शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

चतुर्थ श्रेणीसाठी कोतवालांचा ५० वर्षापासून संघर्ष; शासनस्तरावर प्रस्ताव प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 17:25 IST

बुलडाणा : चतुर्थ श्रेणी द्यावी, तलाठी व तत्सम पदासाठी २५ टक्के पदोन्नती मिळावी आदी मागण्यांसाठी राज्यातील जवळपास १२ हजार ६३७ कोतवालांचा मागिल ५० वर्षापासून संघर्ष सुरू आहे.

ठळक मुद्देराज्यातील १२ हजार ६३७ कोतवालास आज रोजी ५ हजार १० रूपये मानधन देण्यात येत आहे. पेन्शन, वारसांना सेवेत संधी, समान वेतन, वाळू तस्कराकडून मारहाण झाल्यास कठोर कायदा करणे आदी मागण्या प्रलंबित आहेत.

- हर्षनंदन वाघ 

बुलडाणा : चतुर्थ श्रेणी द्यावी, तलाठी व तत्सम पदासाठी २५ टक्के पदोन्नती मिळावी आदी मागण्यांसाठी राज्यातील जवळपास १२ हजार ६३७ कोतवालांचा मागिल ५० वर्षापासून संघर्ष सुरू आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित असल्याने कोतवाल समस्यांच्या गर्तेत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या सातबारासह गावातील निवडणूक, नैसर्गिक आपत्ती आदीसह महसूल विभागाच्या कामात नेहमी २४ तास मदत करण्याचे काम करणाऱ्या राज्यातील १२ हजार ६३७ कोतवालास आज रोजी ५ हजार १० रूपये मानधन देण्यात येत आहे. मात्र मागिल ५० वर्षापासून चतुर्थ श्रेणीची मागणी प्रलंबित आहे. याबाबत आतापर्यंत बेमुदत धरणे, विविध प्रकारची आंदोलने, संप, उपोषणे तसेच वर्धा, नाशिक व मुंबई पायी सत्याग्रह करण्यात आला. मात्र कोलवालांच्या चतुर्थ श्रेणीच्या मागणीसह तलाठी व तत्सम पदासाठी २५ टक्के पदोन्नती, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन, वारसांना सेवेत संधी, समान वेतन, वाळू तस्कराकडून मारहाण झाल्यास कठोर कायदा करणे आदी मागण्या प्रलंबित आहेत. याबाबत ८ मार्च २०१६ रोजी आंदोलनादरम्यान महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी एका महिन्यात प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत २८ डिसेंबर २०१६ रोजी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होवून एकछत्री योजना तयार करण्यासाठी अप्पर मुख्य वित्त सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीस्थापन करून एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र याबाबत तीन महिन्यांनी शासननिर्णयान्वये अहवाल सादर झाल्यानंतरही कोणतीही निर्णय न झाल्याने पुन्हा २३ आॅगस्ट २०१७ रोजी परत मंत्रिमंडळात निर्णय करून ३० आॅगस्ट २०१७ पर्यंत समितीस अहवाल सादर करण्यास एक महिना मुदतवाढ देण्यात आली. मात्र आजपर्यंत या समितीचा अहवाल सादर करण्यात आला नाही. त्यामुळे आपल्या विविध मागण्यांपासून राज्यातील कोतवाल वंचित आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagitationआंदोलन