शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

कर्ज वाटपाच्या कासवगतीने शेतकरी चिंतेत; उसनवारी फेडण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 14:31 IST

जानेफळ : कासव गतीने सुरू असलेल्या पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेमुळे जानेफळ परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पेरणी होऊन महिना उलटला तरी शेतकऱ्यांना कर्ज मिळालेले नाही. त्यामुळे पेरणीसाठी उधारीने घेतलेल्या साहित्याचे पैसे देण्यास उशीर होत आहे. बाजारात पत खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. सात जूनला सुरू झालेल्या मृग नक्षत्रानंतर आठ ...

ठळक मुद्देपिके अांतर मशागतीवर आलेले असतानासुद्धा पीक कर्जाचे वाटप मात्र कासवाच्या गतीने होत आहे. परिसरातील ५० खेड्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या जानेफळ येथे राष्ट्रीयकृत बँकेची एकमेव भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे.

जानेफळ : कासव गतीने सुरू असलेल्या पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेमुळे जानेफळ परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पेरणी होऊन महिना उलटला तरी शेतकऱ्यांना कर्ज मिळालेले नाही. त्यामुळे पेरणीसाठी उधारीने घेतलेल्या साहित्याचे पैसे देण्यास उशीर होत आहे. बाजारात पत खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. सात जूनला सुरू झालेल्या मृग नक्षत्रानंतर आठ ते १० दिवसानंतरच पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये पेरणीची घाई सुरू झाली होती. सधन शेतकरी पेरणी करताना पाहून इतर शेतकऱ्यांनीही पीक कर्जाच्या भरवशावर व्यापाऱ्यांकडून उधारीने बी-बियाणे, रासायनिक खते तसेच ट्रॅक्टर मालकांची सुद्धा मनधरणी करीत उधारीने ट्रॅक्टरद्वारे पेरणी करून घेतली. पिके अांतर मशागतीवर आलेले असतानासुद्धा पीक कर्जाचे वाटप मात्र कासवाच्या गतीने होत आहे. कृषी केंद्र चालक तसेच ट्रॅक्टर मालक पैशासाठी शेतकऱ्यांच्या दारात दररोज चकरा मारत आहेत. मात्र त्यांना देण्यासाठी पैसा नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. परिसरातील ५० खेड्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या जानेफळ येथे राष्ट्रीयकृत बँकेची एकमेव भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. संपूर्ण खेड्यांचा व गावाचा भार याच शाखेवर आहे. शाखेत अपुरे कर्मचारी असल्याने कामकाज फारच संथ गतीने चालते. कधी लिंक फेल, कधी नेट प्रॉब्लेम तर कधी कर्मचारी रजेवर जात असल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

केवळ १३८ शेतकऱ्यांना कर्जवाटप

स्टेट बँक शाखेअंतर्गत असलेल्या एकूण ९ हजार खातेदार शेतकऱ्यांपैकी फक्त २७०० शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरलेले आहेत. त्यापैकी केवळ ४०० शेतकºयांना नवीन कर्ज वाटप होणार आहे. मात्र अद्याप केवळ १३८ शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले आहे. कर्जाच्या प्रतीक्षेत शेतकºयांना दररोज बँकेत चकरा माराव्या लागत आहेत.

राजकीय पक्षांची भूमिका गोलमाल

सध्या शेतकºयांना पिकांची डवरणी, निंदण व तणनाशकांच्या फवारणीसाठी पैशाची गरज आहे. पैशाअभावी शेतीचे कामे खोळंबली आहेत. मात्र कर्ज मिळत नसल्याने बँकेच्या कर्जाची वाट पाहण्याऐवजी शेतकरी सावकारांचे दार ठोठावत आहेत. शिवसेनेचे पदाधिकारी सेना स्टाईलने आंदोलन छेडण्याच्या पोकळ धमक्या देतात. तर काँग्रेसचे पुढारी केवळ बँक मॅनेजरला निवेदन देत आहेत

टॅग्स :buldhanaबुलडाणाbankबँकFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज