शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

मंत्रालयात जाळ्या लावून शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत - रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:54 IST

वरवट बकाल: मंत्रालयाला जाळय़ा लावून शेतकर्‍यांच्या अत्महत्या  थांबणार नसल्याची टीका शेतकरी स्वाभिमान पक्षाचे नेते रविकांत तुपकर  यांनी केली. जळगाव, संग्रामपूर, शेगाव तालुक्यातील हजारो रुग्णांचा  किडनी आजाराने मृत्यू झाला असताना याकडे शासनाने दुर्लक्ष होत  असल्याचा आरोप स्वाभिमानी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देकिडनी आजाराच्या रुग्णांकडे शासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल :  मंत्रालयाला जाळय़ा लावून शेतकर्‍यांच्या अत्महत्या  थांबणार नसल्याची टीका शेतकरी स्वाभिमान पक्षाचे नेते रविकांत तुपकर  यांनी केली. जळगाव, संग्रामपूर, शेगाव तालुक्यातील हजारो रुग्णांचा  किडनी आजाराने मृत्यू झाला असताना याकडे शासनाने दुर्लक्ष होत  असल्याचा आरोप स्वाभिमानी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी केला आहे.  या आजाराने मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत द्यावी,  अशी मागणीही रविकांत तुपकर यांनी केली आहे.

भाजपा सरकार  विकासांच्या गप्पा मारून जनतेला उल्लू बनवित असून शासन शेतकरी  सर्वसामान्य विरोधी धोरण राबवित आहे. संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर  येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.  संग्रामपूर तालुक्यात झंझावाती दौरा करून खारपाणपट्टा ढवळून काढला. या  दौर्‍याला तरुणांचा व शेतकर्‍यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. शासनाच्या शे तकरीविरोधी धोरणावर टीका करीत खारपाणपट्टय़ातील नागरिकांचे  किडनीच्या आजाराने मृत्यू होत असताना, विकासाच्या गप्पा करणारे भाजप  सरकार साधे स्वच्छ पाणी नागरिकांना देऊ शकत नाही? एकीकडे सरकार  मोठय़ा मोठय़ा प्रकल्पासाठी जमिनी ताब्यात घेऊन शेतकर्‍यांना देशोधडीला  लावत आहे तर दुसरीकडे मूलभूत सुविधा पुरवत नाही. गेल्या अनेक वर्षां पासून या भागातील नागरिकांना क्षारयुक्त पाणी प्यावे लागते. त्यामुळे किडनीचे  आजार होऊन लोक मृत्युमुखी पडत असताना स्वच्छ व पुरेसे पाणी ही  सरकार देऊ शकत नाही. अहो माणसच शिल्लक उरले नाही तर काय  करायचा तुमचा विकास, असा सवाल उपस्थित करून तुपकर म्हणाले की,  १४0 गाव पाणीपुरवठा योजना तत्काळ पूर्णत्वास नेऊन खारपाणपट्टय़ातील  नागरिकांना स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा करावा. किडनीच्या आजाराने मृत्यू  झालेल्या नागरिकांच्या नातेवाइकांना किमान २ लाख रुपयांची आर्थिक मदत  करावी. सिंचन प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकर्‍यांना तातडीने योग्य  मोबदला द्यावा. प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देऊन कुटुंबातील एका  व्यक्तीला शासकीय सेवेत समावून घ्यावे या मागण्या तात्काळ पूर्ण न केल्यास  खारपाणपट्टय़ातील नागरिकांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठे  आंदोलन उभे करेल, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला. तुपकर यांनी  मोमीनाबाद, काकनवाडा बु., काकनवाडा खु., खिरोडा, पिंप्रीमाळेगाव,  एकलारा, उमरा, लाडणापूर, सोनाळा, सगोडा, वडगाव, कोनद, काटेल,  पलसोडा, रिंगणवाडी, पंचाळा, काकोडा, बावनबीर या गावांचा दौरा करून  समस्या जाणून घेतल्या. 

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरbuldhanaबुलडाणाfarmer suicideशेतकरी आत्महत्या