शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

चारा छावण्यांचे प्रस्ताव अडकले लालफितशाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 16:06 IST

खामगाव : दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यात सगळीकडेच चारा टंचाई निर्माण झालेली असताना, अद्याप कुठेही चारा छावण्या उभारण्यात आलेल्या नाहीत.

ठळक मुद्देजिल्हयातील २० गावांकडून चारा छावणीची मागणी करण्यात आली होती.प्रशासनाच्या वतीने स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्तावही मागविण्यात आले. अद्याप यावर कुठलाही ठोस निर्णय झाला नाही.

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यात सगळीकडेच चारा टंचाई निर्माण झालेली असताना, अद्याप कुठेही चारा छावण्या उभारण्यात आलेल्या नाहीत. जिल्हयातील २० गावांकडून चारा छावणीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार प्रशासनाच्या वतीने स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्तावही मागविण्यात आले, मात्र हे प्रस्ताव लालफितशाहीत अडकले आहेत. अद्याप यावर कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे पशुपालकांसमोर चाऱ्याचा प्रश्न कायम आहे.जिल्हयात यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. मार्च महिन्यातच पशुपालकांसमोर चारअया पाण्याचा जिल्ह्यात १०, ७२, ९३७ एवेढे पशुधन आहे. यात लहान पशुधन ६४, ४३७, मोठे पशुधन ५, ९५, ५४९ तर ४, १२, ९५१ शेळ्या-मेंढ्यांचा समावेश आहे. त्यानुसार प्रतिदिन १४,०१४ मेट्रीक टन चाºयाची आवश्यकता आहे. यानुसार प्रतिमहा १, २०, ४३१ मेट्रिक टन चारा लागतो. माहे मार्च ते जून २०१९ पर्यंत ४, ८१, ७२४ मेट्रिक टन चाºयाची आवश्यकता, ३,७०, १७३ मेट्रिक टन चाºयाची उपलब्धता, त्यानुसार १, ११, ५५१ मेट्रिक टन चाºयाची तूट. तूट भरून काढण्यासाठी विविध योजनांद्वारे बियाण्यांचे वाटप व यातून १, ८१, ३३० मेट्रिक टन एवढ्या हिरव्या चाºयाचे उत्पादन असे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले होते. ३६,२६६ मेट्रिक टन वाळलेल्या चाºयाचे उत्पादनही गृहीत धरण्यात आले होते.गत रब्बी हंगामात जिल्ह्यात १ लाख ४२ हजार हेक्टरवर रब्बीचा झालेला पेरा व यातून ८५, ८१० मेट्रिक टन वाळलेला चारा उपलब्ध होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. अशा परिस्थितीत चाºयाची तूट भरून काढण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमधून १, २२, ००० मेट्रिक टन चारा उत्पादनाची अपेक्षाही जिल्हा प्रशासनाने केली होती. करण्यात आलेल्या नियोजनानुसार जूनपर्यंत चारा टंचाई भासणार नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. परंतु यावर्षीची पाणीपरिस्थिती पाहता, सध्या सगळीकडेच चाराटंचाई निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे. दरम्यान चाराटंचाईचा संभाव्य आराखडाही तयार करण्यात आला. परंतु पशुपालकांना अद्याप त्याचा लाभ झाला नसल्याचे दिसून येत आहे.यामुळे जनावरांचे हाल होत असून लवकरात लवकर चारा छावण्या सुरू कराव्या, अशी मागणी पशुपालक शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.

या गावांमधून झाली चारा छावणीची मागणी!चारा छावण्या सुरू करण्यासाठी सर्वप्रथम तशी मागणी करणे अभिप्रेत आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत बुलडाणा तालुक्यात मासरूळ, चिखली तालुक्यात धोत्रा, मंगरूळ, आमखेड, सिंदखेडराजा तालुक्यात शिवणी टाका, लोणार तालुक्यात मांडवा, खामगाव तालुक्यात पारखेड, आमसरी, उमरा अटाळी व शिराळा, नांदुरा तालुक्यात महाळुंगी, वळती, मोताळा तालुक्यात माळेगाव, मलकापूर तालुक्यात दाताळा, पान्हेरा, वाघुड, शेगाव तालुक्यात वरूड, लासुरा, जळगाव जामोद तालुक्यात जामोद, संग्रामपूर तालुक्यात टूनकी याप्रमाणे एकुण २१ चारा छावण्यांची मागणी करण्यात आली आहे. छावण्यांमध्ये ६३ हजार जनावरांसाठी १८९० लक्ष रूपये प्रति महिना याप्रमाणे खर्च येणार आहे. दरम्यान, चारा छावण्या सुरू करण्यासाठी तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे. परंतु अद्याप यावर निर्णय झाला नसल्याचे दिसून येत आहे.

चारा छावण्यांबाबतचे नियोजन तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे. यावर लवकर निर्णय घेण्यात येणार आहे.-डॉ.एन.एच.बोहरासहा.आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, बुलडाणा.

सध्या तीव्र चाराटंचाई निर्माण झाली आहे. डोंगराळ भागातील परिस्थिती अत्यंत कठीण आहे. जनावरांना चारा नसल्याने चराईसाठी केवळ जनावरांना फिरवून आणावे लागत आहे.-रामदास कोकाटे, शेतकरी, वझर, ता.खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा