शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात शेतकऱ्यांनी सुरू केले उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 18:43 IST

Farmers Hunger Strike ११ किलोमीटरपर्यंत पाईपलाईनने पाणी नेण्यात यावे, या मागणीसाठी शेतकरी पेनटाकळी प्रकल्पात उपोषणाला बसले आहेत.

ठळक मुद्देपाणी सोडले तर नुकसान, नाही सोडले तर पिके वाळतात.त्यामुळे प्रशासनही कोंडीत सापडले आहे.

हिवरा आश्रमः पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी पाईपलाईनद्वारे देण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी सकाळपासून पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. दुसऱ्या दिवशीही हे उपोषण सुरूच होते. पाणी सोडले, तरीही नुकसान होते, आणि पाणी नाही सोडले तर समोरच्या शेतकऱ्यांना पिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे प्रशासनही कोंडीत सापडले आहे.

मेहकर तालुक्यात असलेल्या पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्याद्वारे हजारो हेक्‍टर सिंचन केले जाते. मात्र या कालव्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने कालवा पाझरुन लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. पाझरत असलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची शेती खराब होत आहे. त्यामुळे ० ते ११ किलोमीटरपर्यंत पाईपलाईनने पाणी नेण्यात यावे, या मागणीसाठी शेतकरी पेनटाकळी प्रकल्पात उपोषणाला बसले आहेत. शनिवारी जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषा पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवानंद पवार यांनी उपोषण कर्त्या शेतकऱ्यांना भेट दिली. या शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी जाणून घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषा पवार यांनी जलसंधारण मंत्री यांना भ्रमणध्वनीद्वारे परिस्थितीची माहिती दिली. यासोबतच सर्व परिस्थितीचा अहवाल तयार करून स्वतः या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना सांगितले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी