शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयात जाळ्या लावून शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत - रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:54 IST

वरवट बकाल: मंत्रालयाला जाळय़ा लावून शेतकर्‍यांच्या अत्महत्या  थांबणार नसल्याची टीका शेतकरी स्वाभिमान पक्षाचे नेते रविकांत तुपकर  यांनी केली. जळगाव, संग्रामपूर, शेगाव तालुक्यातील हजारो रुग्णांचा  किडनी आजाराने मृत्यू झाला असताना याकडे शासनाने दुर्लक्ष होत  असल्याचा आरोप स्वाभिमानी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देकिडनी आजाराच्या रुग्णांकडे शासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल :  मंत्रालयाला जाळय़ा लावून शेतकर्‍यांच्या अत्महत्या  थांबणार नसल्याची टीका शेतकरी स्वाभिमान पक्षाचे नेते रविकांत तुपकर  यांनी केली. जळगाव, संग्रामपूर, शेगाव तालुक्यातील हजारो रुग्णांचा  किडनी आजाराने मृत्यू झाला असताना याकडे शासनाने दुर्लक्ष होत  असल्याचा आरोप स्वाभिमानी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी केला आहे.  या आजाराने मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत द्यावी,  अशी मागणीही रविकांत तुपकर यांनी केली आहे.

भाजपा सरकार  विकासांच्या गप्पा मारून जनतेला उल्लू बनवित असून शासन शेतकरी  सर्वसामान्य विरोधी धोरण राबवित आहे. संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर  येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.  संग्रामपूर तालुक्यात झंझावाती दौरा करून खारपाणपट्टा ढवळून काढला. या  दौर्‍याला तरुणांचा व शेतकर्‍यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. शासनाच्या शे तकरीविरोधी धोरणावर टीका करीत खारपाणपट्टय़ातील नागरिकांचे  किडनीच्या आजाराने मृत्यू होत असताना, विकासाच्या गप्पा करणारे भाजप  सरकार साधे स्वच्छ पाणी नागरिकांना देऊ शकत नाही? एकीकडे सरकार  मोठय़ा मोठय़ा प्रकल्पासाठी जमिनी ताब्यात घेऊन शेतकर्‍यांना देशोधडीला  लावत आहे तर दुसरीकडे मूलभूत सुविधा पुरवत नाही. गेल्या अनेक वर्षां पासून या भागातील नागरिकांना क्षारयुक्त पाणी प्यावे लागते. त्यामुळे किडनीचे  आजार होऊन लोक मृत्युमुखी पडत असताना स्वच्छ व पुरेसे पाणी ही  सरकार देऊ शकत नाही. अहो माणसच शिल्लक उरले नाही तर काय  करायचा तुमचा विकास, असा सवाल उपस्थित करून तुपकर म्हणाले की,  १४0 गाव पाणीपुरवठा योजना तत्काळ पूर्णत्वास नेऊन खारपाणपट्टय़ातील  नागरिकांना स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा करावा. किडनीच्या आजाराने मृत्यू  झालेल्या नागरिकांच्या नातेवाइकांना किमान २ लाख रुपयांची आर्थिक मदत  करावी. सिंचन प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकर्‍यांना तातडीने योग्य  मोबदला द्यावा. प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देऊन कुटुंबातील एका  व्यक्तीला शासकीय सेवेत समावून घ्यावे या मागण्या तात्काळ पूर्ण न केल्यास  खारपाणपट्टय़ातील नागरिकांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठे  आंदोलन उभे करेल, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला. तुपकर यांनी  मोमीनाबाद, काकनवाडा बु., काकनवाडा खु., खिरोडा, पिंप्रीमाळेगाव,  एकलारा, उमरा, लाडणापूर, सोनाळा, सगोडा, वडगाव, कोनद, काटेल,  पलसोडा, रिंगणवाडी, पंचाळा, काकोडा, बावनबीर या गावांचा दौरा करून  समस्या जाणून घेतल्या. 

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरbuldhanaबुलडाणाfarmer suicideशेतकरी आत्महत्या