शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात वणवा पेटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 01:06 IST

बुलडाणा: जिल्ह्याचे वैभव असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात शुक्रवारी दुपारी पेटलेल्या वणव्यामुळे अभयारण्यातील हजारो हेक्टरवरील वनसंपदा नष्ट झाली आहे. या वणव्यामुळे अभयारण्यातील जैवविविधतेलाही मोठा फटका बसला आहे.

ठळक मुद्देतीन बिटमध्ये विस्तारली आगहजारो हेक्टरवरील वनसंपदा नष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्याचे वैभव असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात शुक्रवारी दुपारी पेटलेल्या वणव्यामुळे अभयारण्यातील हजारो हेक्टरवरील वनसंपदा नष्ट झाली आहे. या वणव्यामुळे अभयारण्यातील जैवविविधतेलाही मोठा फटका बसला आहे.शुक्रवारी खामगाव रेंजमधील पलढग बिटमध्ये हा वणवा पेटला. तो विझविण्यासाठी प्रयत्न झाले; पण तो आटोक्यात आला नाही. उलट तो आणखी वाढतच गेला. रात्रभर ज्ञानगंगा अभयारण्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. पहाटेच्या वाºयामुळे वणवा अधिकच भडकला असून, सध्या पलढग, उत्तर देव्हारी व बोरखेड या तीन बिटमधील वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. ही आग आटोक्यात आणणे अवघड होऊन बसले आहे.ज्ञानगंगा अभयारण्य हे २०४ चौरस किमी विस्तारलेले असून, बुलडाणा, चिखली, मोताळा आणि खामगाव तालुक्याच्या सीमावर्ती भागात व्यापलेले आहे. प्रामुख्याने बिबट व मोठ्या संख्येने असलेल्या अस्वलांसाठी ज्ञानगंगा अभयारण्य प्रसिद्ध आहे. सध्या या वणव्याने बुलडाणा, खामगाव  व मोताळा या तीन तालुक्यांच्या सीमावर्ती भागातील पलढग, बोरखेड व उत्तर देव्हारी या तीन बिटमध्ये रौद्र रूप धारण केले आहे. अलीकडे ज्ञानगंगा अभयारण्यात लागलेली ही १५ वी आग आहे.आग आटोक्यात  आणण्याच्या अपुºया साधनांमुळे ज्ञानगंगा अभयारण्याचे सातत्याने नुकसान होत असून, जंगलाची घनताही कमी झाली आहे. सातत्याने होत असलेली ही हानी रोखण्याकरिता नेमक्या उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. वन्यजीव विभागाकडे काही प्रमाणात अग्निरोधक साधने उपलब्ध असली तरी, त्यांचा परिणामकारक उपयोग केला जात नसल्याची माहीती आहे. दरवर्षी ज्ञानगंगा अभयारण्याला आगी लागण्याच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. 

पलढग बिटची मोठी हानी!पलढग बिटमध्ये प्रथमत: आग लागली होती. ती भडकत गेली व अन्य भागात पसरली. त्यामुळे पलढग बिटमधील वनसंपदेचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अग्निरक्षक व वन विभागाचे कर्मचारी ही आग विझविण्यासाठी प्रयत्नरत असले तरी मनुष्यबळाचा येथे मोठा अभाव असल्याचे चित्र आहे. या आगीत पलढग बिट जवळपास ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात नुकसानग्रस्त झाल्याचे बोलल्या जात आहे; मात्र त्यास अधिकृत स्तरावर दुजोरा मिळू शकला नाही. याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी वन्यजीवचे बुलडाणा रेंजचे आरएफओ मयूर सुरवशे व खामगाव रेंजचे आरएफओ यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकले नाही. अकोला येथील वन्यजीवचे डीएफओ मनोजकुमार खैरनार यांच्याशीही संपर्क साधला असता, त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाdnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्य