शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात ‘डिजिटल इंडीया’चा बोजवारा;  इंटरनेट सेवा वारंवार खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 15:37 IST

संग्रामपूर: तालुक्यातील ग्रामीण भागात इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने कॅशलेस व्यवहारांवर याचा परिणाम होत आहे. परिणामी डिजिटल इंडीयाचा संग्रामपूर तालुक्यात बोजवारा उडाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: तालुक्यातील ग्रामीण भागात इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने कॅशलेस व्यवहारांवर याचा परिणाम होत आहे. परिणामी डिजिटल इंडीयाचा संग्रामपूर तालुक्यात बोजवारा उडाला आहे.संग्रामपूर तालुक्यात आठवड्यातून तीन ते चार दिवस इंटरनेट सेवा ठप्प होते. परीणामी आॅनलाईन कामकाजावर परिणाम होत आहे. बँकांचे व्यवहार बंद पडत आहेत. असे वारंवार होत असल्याने कॅशलेस व्यवहारांचा फुगाही फुटला आहे. संग्रामपूरसह वरवट बकाल, पातुर्डा, बावनबिर, सोनाळा येथे राष्ट्रीयकृत बँकांसह पतसंस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालय तसेच आॅनलाईन कामकाजाकरीता महा ई सेवा केंद्र, सी. एस. सी. सेंटर कार्यान्वित आहेत. ह्या सर्व सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी इंटरनेट सेवा आणि तीही जलद गतीने सुरू राहण्याची गरज आहे; परंतु संग्रामपूर तालुक्यात असे होताना दिसत नाही. जलदगतीने इंटरनेट सेवा तर सोडाच, बीएसएनएल ब्रॉडब्रँडची सेवाही वारंवार विस्कळीत होते. सध्या गत दोन दिवसांपासून कनेक्टिव्हिटी नसल्याने सर्वच आॅनलाईन व्यवहार बंद पडल्यागत झाले आहेत. शेतकऱ्यांना शेतीची कामे सोडून बँकेत इंटरनेट सेवा सुरळीत होण्याची वाट पाहत उभे राहावे लागत आहे. सोनाळा येथील भारतीलय स्टेट बँकेत ग्राहक इंटरनेट सेवा सुरू होण्याची वाट पाहत आहेत. तासन्तास उभे राहूनदेखिल व्यवहार होत नसल्याचे चित्र आहे. अखेर संध्याकाळी काम न होताच परतावे लागत आहे. पुन्हा दुसºया दिवशीही तीच परिस्थिती ग्राहकांवर येत आहे. शासनाने मोठा गाजावाजा करीत आॅनलाईन कामकाजांवर भर दिला. परंतु इंटरनेट सेवाच विस्कळीत राहत असल्याने शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासण्यात येत असल्याचे चित्र आहे.दर आठवड्यात केबल तुटल्याचे कारण पुढे करीत बीएसएनएलची इंटरनेट विस्कळीत राहत आहे. तालुक्यातील बावनबीर येथील बँक आॅफ महाराष्ट्र व सोनाळा येथील भारतीय स्टेट बँक शाखेत गत दोन दिवसांपासून कनेक्टिव्हीटी नाही. परिणामी येथील व्यवहार पुर्णपणे ठप्प झाले आहेत.वारंवार खंडीत होत असलेल्या ब्रॉडबँड सेवेबाबत जळगाव जामोद येथील बीएसएनएल कार्यालयाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात. केबल तुटल्याचे कारण पुढे करीत इंटरनेट सेवा खंडीत करण्यात येत आहे, असा आरोप ग्राहकांकडून करण्यात येत आहे.

इंटरनेट सेवा बंद असल्याने बँकांचे व्यवहार वेळेवर होत नाहीत. इतर महत्त्वाची कामे सोडून दिवसभर बँकेत लाईनमध्ये उभे राहावे लागत आहे. आठवड्यातून किमान तीन तेच चार दिवस अशीच परिस्थिती असते. याविरोधात आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही.- पांडुरंग वेरूळकारशेतकरी, सोनाळा ता. संग्रामपूरफायबर आॅप्टिक केबल तुटल्यामुळे ब्रॉडबँड सेवा विस्कळीत झाली आहे. जोडणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच इंटरनेट सेवा सुरळीत होईल.- राकेश मेहराकनिष्ठ अभियंता,बी.एस.एन.एल. कार्यालय, जळगाव जामोद.

टॅग्स :khamgaonखामगावSangrampurसंग्रामपूरdigitalडिजिटलInternetइंटरनेट