शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

कांदा लागवडीकडे शेतकर्‍यांनी फिरविली पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:10 IST

गतवर्षी कांदा बियाण्याला भाव न मिळाल्यामुळे या वर्षीच्या रब्बी हंगामामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी कांदा लागवडीकडे पाठ फिरविली असल्याचे चित्र आहे. 

ठळक मुद्देकांदा बियाण्याला भाव न मिळण्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कइसोली : इसोली परिसरासह या भागात थोड्याफार प्रमाणात का होईना काही शेतकरी कांदा लागवड करून विक्री करण्याचा तर काही शेतकरी खाण्याच्या उपयोगात येणार्‍या कांद्याची लागवड या महिन्यामध्ये करतात; परंतु मागील वर्षी कांदा बियाण्याला भाव न मिळाल्यामुळे या चालु वर्षीच्या रब्बी हंगामामध्ये एकाही शेतकर्‍याने कांदा बियाणे लागवड तर खाण्याचा कांदा या दोन्ही प्रकाराच्या कांदा लागवडीस कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी पाठ फिरविली असल्याचे चित्र दिसत आहे. इसोली परिसरामध्ये धानोरी, सावरखेड खुर्द, सावरखेड बु., मंगरूळ नवघरे, हराळखेड, पिंपरखेड या गावामधील शेतकरी या महिन्यामध्ये रब्बी हंगामातील कांदा पिकाची लागवड करीत असतात. नगदी पैशाचे पीक म्हणून कांद्याच्या बियाण्याला ७0 ते ८0 हजार रुपये क्विंटल या दराने भाव असतो. असे कांदा बियाणे या महिन्यामध्ये नाशिक, कळवळ, जालना, निफाड अशा बाहेरील जिल्ह्यामधून कांदा विकत आणून त्याची लागवड करतात. त्यावरील खर्च पाहता कांदा लागवड करून बियाणे मात्र हमीभाव नसल्याने तर मागील वर्षी ७0 ते ८0 हजार रुपये क्विंटल दराने आपणाकडून कांदा बियाणे विकत घेतल्या जाईल, असे व्यापारी कांदा बियाणे देतावेळी करार हा शेतकर्‍यांसोबत करतो; मात्र सदर व्यापार्‍यांनी कांदा बियाण्याला भाव नसल्याचे कारण सांगत तो यावर्षी १७ ते १८ हजार रुपये दराने विक्री करून घेतला, त्यामुळे त्याचा खर्च पाहता सदर कांदा बियाणे लागवड शेतकर्‍यांना न परवडणारा असल्याने या परिसरातील शेतकर्‍यांनी अजूनही कांदा लागवड केली नाही. तर हराळखेड येथील काही शेतकर्‍यांनी तर कांदा लागवड करण्यासाठी नाशिक, निफाड, कळवळ येथील व्यापार्‍यांशी संवाद साधला की कांदा विकत घेतो, परंतु ठरल्याप्रमाणे त्याचे बियाणे घ्यावे लागेल, मात्र व्यापार्‍यांनी जे भाव ठरतील त्याच भावाने तुम्हाला कांदा बियाणे घ्यावे लागेल. त्यामुळे सदर कांदा लागवडीचा खर्च, फवारणी, इत्यादी त्यावर होणारा खर्च न परवडणारा असल्याने नकार दिला. हराळखेड संग्राह तलावातील पाणी उपसा शासकीय अधिकार्‍यांनी बंद केला तर एम.एस.ई.बी.ने त्यावरील वीज पुरवठा खंडित केला, त्यामुळे ओलीताचे होणारे क्षेत्र कमी झाले आहे, तसेच मागील वर्षी तयार झालेले बियाणे कमी भावाच्या अभावामुळे सदर बियाणे घरात पडून असल्यामुळे इसोली या परिसरातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी कांदा लागवडीसाठी पाठ फिरविली असून, अद्याप पावेतो लागवड झाली नसल्याचे दिसून येत आहे. -

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला काँग्रेस सेवादलाचा मोर्चा!कोट्यवधींचा भ्रष्टाचार करणार्‍या ‘आरएफओ’वर कारवाईची मागणीजिल्हा कार्याध्यक्ष मोहन बाभुळकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादरलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शासनाच्या पैशाचा दुरूपयोग करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या जळगाव जामोद येथील आरएफओ विरुद्ध कारवाई करावी, यासह इतर मागण्यांसाठी काँग्रेस सेवादलाचे जिल्हा कार्याध्यक्ष मोहन बाभुळकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.स्थानिक गांधी भवन येथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर काँग्रेस सेवादलाचे मोहन बाभुळकर, गौतम मोरे, अभय मोरे, प्रवीण गाडेकर, तुळशीरावम नाईक, नीलेश हरकल, शेख मुजूभाई, शैलेश खेडेकर, अँड.विशाल गवई आदींनी जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात नमूद केले आहे की, जळगाव जामोद येथील आरएफओ कांबळे यांनी पदाचा दुरूपयोग करून शासनाच्या पैशाचा दुरूपयोग करून वरिष्ठ अधिकार्‍यांशी संगनमत करून भ्रष्टाचार केला आहे. याबाबत दखल घेऊन सोनाळा येथे शेतकर्‍याच्या शेतात पुरलेले अस्वल प्रकरण, सोनबर्डी बिटमध्ये कुजलेले अस्वल आढळले, एकामागे एक तीन अस्वल कुजलेल्या अवस्थेत सापडले, तरीसुद्धा कार्यवाही शून्य आहे. त्यामुळे अस्वलाच्या अवयवांची तस्करी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मौजे मेढामारी कंपार्टमेंटमध्ये ३.७0 हे.आर. अतिक्रमणाबाबत कारवाईस टाळाटाळ होत आहे. कंपार्टमेंट ६२१ मध्ये २0 मेंढपाळांचे कुटुंब तीन हजार मेंढय़ांसह, जळगाव जामोद वनक्षेत्रात काठेवाडी गुरे दोन हजार गायी व १0 कुटुंबे राहतात. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, असे नमूद केले आहे. या मोर्चात जवळपास १५0 पेक्षा जास्त सेवादलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. -

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी