शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

खरिपाच्या तोंडावर शेतकर्‍यांचे खिसे रितेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:07 IST

जानेफळ : एकीकडे सूर्य आग ओकत असताना शेतकर्‍यांची मात्र तोंडावर आलेल्या खरीप हंगामासाठी लगबग सुरू झाली आहे. लग्न सराईचा धूमधडाका सध्या मुहूर्त नसल्यामुळे थांबलेला असल्याने शेतकरी शेतीच्या कामाकडे वळले आहेत. परंतु खिसे रिकामेच असल्याने कर्जासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू झाली आहे. मागील वर्षीची कर्जमाफी अद्यापपर्यंत अनेक शेतकर्‍यांना मिळालेली नाही. शेतकर्‍यांना तत्काळ कर्ज द्यावे, असे शासनाचे निर्देश असले, तरी बँकांना मात्र अद्यापपर्यंत आदेश मिळाले नसल्याचे बँक व्यवस्थापकाकडून सांगण्यात येत आहे. 

ठळक मुद्देकर्ज वाटपाचा अद्याप आदेश नाही पैसा नसल्याने बळीराजा अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कजानेफळ : एकीकडे सूर्य आग ओकत असताना शेतकर्‍यांची मात्र तोंडावर आलेल्या खरीप हंगामासाठी लगबग सुरू झाली आहे. लग्न सराईचा धूमधडाका सध्या मुहूर्त नसल्यामुळे थांबलेला असल्याने शेतकरी शेतीच्या कामाकडे वळले आहेत. परंतु खिसे रिकामेच असल्याने कर्जासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू झाली आहे. मागील वर्षीची कर्जमाफी अद्यापपर्यंत अनेक शेतकर्‍यांना मिळालेली नाही. शेतकर्‍यांना तत्काळ कर्ज द्यावे, असे शासनाचे निर्देश असले, तरी बँकांना मात्र अद्यापपर्यंत आदेश मिळाले नसल्याचे बँक व्यवस्थापकाकडून सांगण्यात येत आहे.  शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये पैसे नसल्याने त्यांची झोप उडाली आहे. गेल्या वर्षीचा हंगाम शेतकर्‍यांसाठी दुष्काळाचाच ठरला. मोठय़ा उत्साहाने पैशांची जुळवाजुळव करून शेतकरी तयार झाला. परंतु वरुणराजाने शेतकर्‍यांचे कंबरडेच मोडले होते. अत्यल्प पावसाने पिके सुकली, काही प्रमाणात झालेल्या पिकांवर बोंडअळी, किडींच्या प्रमाणामुळे उत्पादनात घट झाली आणि कसेबसे घरात आलेल्या शेतमालाला सुद्धा बाजार भाव न मिळाल्यामुळे कंबरडेच मोडले.कर्जमाफीची घोषणा हवेतच जिरल्यामुळे आता पुन्हा शेतकरी कर्जाच्या खाईत सापडला आहे. खरीप हंगाम जवळ आल्याने बी-बियाणे व रासायनिक खतांसाठी आता पैसा कोठून आणाव,ा अशा विचारात पडला आहे. मात्र, शासनाने जणु काही शेतकर्‍यांसोबत पोरखेळच चालविला आहे. एकीकडे शेतकर्‍यांना तत्काळ कर्ज देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे प्रसिद्धी माध्यमांसमोर सांगितल्या जात आहे, तर दुसरीकडे बँक प्रशासन आम्हाला पीक कर्ज वाटपाविषयी अद्याप कुठलेच आदेश मिळाले नसल्याचे सांगतात. त्यामुळे शेतकर्‍यांना चकरा माराव्या लागत आहेत.यावर्षीच्या खरीप हंगामाची सुरुवात दरवाढीने होत आहे. रासायनिक खताच्या प्रतिबॅग १00 ते १२५ रुपयांची दरवाढ झालेली आहे. डीझलच्या दरवाढीचा सुद्धा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. सध्याच्या यांत्रिकीकरणामुळे शेतीच्या नांगरणीपासून तर वखरणी, पेरणी, कीटकनाशके फवारणी आदी कामे ट्रॅक्टरद्वारेच केली जात आहेत. त्यामुळे डीझलचे भाव वाढल्याने ट्रॅक्टर मालकांनीसुद्धा भाववाढीचा निर्णय घेतला. शेतकर्‍यांना महागाईचा दुहेरी फटका बसत आहे.७ जूनपासून मृग नक्षत्रास सुरुवात होत आहे. यावर्षी लवकरच पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. परंतु शेतकर्‍यांच्या खिशाची कुठलीच सोय नसून, बँकेच्या कर्जाचीसुद्धा खात्री दिसत नाही. उधार उसणवारी करण्याससुद्धा कुणी तयार नसून, शेतीच्या नांगरणी, वखरणीसाठी ट्रॅक्टर मालकसुद्धा नगदी पैसे मागत असल्याने शेतकरी मोठय़ा अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी