ण जिल्हाभरात थंड बस्त्यात आहे. जलयुक्त शिवार अभियानात जलसंधारणाच्या कामांमध्ये प्रामुख्याने गावतलाव, पाझर तलाव, सिंचन तलाव, साठवण तलाव, शिवकालीन तलाव, ब्रिटिशकालीन तलाव व निजामकालीन तलावांमधील साचलेला गाळ काढण्याच्या कामांचे नियोजन केले आहे. गाळ काढून खोलीकरणासह तळी स्वच्छ करण्याच्या कामांना प्राधान्य दिले जावे व पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे पुर्णत्वास यावी, असे नियोजन आहे. कृषी विभाग, उपवनसंरक्षक, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग व जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागांना गाळ काढण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी सर्व यंत्रणांना तब्बल १ कोटी ५७ लाख ५९ हजाराचा निधी वितरीत करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र या निधीचा विनियोग करण्यात आलेला नाही. त्यामुळे यासंदर्भात वेळेची र्मयादा ठरविण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हाभरात कुठेही गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली नसल्याने जलयुक्त शिवार अभियानातील या महत्त्वाच्या कामाकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी २५ मार्च रोजी सर्व यंत्रणांना पत्र पाठवून गाळ काढण्याची मोहीम तातडीने हाती घेण्याच्या सूचना केल्या होत्या तसेच उपविभागीय अधिकारी यांना हे अभियान ग ितमान होईल, या दृष्टीने तत्काळ पुढाकार घेण्याचेही निर्देश दिले होते. प्रत्यक्षात मात्र जिल्हाभरात कुठेही गाळ काढण्याचे काम सुरू झालेले नाही.