शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

हरभरा व तूर खरेदीचे पैसे न मिळाल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 16:18 IST

मेहकर : शासनाने नाफेड मार्फत शेतकऱ्यांची हरभरा व तूर खरेदी केली आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून खरेदी केलेल्या हरभरा व तुरीचे पैसे न मिळाल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत.

ठळक मुद्दे ६ आॅगस्ट रोजी अनेक शेतकरी मेहकर येथील खरेदी विक्री संघ कार्यालयावर धडकले होते.कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव यांनी तात्काळ खरेदी विक्री कार्यालयाला भेट देवून समस्या जाणून घेतल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क

मेहकर : शासनाने नाफेड मार्फत शेतकऱ्यांची हरभरा व तूर खरेदी केली आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून खरेदी केलेल्या हरभरा व तुरीचे पैसे न मिळाल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. ६ आॅगस्ट रोजी अनेक शेतकरीमेहकर येथील खरेदी विक्री संघ कार्यालयावर धडकले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव यांनी मध्यस्थी करून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना शांत केले. मागील वर्षी मेहकर तालुक्यातील बहुतांश शेतकºयांना हरभरा व तूर पिकांचे चांगले उत्पादन झाले होते. मात्र बाजारामध्ये तूर व पिकांना पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने मातीमोेल किंमतीने हरभरा व तूर विकावी लागली. या पिकांच्या भरोश्यावर शेतकºयांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन होते. मात्र बाजारात भाव नसल्याने शेतकरी हतबल झाले होते. त्यामुळे शासनाने मेहकर तालुक्यात नाफेडचे केंद्र सुरू करून शेतकºयांचे हरभरा व तूर हमी भावाने खरेदी केले होते. परंतु खरेदी केलेल्या हरभरा व तूर पिकांचे पैसे गेल्या चार ते पाच महिन्यापासून मेहकर तालुक्यातील अनेक शेतकºयांना मिळालेच नाही. पैसे मिळण्यासाठी शेतकरी दररोज खरेदी विक्री कार्यालय मेहकर व विविध बँकाकडे चकरा मारत आहेत. या पार्श्वभूमिवर ६ आॅगस्ट रोजी मेहकर तालुक्यातील अनेक शेतकरी खरेदी विक्री कार्यालयावर धउकले होते. माल खरेदी करून चार ते पाच महिने होऊनही पैसे न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले होते. याच वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव यांनी तात्काळ खरेदी विक्री कार्यालयाला भेट देवून शेतकºयांच्या समस्या जाणून घेतल्या व वरिष्ठ अधिकाºयांशी मोबाईलद्वारे संपर्क करून शेतकºयांच्या व्यथा सांगितल्या. यावेळी लवकरात लवकर शेतकºयाच्या खात्यात पैसे जमा होतील, असे आश्वासन वरिष्ठ अधिकाºयांनी दिले. ही माहिती माधवराव जाधव यांनी शेतकºयांना दिल्याने त्यांचा रोष कमी झाला. यावेळी शेतकरी शुभम आसोले, श्रीराम वानखेडे, श्रीकृष्ण अवगळे, गजानन सुरूशे यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

माल खरेदी करूनही नोंदणीच नाही

 शासनाने नाफेड मार्फत मेहकर तालुक्यातील बहुतांश शेतकºयाचे तूर व हरभरा खरेदी केलेली आहे. खरेदी केलेल्या मालाची नोंदणी होणे गरजेचे होते. मेहकर तालुक्यातील जवळपास ११५ शेतकºयांची तूर व हरभरा खरेदी करूनही या शेतकºयांच्या मालाची नोंदणी न झाल्याने त्या शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होण्यास अडचणी येत आहे. शेतकरी दररोज संबंधित विभागाकडे चकरा मारतात. मात्र नोंदणीची वेबसाईटच बंद असल्याने जवळपास ११५ शेतकºयाची तुर व हरभरा पिकांची खरेदी करूनही नोंदणीच झालेली नाही. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकरFarmerशेतकरी