शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 14:24 IST

देऊळगावमही येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन  शिबीर व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबातील महिलांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

 देऊळगावमही : देऊळगावमही येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन  शिबीर व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबातील महिलांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष समाधान शिंगणे होते. प्रमुख पाहूणे म्हणून कबीर फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. कमलेश खिलारे, बालविकास अधिकारी गणेश वाघ, अंढेरा ठाणेदार विनायक कारेगावकर, दीपक नागरे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी मनोगत व्यक्त करताना आएएस अधिकारी योगेश चित्ते म्हणाले, की अपयशाला न घाबरता विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास यशाचे शिखर गाठता येते. प्रयत्नांची पराकाष्ठा ही यशाची गुरूकिल्ली आहे. ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता  जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास ठेवत स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. एक दिवस नक्कीच यश पदरात पडते, असे ते म्हणाले. त्याचबरोबर आजच्या तरुण युवकांनी प्रशाकीय सेवेत येऊन देशसेवा करावी. आपल्या देशाला उच्च शिक्षित तरुणांची प्रशाकीय सेवेत गरज असून युवकांनी प्रशासकीय सेवेत यावे, असे चित्ते म्हणाले. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना मान्यवरांच्या हस्ते साडीचोळी  देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. बाल योग गुरू वरद जोशी याचेही यावेळी कौतूक करीत त्याचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक दीपक नागरे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभिजित शिंगणे यांनी तर आभार दिनेश जाधव यांनी मानले.  कार्यक्रमाच्या यशव्यीतेसाठी तालुका बहुजन पत्रकार संघाचे अध्यक्ष राम पर्हाड तसेच सहकारी पत्रकार  मित्र यांनी पुढाकार घेतला होता.

टॅग्स :Farmerशेतकरी