शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ मुक्तीसाठी झटण्याची जबाबदारी प्रत्येकाचीच - चिन्मय फुटाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 19:25 IST

- अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर विदर्भातही दुष्काळाची भीषण दाहकता आहे. व्यवस्थापना ...

- अनिल गवई।

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर विदर्भातही दुष्काळाची भीषण दाहकता आहे. व्यवस्थापना अभावी विदर्भातील अनेक खेड्यात जलसंकट निर्माण झाले. जलसंकटावर मात करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. मात्र, भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी प्रत्येकानेच दुष्काळाशी दोन हात करण्यात मदत करणे गरजेचे आहे. पाणी फाउंडेशनचे विदर्भ समन्वयक चिन्मय फुटाणे यांच्याशी साधलेला संवाद...

पाणी फाउंडेशनच्या कार्याला कधीपासून सुरूवात झाली? राज्यातील दुष्काळाची भीषण परिस्थिीती बघता सिने अभिनेते अमिरखान आणि त्यांच्या पत्नी किरण राव यांनी पाच वर्षांपूर्वी ‘पाणी फाउंडेशन’ची स्थापना केली. आता श्रमदानातून हळूहळू ही चळवळ विदर्भातील कानाकोपºयात बळकट होतेय. अगदी बुलडाणा जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातही ‘पाणी फाउंडेशन’तंर्गत जलसंवर्धन आणि पाणलोट व्यवस्थापन केल्या जातेय.

वाटर कप स्पर्धेत सहभागी गावांच्या निवडीचे निकष काय?

जलसंवर्धन व पाणलोट व्यवस्थानाची उत्तम कामगिरी करणाºयासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये स्पर्धा लावली जाते. या गावांची विदर्भ, जिल्हा स्तरावर पाहणी केली जाते. पाहणीत श्रमदान आणि इतर दुष्टीकोनातून झालेल्या कामगिरीच्या आधारावर उत्कृष्ट गावांना पुरस्कृत करण्यात येते.बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर, मोताळा तालुक्यातील विविध गावांचे निरिक्षण गत आठवड्यात करण्यात आले. विविध गावांमध्ये समाधानकारक कामगिरी झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीकोनातून विदर्भाच्या प्रतिसादाबद्दल काय सांगाल? श्रमदानातून दृष्काळमुक्तीच्या दिशेने पाणी फाउंडेशनची वाटचाल सुरू आहे. विदर्भातील विविध गावांचा यामध्ये सुरूवातीपासूनच सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. विदर्भातील १४७१ गावांनी ‘वाटर’कप स्पर्धेत सहभाग नोंदविलाय. वारेमाप वृक्ष तोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले. जलस्तर सतत खालावत जात आहे. भविष्यातील पाणी टंचाईचे सावट टाळण्यासाठी प्रत्येकाने श्रमदानात सहभागी होण्याची गरज आहे. श्रमदानातूनच ही चळवळ गतीमान होईल.

पाणी फाउंडेशनतंर्गत विदर्भात आतापर्यंत किती जणांना प्रशिक्षण देण्यात आले. ?

भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी तसेच अधिकाअधिक सहभागासाठी विविध गावांचा समावेश ‘पाणी फाउंडेशन’तंर्गत ‘वाटर कप’ स्पर्धेत करण्यात येत आहे. विदर्भातील ८ हजार २३६ प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षणार्थी आपल्या गावाकडील युवक आणि युवती आणि महिलांचा सहभाग वाढवित आहेत. या सकारात्मक प्रतिसादाचा मनस्वी आनंद आहे. गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी विदर्भातील गावांचा पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत वाढता सहभाग असून बुलडाणा जिल्ह्यातील अनेक आदिवासी गावेही सहभागी झाली आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा