शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या गाठी घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग; २० टन माल जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 14:02 IST

 बुलडाणा : कापसाच्या गाठी घेऊन जाणाºया ट्रकला अचानक आग लागल्याने २० टन माल जळून खाक झाल्याची घटना बुधवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास राजूर घाटात घडली.

 बुलडाणा : कापसाच्या गाठी घेऊन जाणाºया ट्रकला अचानक आग लागल्याने २० टन माल जळून खाक झाल्याची घटना बुधवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास राजूर घाटात घडली. आगीत ट्रकचेही मोठे नुकसान झाले. सुदैवाने कुठलीच जीवीतहानी झाली नाही. मध्यप्रदेशमधील डेलची (ता. महेदपूर जि. उज्जैन) येथील ट्रक चालक राधाकिसन चौहान (वय ३२) व क्लिनर वरदीराम सुर्यवंशी (वय ३०) हे दोघे बीड जिल्ह्यातील सोनपेठ येथून कापसाच्या गाठी घेऊन मध्यप्रदेशातील मेहतवाडा येत जात होते. बुधवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास बुलडाणा नजीकच्या राजूर घाटात   आर-जे-जीसी-५३१७ क्रमांकाच्या ट्रकमधील कापसाच्या गाठींना अचानक आग लागली. पाठीमागून येणाºया वाहन चालकाने ही बाब ट्रक चालकास सांगितली. त्यामुळे त्याने रस्त्याच्या बाजूला वाहन थांबवले. परंतू एवढ्या रात्री आग विझविण्याचे कुठलेच साधन उपलब्ध नसल्याने आग वाढतच गेली. आगीमुळे ट्रकचे टायर फुटल्याने ट्रक डाव्या बाजूने उलटला. ट्रक चालकाने मोबाईलद्वारे घटनेची माहिती ट्रक मालकास दिली. मालकाने नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाचा नंबर मिळवत त्यांना कळविले. अग्निशामक विभागाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले व कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत ट्रकमधील कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या. आगीत ट्रकचेही मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोलिस उपनिरीक्षक अमित जाधव यांनी दुपारी अग्निशामक विभागाला फोन करुन पुन्हा घटनास्थळी बोलावले. पेटलेल्या कापसाच्या गाठी पूर्णपणे विझविण्यात आल्या. वृत्त लिहेपर्यंत अग्निशामक विभाग व पोलिसांची कारवाई सुरु होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाfireआग