शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

स्मार्ट सिटीला देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध

By ब्रह्मानंद जाधव | Updated: July 29, 2023 15:48 IST

केंद्र शासनाचा समृद्धी महामार्गालगत स्मार्ट सिटी निर्माण करण्याचा प्रकल्प आहे.

देऊळगाव राजा : समृद्धी महामार्गालगत होणाऱ्या स्मार्ट सिटीला तालुक्यातील गोळेगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. प्रस्तावित स्मार्ट सिटी प्रकल्प रद्द करावा, आमच्या उत्पन्नाचे साधन असलेली शेतजमीन हिरावून घेऊ नये, अशी मागणीच तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

केंद्र शासनाचा समृद्धी महामार्गालगत स्मार्ट सिटी निर्माण करण्याचा प्रकल्प आहे. तालुक्यातील गोळेगाव, निमखेड, सिंदखेडराजा तालुक्यातील सावरगाव तीनही गावातील शेतकऱ्यांच्या हजारो एकर शेत जमिनीवर स्मार्ट सिटीची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे. गोळेगाव येथील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी सिंदखेड राजा यांना निवेदन दिले आहे. या भागातील नागरिकांचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून आहे.

परिसरातील जास्तीत जास्त शेतकरी हे अल्पभूधारक असून त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जमिनीमध्ये पिके घेऊन त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि उपजीविका करतात. त्याचबरोबर मुलांचे पालन पोषण, शिक्षण हे केवळ शेती उत्पन्नावर अवलंबून आहे. त्यामुळे शासनाने प्रस्तावित केलेली नवनगर स्मार्ट सिटी रद्द करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांना सर्व शेतकऱ्यांनी पत्र दिले आहे. यावर वसंत कोल्हे, दिगंबर कोल्हे, जनार्दन कोल्हे, विठ्ठल कोल्हे, सदाशिव कोल्हे, रामेश्वर कोल्हे, राजेंद्र कोल्हे, भास्कर कोल्हे, आबासाहेब कोल्हे, इंदुबाई कोल्हे, सोपान कोल्हे, मच्छिंद्र कोल्हे, विठ्ठल कोल्हे, लक्ष्मण कोल्हे, बाबासाहेब कोल्हे, रवींद्र एडके, संपत कोल्हे अशा एकूण १८४ शेतकऱ्यांनी सह्या केल्या आहेत.

शासनाच्या अटी अमान्य, शेतकऱ्यांचा निर्णय

स्मार्ट सिटीसाठी अधिग्रहित करण्यात येणाऱ्या शेतजमिनी या समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर अधिग्रहीत करण्यात येणार नसून शेतकऱ्यांना दहा वर्ष पिकांचा मोबदला देण्यात येणार आहे. दहा वर्षानंतर अधिग्रहित जमिनीपैकी ३० टक्के एन ए (अकृषक) जमीन परत देण्यात येणार आहे. शासनाच्या या अटी शेतकऱ्यांना अमान्य असल्याचा निर्णय देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा