शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

दुष्काळ मुक्तीसाठी झटण्याची जबाबदारी प्रत्येकाचीच - चिन्मय फुटाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 19:25 IST

- अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर विदर्भातही दुष्काळाची भीषण दाहकता आहे. व्यवस्थापना ...

- अनिल गवई।

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर विदर्भातही दुष्काळाची भीषण दाहकता आहे. व्यवस्थापना अभावी विदर्भातील अनेक खेड्यात जलसंकट निर्माण झाले. जलसंकटावर मात करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. मात्र, भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी प्रत्येकानेच दुष्काळाशी दोन हात करण्यात मदत करणे गरजेचे आहे. पाणी फाउंडेशनचे विदर्भ समन्वयक चिन्मय फुटाणे यांच्याशी साधलेला संवाद...

पाणी फाउंडेशनच्या कार्याला कधीपासून सुरूवात झाली? राज्यातील दुष्काळाची भीषण परिस्थिीती बघता सिने अभिनेते अमिरखान आणि त्यांच्या पत्नी किरण राव यांनी पाच वर्षांपूर्वी ‘पाणी फाउंडेशन’ची स्थापना केली. आता श्रमदानातून हळूहळू ही चळवळ विदर्भातील कानाकोपºयात बळकट होतेय. अगदी बुलडाणा जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातही ‘पाणी फाउंडेशन’तंर्गत जलसंवर्धन आणि पाणलोट व्यवस्थापन केल्या जातेय.

वाटर कप स्पर्धेत सहभागी गावांच्या निवडीचे निकष काय?

जलसंवर्धन व पाणलोट व्यवस्थानाची उत्तम कामगिरी करणाºयासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये स्पर्धा लावली जाते. या गावांची विदर्भ, जिल्हा स्तरावर पाहणी केली जाते. पाहणीत श्रमदान आणि इतर दुष्टीकोनातून झालेल्या कामगिरीच्या आधारावर उत्कृष्ट गावांना पुरस्कृत करण्यात येते.बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर, मोताळा तालुक्यातील विविध गावांचे निरिक्षण गत आठवड्यात करण्यात आले. विविध गावांमध्ये समाधानकारक कामगिरी झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीकोनातून विदर्भाच्या प्रतिसादाबद्दल काय सांगाल? श्रमदानातून दृष्काळमुक्तीच्या दिशेने पाणी फाउंडेशनची वाटचाल सुरू आहे. विदर्भातील विविध गावांचा यामध्ये सुरूवातीपासूनच सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. विदर्भातील १४७१ गावांनी ‘वाटर’कप स्पर्धेत सहभाग नोंदविलाय. वारेमाप वृक्ष तोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले. जलस्तर सतत खालावत जात आहे. भविष्यातील पाणी टंचाईचे सावट टाळण्यासाठी प्रत्येकाने श्रमदानात सहभागी होण्याची गरज आहे. श्रमदानातूनच ही चळवळ गतीमान होईल.

पाणी फाउंडेशनतंर्गत विदर्भात आतापर्यंत किती जणांना प्रशिक्षण देण्यात आले. ?

भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी तसेच अधिकाअधिक सहभागासाठी विविध गावांचा समावेश ‘पाणी फाउंडेशन’तंर्गत ‘वाटर कप’ स्पर्धेत करण्यात येत आहे. विदर्भातील ८ हजार २३६ प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षणार्थी आपल्या गावाकडील युवक आणि युवती आणि महिलांचा सहभाग वाढवित आहेत. या सकारात्मक प्रतिसादाचा मनस्वी आनंद आहे. गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी विदर्भातील गावांचा पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत वाढता सहभाग असून बुलडाणा जिल्ह्यातील अनेक आदिवासी गावेही सहभागी झाली आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा