शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

ग्रामीण भागात ‘डिजिटल इंडीया’चा बोजवारा;  इंटरनेट सेवा वारंवार खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 15:37 IST

संग्रामपूर: तालुक्यातील ग्रामीण भागात इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने कॅशलेस व्यवहारांवर याचा परिणाम होत आहे. परिणामी डिजिटल इंडीयाचा संग्रामपूर तालुक्यात बोजवारा उडाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: तालुक्यातील ग्रामीण भागात इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने कॅशलेस व्यवहारांवर याचा परिणाम होत आहे. परिणामी डिजिटल इंडीयाचा संग्रामपूर तालुक्यात बोजवारा उडाला आहे.संग्रामपूर तालुक्यात आठवड्यातून तीन ते चार दिवस इंटरनेट सेवा ठप्प होते. परीणामी आॅनलाईन कामकाजावर परिणाम होत आहे. बँकांचे व्यवहार बंद पडत आहेत. असे वारंवार होत असल्याने कॅशलेस व्यवहारांचा फुगाही फुटला आहे. संग्रामपूरसह वरवट बकाल, पातुर्डा, बावनबिर, सोनाळा येथे राष्ट्रीयकृत बँकांसह पतसंस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालय तसेच आॅनलाईन कामकाजाकरीता महा ई सेवा केंद्र, सी. एस. सी. सेंटर कार्यान्वित आहेत. ह्या सर्व सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी इंटरनेट सेवा आणि तीही जलद गतीने सुरू राहण्याची गरज आहे; परंतु संग्रामपूर तालुक्यात असे होताना दिसत नाही. जलदगतीने इंटरनेट सेवा तर सोडाच, बीएसएनएल ब्रॉडब्रँडची सेवाही वारंवार विस्कळीत होते. सध्या गत दोन दिवसांपासून कनेक्टिव्हिटी नसल्याने सर्वच आॅनलाईन व्यवहार बंद पडल्यागत झाले आहेत. शेतकऱ्यांना शेतीची कामे सोडून बँकेत इंटरनेट सेवा सुरळीत होण्याची वाट पाहत उभे राहावे लागत आहे. सोनाळा येथील भारतीलय स्टेट बँकेत ग्राहक इंटरनेट सेवा सुरू होण्याची वाट पाहत आहेत. तासन्तास उभे राहूनदेखिल व्यवहार होत नसल्याचे चित्र आहे. अखेर संध्याकाळी काम न होताच परतावे लागत आहे. पुन्हा दुसºया दिवशीही तीच परिस्थिती ग्राहकांवर येत आहे. शासनाने मोठा गाजावाजा करीत आॅनलाईन कामकाजांवर भर दिला. परंतु इंटरनेट सेवाच विस्कळीत राहत असल्याने शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासण्यात येत असल्याचे चित्र आहे.दर आठवड्यात केबल तुटल्याचे कारण पुढे करीत बीएसएनएलची इंटरनेट विस्कळीत राहत आहे. तालुक्यातील बावनबीर येथील बँक आॅफ महाराष्ट्र व सोनाळा येथील भारतीय स्टेट बँक शाखेत गत दोन दिवसांपासून कनेक्टिव्हीटी नाही. परिणामी येथील व्यवहार पुर्णपणे ठप्प झाले आहेत.वारंवार खंडीत होत असलेल्या ब्रॉडबँड सेवेबाबत जळगाव जामोद येथील बीएसएनएल कार्यालयाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात. केबल तुटल्याचे कारण पुढे करीत इंटरनेट सेवा खंडीत करण्यात येत आहे, असा आरोप ग्राहकांकडून करण्यात येत आहे.

इंटरनेट सेवा बंद असल्याने बँकांचे व्यवहार वेळेवर होत नाहीत. इतर महत्त्वाची कामे सोडून दिवसभर बँकेत लाईनमध्ये उभे राहावे लागत आहे. आठवड्यातून किमान तीन तेच चार दिवस अशीच परिस्थिती असते. याविरोधात आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही.- पांडुरंग वेरूळकारशेतकरी, सोनाळा ता. संग्रामपूरफायबर आॅप्टिक केबल तुटल्यामुळे ब्रॉडबँड सेवा विस्कळीत झाली आहे. जोडणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच इंटरनेट सेवा सुरळीत होईल.- राकेश मेहराकनिष्ठ अभियंता,बी.एस.एन.एल. कार्यालय, जळगाव जामोद.

टॅग्स :khamgaonखामगावSangrampurसंग्रामपूरdigitalडिजिटलInternetइंटरनेट