शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

कांदा लागवडीकडे शेतकर्‍यांनी फिरविली पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:10 IST

गतवर्षी कांदा बियाण्याला भाव न मिळाल्यामुळे या वर्षीच्या रब्बी हंगामामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी कांदा लागवडीकडे पाठ फिरविली असल्याचे चित्र आहे. 

ठळक मुद्देकांदा बियाण्याला भाव न मिळण्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कइसोली : इसोली परिसरासह या भागात थोड्याफार प्रमाणात का होईना काही शेतकरी कांदा लागवड करून विक्री करण्याचा तर काही शेतकरी खाण्याच्या उपयोगात येणार्‍या कांद्याची लागवड या महिन्यामध्ये करतात; परंतु मागील वर्षी कांदा बियाण्याला भाव न मिळाल्यामुळे या चालु वर्षीच्या रब्बी हंगामामध्ये एकाही शेतकर्‍याने कांदा बियाणे लागवड तर खाण्याचा कांदा या दोन्ही प्रकाराच्या कांदा लागवडीस कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी पाठ फिरविली असल्याचे चित्र दिसत आहे. इसोली परिसरामध्ये धानोरी, सावरखेड खुर्द, सावरखेड बु., मंगरूळ नवघरे, हराळखेड, पिंपरखेड या गावामधील शेतकरी या महिन्यामध्ये रब्बी हंगामातील कांदा पिकाची लागवड करीत असतात. नगदी पैशाचे पीक म्हणून कांद्याच्या बियाण्याला ७0 ते ८0 हजार रुपये क्विंटल या दराने भाव असतो. असे कांदा बियाणे या महिन्यामध्ये नाशिक, कळवळ, जालना, निफाड अशा बाहेरील जिल्ह्यामधून कांदा विकत आणून त्याची लागवड करतात. त्यावरील खर्च पाहता कांदा लागवड करून बियाणे मात्र हमीभाव नसल्याने तर मागील वर्षी ७0 ते ८0 हजार रुपये क्विंटल दराने आपणाकडून कांदा बियाणे विकत घेतल्या जाईल, असे व्यापारी कांदा बियाणे देतावेळी करार हा शेतकर्‍यांसोबत करतो; मात्र सदर व्यापार्‍यांनी कांदा बियाण्याला भाव नसल्याचे कारण सांगत तो यावर्षी १७ ते १८ हजार रुपये दराने विक्री करून घेतला, त्यामुळे त्याचा खर्च पाहता सदर कांदा बियाणे लागवड शेतकर्‍यांना न परवडणारा असल्याने या परिसरातील शेतकर्‍यांनी अजूनही कांदा लागवड केली नाही. तर हराळखेड येथील काही शेतकर्‍यांनी तर कांदा लागवड करण्यासाठी नाशिक, निफाड, कळवळ येथील व्यापार्‍यांशी संवाद साधला की कांदा विकत घेतो, परंतु ठरल्याप्रमाणे त्याचे बियाणे घ्यावे लागेल, मात्र व्यापार्‍यांनी जे भाव ठरतील त्याच भावाने तुम्हाला कांदा बियाणे घ्यावे लागेल. त्यामुळे सदर कांदा लागवडीचा खर्च, फवारणी, इत्यादी त्यावर होणारा खर्च न परवडणारा असल्याने नकार दिला. हराळखेड संग्राह तलावातील पाणी उपसा शासकीय अधिकार्‍यांनी बंद केला तर एम.एस.ई.बी.ने त्यावरील वीज पुरवठा खंडित केला, त्यामुळे ओलीताचे होणारे क्षेत्र कमी झाले आहे, तसेच मागील वर्षी तयार झालेले बियाणे कमी भावाच्या अभावामुळे सदर बियाणे घरात पडून असल्यामुळे इसोली या परिसरातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी कांदा लागवडीसाठी पाठ फिरविली असून, अद्याप पावेतो लागवड झाली नसल्याचे दिसून येत आहे. -

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला काँग्रेस सेवादलाचा मोर्चा!कोट्यवधींचा भ्रष्टाचार करणार्‍या ‘आरएफओ’वर कारवाईची मागणीजिल्हा कार्याध्यक्ष मोहन बाभुळकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादरलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शासनाच्या पैशाचा दुरूपयोग करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या जळगाव जामोद येथील आरएफओ विरुद्ध कारवाई करावी, यासह इतर मागण्यांसाठी काँग्रेस सेवादलाचे जिल्हा कार्याध्यक्ष मोहन बाभुळकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.स्थानिक गांधी भवन येथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर काँग्रेस सेवादलाचे मोहन बाभुळकर, गौतम मोरे, अभय मोरे, प्रवीण गाडेकर, तुळशीरावम नाईक, नीलेश हरकल, शेख मुजूभाई, शैलेश खेडेकर, अँड.विशाल गवई आदींनी जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात नमूद केले आहे की, जळगाव जामोद येथील आरएफओ कांबळे यांनी पदाचा दुरूपयोग करून शासनाच्या पैशाचा दुरूपयोग करून वरिष्ठ अधिकार्‍यांशी संगनमत करून भ्रष्टाचार केला आहे. याबाबत दखल घेऊन सोनाळा येथे शेतकर्‍याच्या शेतात पुरलेले अस्वल प्रकरण, सोनबर्डी बिटमध्ये कुजलेले अस्वल आढळले, एकामागे एक तीन अस्वल कुजलेल्या अवस्थेत सापडले, तरीसुद्धा कार्यवाही शून्य आहे. त्यामुळे अस्वलाच्या अवयवांची तस्करी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मौजे मेढामारी कंपार्टमेंटमध्ये ३.७0 हे.आर. अतिक्रमणाबाबत कारवाईस टाळाटाळ होत आहे. कंपार्टमेंट ६२१ मध्ये २0 मेंढपाळांचे कुटुंब तीन हजार मेंढय़ांसह, जळगाव जामोद वनक्षेत्रात काठेवाडी गुरे दोन हजार गायी व १0 कुटुंबे राहतात. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, असे नमूद केले आहे. या मोर्चात जवळपास १५0 पेक्षा जास्त सेवादलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. -

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी