शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

शेतकरी कर्जमाफी जिल्हा बँकेच्या पथ्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 01:04 IST

बुलडाणा : आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्याच्या दिशेने जिल्हा  केंद्रीय सहकारी बँक कसोशीने प्रयत्न करीत असतानाच शेतकरी  कर्जमाफीचाही बँकेला मोठा फायदा होणार आहे.

ठळक मुद्दे१५ टक्के ठेवी वाढविण्याचे आवाहन एनपीएत झाली २१ टक्क्यांनी सुधारणा 

नीलेश जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्याच्या दिशेने जिल्हा  केंद्रीय सहकारी बँक कसोशीने प्रयत्न करीत असतानाच शेतकरी  कर्जमाफीचाही बँकेला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे  सद्यस्थितीत  ६४.२१ टक्क्यावर असलेला बँकेचा एनपीए  (अनुत्पादक जिंदगी) मार्च २0१८ अखेर ३0 टक्क्यांच्या आस पास येणार आहे. त्यामुळे बँक पूर्वपदावर येण्याच्या दृष्टीने चांगले  संकेत आहेत. केंद्राची मदत आणि बँकींग परवाना मिळताना  प्रामुख्याने बँकेचा एनपीए दोन वर्षाच्या आत ५0 टक्क्याच्या  खाली आणण्याचे बँकेला उद्दिष्ट देण्यात आले होते.केंद्र सरकारने बँकेला दिलेली मदत ही अनुदान स्वरुपात न देता  ती कर्जस्वरुपात दिली होती. दिलेली ही मदत अनुदान स्वरुपात  परावर्तीत करण्यासाठी बँकेला दोन वर्षाच्या आत एनपीए ५0 ट क्क्यांच्या खाली आणने आणि किमान १५ टक्क्यांनी ठेवीचा रेशो  वाढवावा, अशी अटक टाकण्यात आली होती. त्यादृष्टीने बँकेने  प्रयत्न चालवले असून, ३१ मार्च २0१६ रोजी बँकेचा एनपीए हा  तब्बल ८५.८६ टक्के होता तो मार्च २0१७ मध्ये ६४.२१ टक् क्यांवर आणण्यात बँकेला यश आले आहे. जवळपास २१ टक्क्यांनी यात बँकेने सुधारणा केली आहे.  पहिल्या वर्षी एनपीए २५ टक्कय़ांनी सुधारणे गरजेचे होते; पण या  ठरवून दिलेल्या उद्दिष्ठाच्या जवळपास प्राधिकृत समिती  पोहोचली आहे.अकृषक क्षेत्रात अव्यावहारिक स्तरावर वितरित केलेल्या  कर्जामुळे जिल्हा केंद्रीय सहकारी बँक डबघाईस आली होती.  त्यामुळे निकषावर आधारित चार टक्के तरलतेचे प्रमाण बँकेला  राखण्यात अपयश आले होते. केंद्र सरकारने मदतीची तयारी  दर्शवली होती; पण न्यायालयीन प्रकरणामुळे त्यात अडचण येत  होती. अखेर मदत मिळाल्यामुळे खंडपीठातील प्रकरण निकाली  निघून १३ मे २0१६ ला बँकिंग परवाना मिळाला. आता बँकेची  तरलता ही ९ टक्के आहे. त्यामुळे अडचण नाही. केंद्र सरकारने बँक पूर्वपदावर आणण्यासाठी ५४ कोटी ८३  लाख, राज्य शासनाने १३८ कोटी ४५ लाख आणि नाबार्डने  १३.७२ कोटी रुपयाची मदत बँकेला केली होती.  जवळपास  ६९.९१ कोटी रुपयांची अतिरिक्त मदत बँकेला  मिळाली. २0७  कोटी रुपयांच्या घरात ही मदत जाते.दुसरीकडे शेतकरी कर्जमाफीचीही रक्कम बँकेतील त्यांच्या खा त्यात जमा होत असल्याने बँकेकडील ठेवीही वाढणार आहेत.  त्याचा फायदा बँकेला मिळून बँकेची अनुत्पादक जिंदगी ही मार्च  २0१८ मध्ये ३0 टक्क्यांच्या आसपास राहील. हे बँक पूर्वपदावर  आणण्याच्या दृष्टीने शुभसंकेत आहेत.

ठेवी ५५२ कोटीवर१५ टक्क्यांच्या रेशोमध्ये ठेवी वाढविणे आवश्यक होते. तुलनेत  कमी ठेवी बँकेला मिळाल्या आहेत. ५१९ वरून या ठेवी ५२१  कोटीवर गेल्या आहेत. त्यामुळे  बँकेप्रती शेतकरी व  नागरिकांमध्ये विश्‍वास वाढत आहे.

नवीन ठेवी लगोलग करतात परतबँक पूर्वपदावर येत असली तरी जनमानसात संभ्रम आहे.  त्यामुळे बँकेत नवीन ठेवी ठेवणार्‍यांना त्यांनी ठेव मागितल्यास ती  लगोलग परत दिल्या जाते. यामुळे बँकेविषयी आपुलकीची  जाणीव ग्राहकांमध्ये रुजतेय.  जुन्या ठेवीतून संबंधिताना आजार पण, लग्न, शैक्षणिक कारणासाठी रक्कम दिल्या जात  असल्याचेही बँकेचे कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात  यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

बँंकेचे होणार सक्षमीकरणरिझर्व बँंकेने तोट्यातील बँकांचे विलीनिकरण करण्यास  परवानगी दिलेली नाही. त्यामुळे या बँकांच्या सक्षमीकरणाला  प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी समितीही नियुक्त करण्यात  आली असून याचा जिल्हा बँकेला येत्या काळात फायदा  होण्याची शक्यता आहे. व्यवस्थापन खर्चातही बँकेला एक टक्के  कपात करावी लागणार आहे.

२0१८ चा रिझल्ट अधिक सकारात्मकजिल्ह्यातील दोन लाख ५0 हजार ७४५ शेतकरी कुटुंब  कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. जवळपास १८ कोटी रुपयेही  शेतकर्यांच्या खात्यात जमा झाल्याचे सांगण्यात येत आहेत. या तील बहुतांश रक्कम ही शेतकर्यांची बँक अशी ओळख  असलेल्या जिल्हा बँकेत जमा होणार आहे. त्यामुळे मार्च २0१८  चे रिझल्ट बँकेसाठी अधिक सकारात्मक राहणार असल्याचे  कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात म्हणाले.

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरी