शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

पाऊस लांबल्यामुळे शेतकरी चिंतातूर; पावसाची प्रतिक्षा कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 18:40 IST

खामगाव :  मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच आगमन करून सर्वांनाच सु:खद धक्का देणाºया पावसाने गेल्या आठ दिवसांपासून चांगलीच दांडी मारली.  यावर्षी वर्तविण्यात आलेल्या अंदाजांना काहिशी बगल देत पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

ठळक मुद्दे मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने शेतकºयांच्याही आशा पल्लवीत झाल्या होत्या. शेतकरी पेरणीच्या तयारीत असतानाच अचानक पावसाने दडी मारली. आभाळाकडे नजरा लावून बसण्यापलिकडे शेतकºयांच्या हाती सध्यातरी काही उरले नाही.

- देवेंद्र ठाकरे खामगाव :  मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच आगमन करून सर्वांनाच सु:खद धक्का देणाºया पावसाने गेल्या आठ दिवसांपासून चांगलीच दांडी मारली.  यावर्षी वर्तविण्यात आलेल्या अंदाजांना काहिशी बगल देत पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. एकीकडे मशीगतीची सर्व कामे पुर्ण झाली असली, तरी पेरणीयोग्य पावसाची अद्याप प्रतिक्षा कायमच आहे.२५ मे रोजी रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर महाराष्ट्रात पावसाला सुरूवात झाली. अनेकठिकाणी मुसळधार  स्वरूपाचा पाऊस पडला. मृग नक्षत्राची सुरूवात होईपर्यंत बुलडाणा जिल्ह्यातही पावसाचे आगमन झाले. यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यासह अनेकांनी वर्तविला असल्याने व मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने शेतकºयांच्याही आशा पल्लवीत झाल्या होत्या. अनेक वर्षांनतर यावर्षी मृग नक्षत्रातच पेरणी होण्याची दाट शक्यता यामुळे निर्माण झाली होती.  शेतकºयांनीही मशागतीची कामे वेगाने केली. उसनवारी किंवा जसे जमेल तसे खते, बियाण्यांचे नियोजनही केले. शेतकरी पेरणीच्या तयारीत असतांनाच अचानक पावसाने दडी मारली. यानंतर आज येईल, उद्या येईल असे करता-करता तब्बल आठ ते दहा दिवस उलटले. तुर्तास  आभाळाकडे नजरा लावून बसण्यापलिकडे शेतकºयांच्या हाती सध्यातरी काही उरले नाही.

 बियाणे, खतांच्या खरेदीतून फटकामृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या. यावर्षी लवकर पेरणी करायची या आशेने अनेक शेतकºयांनी बियाणे, खताची खरेदी केली. सगळीकडे पावसाचे वातावरण असल्याने बियाणे विक्रीच्या दुकानांवर शेतकºयांनी गर्दी केली. खरेदीत आलेली तेजी पाहता विक्रेत्यांनीही थोड्या फार फरकाने जादा दर आकारत पैसा वसूल करण्याचा प्रयत्न केला. पावसाचे वातावरण पाहून शेतकºयांनाही घासघिस न करता, बियाणे व खत खरेदी केली. यातून कमी-अधिक प्रमाणात अनेक शेतकºयांना जादा पैसे मोजावे लागले.

 पुर्णेच्या पुरानेही बळावल्या होत्या आशामध्यंतरी पुर्णा नदीला पूर आला होता. आपल्याकडे पाऊस पडला नसतांनाही मध्यरात्री आलेल्या या पूराबद्दल पहाटे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. पुर्णेला आलेला पूर हा अकोला जिल्हा तसेच इतर ठिकाणी पडलेल्या पावसामुळे आला, हे नंतर सगळ्यांना कळले. परंतु अकोला जिल्ह्यात चांगला  पाऊस झाला याचा अर्थ आपल्याकडेही एकदोन दिवसात दमदार पाऊस होईल अशी आशा साºयांनाच लागली होती. अर्थात या आशेवरही तुर्तास पाणि फेरल्या गेले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावmonsoon 2018मान्सून 2018Farmerशेतकरी