शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

दुष्काळ मुक्तीसाठी झटण्याची जबाबदारी प्रत्येकाचीच - चिन्मय फुटाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 19:25 IST

- अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर विदर्भातही दुष्काळाची भीषण दाहकता आहे. व्यवस्थापना ...

- अनिल गवई।

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर विदर्भातही दुष्काळाची भीषण दाहकता आहे. व्यवस्थापना अभावी विदर्भातील अनेक खेड्यात जलसंकट निर्माण झाले. जलसंकटावर मात करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. मात्र, भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी प्रत्येकानेच दुष्काळाशी दोन हात करण्यात मदत करणे गरजेचे आहे. पाणी फाउंडेशनचे विदर्भ समन्वयक चिन्मय फुटाणे यांच्याशी साधलेला संवाद...

पाणी फाउंडेशनच्या कार्याला कधीपासून सुरूवात झाली? राज्यातील दुष्काळाची भीषण परिस्थिीती बघता सिने अभिनेते अमिरखान आणि त्यांच्या पत्नी किरण राव यांनी पाच वर्षांपूर्वी ‘पाणी फाउंडेशन’ची स्थापना केली. आता श्रमदानातून हळूहळू ही चळवळ विदर्भातील कानाकोपºयात बळकट होतेय. अगदी बुलडाणा जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातही ‘पाणी फाउंडेशन’तंर्गत जलसंवर्धन आणि पाणलोट व्यवस्थापन केल्या जातेय.

वाटर कप स्पर्धेत सहभागी गावांच्या निवडीचे निकष काय?

जलसंवर्धन व पाणलोट व्यवस्थानाची उत्तम कामगिरी करणाºयासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये स्पर्धा लावली जाते. या गावांची विदर्भ, जिल्हा स्तरावर पाहणी केली जाते. पाहणीत श्रमदान आणि इतर दुष्टीकोनातून झालेल्या कामगिरीच्या आधारावर उत्कृष्ट गावांना पुरस्कृत करण्यात येते.बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर, मोताळा तालुक्यातील विविध गावांचे निरिक्षण गत आठवड्यात करण्यात आले. विविध गावांमध्ये समाधानकारक कामगिरी झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीकोनातून विदर्भाच्या प्रतिसादाबद्दल काय सांगाल? श्रमदानातून दृष्काळमुक्तीच्या दिशेने पाणी फाउंडेशनची वाटचाल सुरू आहे. विदर्भातील विविध गावांचा यामध्ये सुरूवातीपासूनच सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. विदर्भातील १४७१ गावांनी ‘वाटर’कप स्पर्धेत सहभाग नोंदविलाय. वारेमाप वृक्ष तोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले. जलस्तर सतत खालावत जात आहे. भविष्यातील पाणी टंचाईचे सावट टाळण्यासाठी प्रत्येकाने श्रमदानात सहभागी होण्याची गरज आहे. श्रमदानातूनच ही चळवळ गतीमान होईल.

पाणी फाउंडेशनतंर्गत विदर्भात आतापर्यंत किती जणांना प्रशिक्षण देण्यात आले. ?

भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी तसेच अधिकाअधिक सहभागासाठी विविध गावांचा समावेश ‘पाणी फाउंडेशन’तंर्गत ‘वाटर कप’ स्पर्धेत करण्यात येत आहे. विदर्भातील ८ हजार २३६ प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षणार्थी आपल्या गावाकडील युवक आणि युवती आणि महिलांचा सहभाग वाढवित आहेत. या सकारात्मक प्रतिसादाचा मनस्वी आनंद आहे. गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी विदर्भातील गावांचा पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत वाढता सहभाग असून बुलडाणा जिल्ह्यातील अनेक आदिवासी गावेही सहभागी झाली आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा