शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेत जमीनीचे मुल्यांकन रखडल्याने त्रस्त शेतकऱ्याने केलं विष प्राशन, समृद्धी महामार्गात गेली जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 19:39 IST

समृद्धी महामार्गात गेलेल्या शेत जमीनीच्या मुल्यांकनासाठी कृषी अधिकारी लाच मागत असल्याने त्रस्त झालेल्या किनगाव राजा येथील शेतकरी नंदकिशोर मांटे (४७) यांनी ११ मे रोजी दुपारी आपल्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

दुसरबीड (जि. बुलडाणा) : समृद्धी महामार्गात गेलेल्या शेत जमीनीच्या मुल्यांकनासाठी कृषी अधिकारी लाच मागत असल्याने त्रस्त झालेल्या किनगाव राजा येथील शेतकरी नंदकिशोर मांटे (४७) यांनी ११ मे रोजी दुपारी आपल्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, त्यांच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांचीप्रकृती स्थिर आहे. कृषी अधिकार्यांनी मुल्यांकनासाठी सात लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोपही विष प्राशन केलेल्या शेतकर्याचे बंधू पंजाबराव मांटे यांनी केला आहे.किनगाव राजा येथील नंदकिशोर शंकरराव मांटे यांची तसेच त्यांच्या कुटुंबातील भारत शंकरराव मांटे, वर्षा  पंजाबराव मांटे यांची मिळून पाच एकर शेतजमीन गट नं. २१३ व २१४ मध्ये आहे. मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-मुंबई समृदधी महामार्ग नंदकिशोर मांटे यांच्या शेतातून जातो. त्यामुळे त्यांची जमीन यासाठी अधिग्रहीत केली जाणार आहे.कुटुंबातील प्रमुख व्यक्ती म्हणून जमीन अधिग्रहण व त्यातील बाबींसाठी नंदकिशोर मांटे यांनी शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा केला. सोबतच शेत जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून शेतातील सर्व बाबींचे योग्य मुल्यांकन केले जावे अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र शेतातील आंब्यांच्या बागेचे मुल्यांकनच केले गेले नसल्याचा मांटे कुटुंबियांचा आरोप आहे. या वडीलोपार्जीत शेतात पूर्वी मोसंबीची बाग होती. मात्र मध्यंतरीच्या दुष्काळामुळे ती बाग मोडून आंब्यांची झाडे लावण्यात आली.मात्र मुल्यांकनात ही झाडे डावलण्यात आली. प्रकरणी नंदकिशोर मांटे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. मात्र जमीनीचे व्यवस्थीत मुल्यांकन न झाल्यामुळे त्यांनी ११ मे रोजी दुपारी विषारी औषध प्राशन करून या शेतकर्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. जिल्हाधिकार्यांच्या पत्रानंतरही मुल्यांकन, अधिग्रहण व मोबदल्याची प्रक्रिया पार पडली नाही. त्यातच तालुका कृषी अधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांनी लाचेची मागणी केल्यामुळे त्रस्त होऊन नंदकिशोर मांटे यांनी दुपारी शेतात विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यांनी विष प्राशन केल्याचे समजताच पोलिसांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव राजा तेथून सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालय आणि नंतर जालना येथील रुग्णालयात त्यांना हलविणयात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे त्यांचे भाऊ पंजाबराव मांटे यांनी सांगितले. या प्रकरणी तालुका कृषी अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

आमदार खेडेकरांनीही दिले होते पत्रमांटे कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून स्थानिक आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनीही याबाबत यंत्रणेला पत्र दिले होते. त्यावर जिल्हाधिकारी यांनी तीन एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी यांना पत्र पाठवून संबंधीत प्रकरणात कृषी विभागाने सर्व बाबी तपासून नियमानुसार तत्काळ मुल्यांकन करावे व महसूल उपविभागाचे मुल्यांकनाचे प्रस्ताव तत्काळ जिल्हास्तरीय मुल्यांकन समितीकडे पाठवावेत असे स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतरही मुल्यांकन, अधिग्रहण आणि मोबदल्याची प्रक्रिया पारपडली नाही.

नंदकिशोर मांटे हे विष प्राशन करून किनगाव राजा पोलिस ठाण्यात आले होते. समृद्धी महामार्गात गेलेल्या जमीनीचे योग्य मुल्यांकन होत नाही. त्यासाठी अधिकारी त्रास देत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी विष प्राशन केल्याची माहिती समजताच पोलिस कर्मचार्यांच्या मदतीने त्यांना रुग्णालयातॉ उपचारासाठी हलविण्यात आले. या प्रकरणी किनगाव राजा पोलिसांत अद्याप तक्रार दाखल नाही.(जे. बी. शेवाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, किनगाव राजा)

संबंधीत शेतकर्याकडून चुकीच्या पद्धतीने मुल्यांकन करण्याची गळ घातल्या जात होती. यासंदर्भात आठ मे रोजी ते भेटले होते. तेव्हा जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक कार्यालयालाही संबंधीत प्रकरणाची माहिती  देण्यात आली होती. अनुषंगीक कागदपत्रेही उपलब्ध आहे.(प्रमोद लहाळे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, बुलडाणा)