शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज वाटपाच्या कासवगतीने शेतकरी चिंतेत; उसनवारी फेडण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 14:31 IST

जानेफळ : कासव गतीने सुरू असलेल्या पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेमुळे जानेफळ परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पेरणी होऊन महिना उलटला तरी शेतकऱ्यांना कर्ज मिळालेले नाही. त्यामुळे पेरणीसाठी उधारीने घेतलेल्या साहित्याचे पैसे देण्यास उशीर होत आहे. बाजारात पत खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. सात जूनला सुरू झालेल्या मृग नक्षत्रानंतर आठ ...

ठळक मुद्देपिके अांतर मशागतीवर आलेले असतानासुद्धा पीक कर्जाचे वाटप मात्र कासवाच्या गतीने होत आहे. परिसरातील ५० खेड्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या जानेफळ येथे राष्ट्रीयकृत बँकेची एकमेव भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे.

जानेफळ : कासव गतीने सुरू असलेल्या पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेमुळे जानेफळ परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पेरणी होऊन महिना उलटला तरी शेतकऱ्यांना कर्ज मिळालेले नाही. त्यामुळे पेरणीसाठी उधारीने घेतलेल्या साहित्याचे पैसे देण्यास उशीर होत आहे. बाजारात पत खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. सात जूनला सुरू झालेल्या मृग नक्षत्रानंतर आठ ते १० दिवसानंतरच पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये पेरणीची घाई सुरू झाली होती. सधन शेतकरी पेरणी करताना पाहून इतर शेतकऱ्यांनीही पीक कर्जाच्या भरवशावर व्यापाऱ्यांकडून उधारीने बी-बियाणे, रासायनिक खते तसेच ट्रॅक्टर मालकांची सुद्धा मनधरणी करीत उधारीने ट्रॅक्टरद्वारे पेरणी करून घेतली. पिके अांतर मशागतीवर आलेले असतानासुद्धा पीक कर्जाचे वाटप मात्र कासवाच्या गतीने होत आहे. कृषी केंद्र चालक तसेच ट्रॅक्टर मालक पैशासाठी शेतकऱ्यांच्या दारात दररोज चकरा मारत आहेत. मात्र त्यांना देण्यासाठी पैसा नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. परिसरातील ५० खेड्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या जानेफळ येथे राष्ट्रीयकृत बँकेची एकमेव भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. संपूर्ण खेड्यांचा व गावाचा भार याच शाखेवर आहे. शाखेत अपुरे कर्मचारी असल्याने कामकाज फारच संथ गतीने चालते. कधी लिंक फेल, कधी नेट प्रॉब्लेम तर कधी कर्मचारी रजेवर जात असल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

केवळ १३८ शेतकऱ्यांना कर्जवाटप

स्टेट बँक शाखेअंतर्गत असलेल्या एकूण ९ हजार खातेदार शेतकऱ्यांपैकी फक्त २७०० शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरलेले आहेत. त्यापैकी केवळ ४०० शेतकºयांना नवीन कर्ज वाटप होणार आहे. मात्र अद्याप केवळ १३८ शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले आहे. कर्जाच्या प्रतीक्षेत शेतकºयांना दररोज बँकेत चकरा माराव्या लागत आहेत.

राजकीय पक्षांची भूमिका गोलमाल

सध्या शेतकºयांना पिकांची डवरणी, निंदण व तणनाशकांच्या फवारणीसाठी पैशाची गरज आहे. पैशाअभावी शेतीचे कामे खोळंबली आहेत. मात्र कर्ज मिळत नसल्याने बँकेच्या कर्जाची वाट पाहण्याऐवजी शेतकरी सावकारांचे दार ठोठावत आहेत. शिवसेनेचे पदाधिकारी सेना स्टाईलने आंदोलन छेडण्याच्या पोकळ धमक्या देतात. तर काँग्रेसचे पुढारी केवळ बँक मॅनेजरला निवेदन देत आहेत

टॅग्स :buldhanaबुलडाणाbankबँकFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज