शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

अखेर १८ गावांतील पथदिवे झाले सुरू - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:32 IST

अमडापूर : येथून जवळच असलेल्या उंद्री सर्कलमधील १८ गावांतील वीज बिले न भरल्याने पथदिवे महावितरणने बंद केले होते. ...

अमडापूर : येथून जवळच असलेल्या उंद्री सर्कलमधील १८ गावांतील वीज बिले न भरल्याने पथदिवे महावितरणने बंद केले होते. त्यावर प्रदेश काँग्रेस अनु. जाती विभाग नेते व उंद्री ग्रा.पं. सरपंच भाई प्रदीप अंभोरे यांनी महावितरण कंपनीकडे पथदिवे सुरू करण्याची मागणी केली होती, तसेच आंदाेलनाचा इशारा दिला हाेता. त्यांच्या निवेदनाची दखल घेत महावितरणने १२ एप्रिल राेजी १८ गावातील बंद पथदिवे सुरू केले आहेत.

या महिन्यांमध्ये विविध महापुरुषांच्या जयंत्या, रामनवमी, गुढीपाडवा, रमजान, असे धार्मिक सण आहेत. आधीच कोरोनामुळे सण, उत्सवांवर विरजण पडले आहे. यातच महावितरण कंपनीने वीज देयक थकीत असल्याने उंद्री सर्कलमधील अठरा गावांतील ग्रामपंचायतीचे पथदिवे बंद केले होते. सदर पथदिवे सुरू करण्यासाठी भाई प्रदीप अंभोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत आदींसह महावितरण कंपनी बुलडाणा यांच्याकडे निवेदन दिले हाेते, तसेच मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा दिला हाेता. हे पथदिवे सुरू करण्यासाठी उपअभियंता चिखली भुसारी व कनिष्ठ अभियंता जाधव यांना वरिष्ठ अभियंत्यांनी दिलेल्या आदेशानुसार उंद्री वैरागडसह १८ गावांतील पथदिवे सुरू केले. यावेळी शिवाजी पाटील, राम नसवाले, आकाश राऊत, पत्रकार वसंत सिरसाठ आदी उपस्थित हाेते.