शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

कापसाच्या गाठी घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग; २० टन माल जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 14:02 IST

 बुलडाणा : कापसाच्या गाठी घेऊन जाणाºया ट्रकला अचानक आग लागल्याने २० टन माल जळून खाक झाल्याची घटना बुधवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास राजूर घाटात घडली.

 बुलडाणा : कापसाच्या गाठी घेऊन जाणाºया ट्रकला अचानक आग लागल्याने २० टन माल जळून खाक झाल्याची घटना बुधवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास राजूर घाटात घडली. आगीत ट्रकचेही मोठे नुकसान झाले. सुदैवाने कुठलीच जीवीतहानी झाली नाही. मध्यप्रदेशमधील डेलची (ता. महेदपूर जि. उज्जैन) येथील ट्रक चालक राधाकिसन चौहान (वय ३२) व क्लिनर वरदीराम सुर्यवंशी (वय ३०) हे दोघे बीड जिल्ह्यातील सोनपेठ येथून कापसाच्या गाठी घेऊन मध्यप्रदेशातील मेहतवाडा येत जात होते. बुधवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास बुलडाणा नजीकच्या राजूर घाटात   आर-जे-जीसी-५३१७ क्रमांकाच्या ट्रकमधील कापसाच्या गाठींना अचानक आग लागली. पाठीमागून येणाºया वाहन चालकाने ही बाब ट्रक चालकास सांगितली. त्यामुळे त्याने रस्त्याच्या बाजूला वाहन थांबवले. परंतू एवढ्या रात्री आग विझविण्याचे कुठलेच साधन उपलब्ध नसल्याने आग वाढतच गेली. आगीमुळे ट्रकचे टायर फुटल्याने ट्रक डाव्या बाजूने उलटला. ट्रक चालकाने मोबाईलद्वारे घटनेची माहिती ट्रक मालकास दिली. मालकाने नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाचा नंबर मिळवत त्यांना कळविले. अग्निशामक विभागाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले व कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत ट्रकमधील कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या. आगीत ट्रकचेही मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोलिस उपनिरीक्षक अमित जाधव यांनी दुपारी अग्निशामक विभागाला फोन करुन पुन्हा घटनास्थळी बोलावले. पेटलेल्या कापसाच्या गाठी पूर्णपणे विझविण्यात आल्या. वृत्त लिहेपर्यंत अग्निशामक विभाग व पोलिसांची कारवाई सुरु होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाfireआग