शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

खत, बियाण्यांसाठी शेतकर्‍यांची परवड

By admin | Updated: May 26, 2014 00:20 IST

शेतकर्‍यांना बँकेकडून पीककर्ज देण्यास टाळाटाळ; शेतकर्‍यांची खत, बियाण्यांसाठी परवड होत आहे.

मेहकर: खरीप व रब्बी हंगामात अवकाळी पाऊस व गारपीटीने शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. येणार्‍या खरीप हंगामासाठी खत व बियाण्याकरीाता पै पै जुळविण्यास शेतकरी मेटाकुटीस येत आहे. शेतकर्‍यांना बँकेकडूनही पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने शेतकर्‍यांना सावकारांची उंबरठे झिजवावी लागत आहेत. गतवर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच अतवृष्टीने कहर केला होता. त्यानंतर रब्बी पीक चांगले बहरत असतानाच अवकाळी पाऊस व गारपीटीने शेतकर्‍यांचे रब्बी पिकासह भाजीपाला व फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केले. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाने मदतीचा हात दाखविला परंतु त्यातूनही अनेक शेतकरी वंचित राहिले. आता पुन्हा खरीप हंगाम तोंडावर आला असून, त्यासाठी लागणार्‍या खत व बी बियाण्याच्या तयारीला शेतकरी इकडे तिकडे फिरतांना दिसत आहे. बँकांकडूनही शेतकर्‍यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ होत आहे. तर शेतकर्‍यांचे बँकेत खाते असलेल्या शेतकर्‍यांनाही बँकेकडून पीक कर्जासाठी केवळ समोरचीच तारीख दिल्या जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आता सावकारांच्या पायर्‍या झिजविण्यास सुरुवात केली आहे. सावकारही व्याजाची रक्कम अधिक दाखवत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.