शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

दुष्काळ मुक्तीसाठी झटण्याची जबाबदारी प्रत्येकाचीच - चिन्मय फुटाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 19:25 IST

- अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर विदर्भातही दुष्काळाची भीषण दाहकता आहे. व्यवस्थापना ...

- अनिल गवई।

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर विदर्भातही दुष्काळाची भीषण दाहकता आहे. व्यवस्थापना अभावी विदर्भातील अनेक खेड्यात जलसंकट निर्माण झाले. जलसंकटावर मात करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. मात्र, भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी प्रत्येकानेच दुष्काळाशी दोन हात करण्यात मदत करणे गरजेचे आहे. पाणी फाउंडेशनचे विदर्भ समन्वयक चिन्मय फुटाणे यांच्याशी साधलेला संवाद...

पाणी फाउंडेशनच्या कार्याला कधीपासून सुरूवात झाली? राज्यातील दुष्काळाची भीषण परिस्थिीती बघता सिने अभिनेते अमिरखान आणि त्यांच्या पत्नी किरण राव यांनी पाच वर्षांपूर्वी ‘पाणी फाउंडेशन’ची स्थापना केली. आता श्रमदानातून हळूहळू ही चळवळ विदर्भातील कानाकोपºयात बळकट होतेय. अगदी बुलडाणा जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातही ‘पाणी फाउंडेशन’तंर्गत जलसंवर्धन आणि पाणलोट व्यवस्थापन केल्या जातेय.

वाटर कप स्पर्धेत सहभागी गावांच्या निवडीचे निकष काय?

जलसंवर्धन व पाणलोट व्यवस्थानाची उत्तम कामगिरी करणाºयासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये स्पर्धा लावली जाते. या गावांची विदर्भ, जिल्हा स्तरावर पाहणी केली जाते. पाहणीत श्रमदान आणि इतर दुष्टीकोनातून झालेल्या कामगिरीच्या आधारावर उत्कृष्ट गावांना पुरस्कृत करण्यात येते.बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर, मोताळा तालुक्यातील विविध गावांचे निरिक्षण गत आठवड्यात करण्यात आले. विविध गावांमध्ये समाधानकारक कामगिरी झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीकोनातून विदर्भाच्या प्रतिसादाबद्दल काय सांगाल? श्रमदानातून दृष्काळमुक्तीच्या दिशेने पाणी फाउंडेशनची वाटचाल सुरू आहे. विदर्भातील विविध गावांचा यामध्ये सुरूवातीपासूनच सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. विदर्भातील १४७१ गावांनी ‘वाटर’कप स्पर्धेत सहभाग नोंदविलाय. वारेमाप वृक्ष तोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले. जलस्तर सतत खालावत जात आहे. भविष्यातील पाणी टंचाईचे सावट टाळण्यासाठी प्रत्येकाने श्रमदानात सहभागी होण्याची गरज आहे. श्रमदानातूनच ही चळवळ गतीमान होईल.

पाणी फाउंडेशनतंर्गत विदर्भात आतापर्यंत किती जणांना प्रशिक्षण देण्यात आले. ?

भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी तसेच अधिकाअधिक सहभागासाठी विविध गावांचा समावेश ‘पाणी फाउंडेशन’तंर्गत ‘वाटर कप’ स्पर्धेत करण्यात येत आहे. विदर्भातील ८ हजार २३६ प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षणार्थी आपल्या गावाकडील युवक आणि युवती आणि महिलांचा सहभाग वाढवित आहेत. या सकारात्मक प्रतिसादाचा मनस्वी आनंद आहे. गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी विदर्भातील गावांचा पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत वाढता सहभाग असून बुलडाणा जिल्ह्यातील अनेक आदिवासी गावेही सहभागी झाली आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा