शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकऱ्यांपुढे मदतीसाठी अडथळ्यांची शर्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 14:43 IST

अर्ज भरण्यापासून फोटो अपलोड करण्याचे कामही शेतकºयांना देण्यात आल्याने शेतकरी गोंधळले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता मदतीसाठी अडथळ्यांची शर्यत सुरू झाली आहे. पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनाच सर्वेच्या कामाला जुंपण्यात आलेले आहे. अर्ज भरण्यापासून फोटो अपलोड करण्याचे कामही शेतकºयांना देण्यात आल्याने शेतकरी गोंधळले आहेत. नुकसानाचे अर्ज भरण्याची ही प्रक्रिया रविवारपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाने सोयाबीन, ज्वारी, कपाशी, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ५३७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी झालेली आहे. परंतू सध्या पावसाने सोयाबीनला कोंब आले आहेत. सुडी लागलेल्या सोयाबीनला बुरशी आलेली दिसून येत आहे. ज्वारी, मका पिकावरही मोड आल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. कपाशीचे बोंडही पावसाने खराब झालेले आहेत. जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकरी सर्वाधिक आहेत. सोयाबीनचा हंगाम अंतीम टप्प्यात असताना पावसाचा तडाखा या पिकाला बसला. त्यामुळे पीक घरात येण्यापूर्वीच हातचे गेले. या नुकसानामुळे शेतकरी चिंताग्रस्त असताना आता मदतीसाठी शेतकºयांना लढा द्यावा लागत आहे. खरीप हंगामापासून पीके जगविण्यासाठी कष्ट करणारा शेतकरी आता नुकसान झाल्याने मदतीसाठी धडपड करीत आहे. सध्या परतीच्या पावसाने झालेलया नुकसानाचे पंचमाने करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतू कागदपत्रांची जुळवा-जुळव करण्यात शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यात पीक विमा काढलेल्या शेतकºयांना नुकसान झालेल्या पिकाबाबत अर्ज भरण्यासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. परंतू या मुदतीमध्ये शेतकºयांना सुट देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या तालुका कृषी कार्यालयांमध्ये शेतकºयांची गर्दी होत आहे. या अर्जाबरोबर नुकसान झालेल्या पिकाचा फोटो मागविण्यात आलेला आहे. परंतू बहुतांश शेतकºयांना फोटो काढण्यासारखे मोबाईल उपलब्ध नाहीत. कागदपत्र वेळेवर उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पावसाने झालेल्या पीक नुकसानाचे पंचनाम सध्या सुरू आहेत. पीक विमा काढलेल्या शेतकºयांना सुरूवातीला ३१ आॅक्टोबरपर्यंत अर्ज मागविले होते. परंतू सध्याही अर्ज स्विकारण्यात येत आहेत. रविवारपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल.- नरेंद्र नाईक,जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी