शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

खरीप हंगाम संपत आल्यावरही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 11:00 IST

Farmers did not get crop loan even after end of kharif season : ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ६१ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.

- संदीप वानखडेलोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : खरीप हंगाम संपत आल्यावरतही ३९ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षाच असल्याचे चित्र आहे. १५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ६१ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच जवळपास ४५ हजार शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.गत काही वर्षांपासून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच गेल्या वर्षी काेराेनामुळे शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले़ परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या साेयाबीनला काेंब फुटले हाेते. लाॅकडाऊनमुळे व्यापारी गावापर्यंत पाेहचू शकले नाही. त्यामुळे, काही व्यापाऱ्यांनी कमी भावात शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी केला. काेराेनाच्या सावटात यावर्षी शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली. गरज असताना पीक कर्ज मिळेल अशी आस शेतकऱ्यांना हाेती. मात्र, हंगाम संपत असतानाही ३९ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, उर्वरीत शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज वाटप करण्याची गरज आहे. सप्टेंबर अखेर पर्यंत कर्ज वाटपाची मुदत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी