शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

विद्युत टॉवरमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना दुप्पट मोबदला मिळणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:20 IST

बुलडाणा : ३१ मे २0१७ च्या शासन निर्णयानुसार शेतकर्‍यांना नुकसानीचा दुप्पट मोबदला मिळणार आहे, यासाठी प्रत्येक विद्युत टॉवरग्रस्त शेतकर्‍यांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन टॉवर विरोधी कृती समिती, महाराष्ट्रचे अध्यक्ष मिलिंद पाटील व अनिल नागरे यांनी केले आहे.

ठळक मुद्देनुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी अर्ज दाखल करावे - कृती समितीचे अध्यक्ष मिलिंद पाटील

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ३१ मे २0१७ च्या शासन निर्णयानुसार शेतकर्‍यांना नुकसानीचा दुप्पट मोबदला मिळणार आहे, यासाठी प्रत्येक विद्युत टॉवरग्रस्त शेतकर्‍यांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन टॉवर विरोधी कृती समिती, महाराष्ट्रचे अध्यक्ष मिलिंद पाटील व अनिल नागरे यांनी केले आहे.महाराष्ट्र राज्यामध्ये सन २00८ पासून ४00 के.व्ही. व त्यापुढील विद्युत लाइनची कामे सुरू झाली, ही कामे करताना शेतकर्‍यांना नुकसानीचा योग्य मोबदला दिला जात नव्हता. यासाठी टॉवर विरोधी कृती समिती, महाराष्ट्रचे अध्यक्ष मिलिंद पाटील व सरचिटणीस अनिल नागरे यांनी संपूर्ण राज्यात विद्युत टॉवरग्रस्त शेतकर्‍यांना मोबदला मिळावा, यासाठी आंदोलने केली. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात मंत्रालयात जवळपास ४0 बैठका घेतल्या आणि महाराष्ट्र शासनाने ३१ मे २0१७ रोजी जाहीर केले असून, राज्यातील ६६ के.व्ही. व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या अतिउच्चदाब पारेषण वाहिनीच्या व्याप्त जागेच्या मोबदल्यात वाढ करण्याबाबत व वाहिनीच्या तारेखालील जमिनीचा मोबदला देणे बाबतचे धोरण तयार केले आहे. त्यानुसार सदर अर्ज विद्युत टॉवरग्रस्त व विद्युत टॉवरच्या तारेखालील आलेल्या जमिनीच्या नुकसानीचा मोबदला मिळावा, यासाठी अर्ज करावयाचा आहे. चंद्रपूर, नागपूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली, सोलापूर, अहमदनगर, धुळे, जळगाव या जिल्ह्यातून जास्त टॉवर गेले असून, राज्यात एकूण १ लाख ५0 हजार टॉवर असून, २ टॉवरमधील अंतर १ हजार फूट आहे. या दोन टॉवरमध्ये ५/७ शेतकर्‍यांच्या शेतावरून विद्युत तार जाते. राज्यात एकूण ७ ते ८ लाख शेतकर्‍यांना याचा फटका बसलेला आहे.विद्युत टॉवरखाली आलेल्या जमिनीचे क्षेत्र मोजून त्या क्षेत्राच्या दीडपट करून तसेच जमिनीचा त्या भागातील रेडिरेकनरचा दर दुप्पट करून मोबदला द्यायचा आहे. यापूर्वी विद्युत टॉवरग्रस्त शेतकर्‍यांना जो मोबदला देण्यात आला, तो मोबदला पिकाच्या नुकसानीचा असून, जी कंपनी संबंधित काम करीत आहे, त्यांनी दिलेला आहे. त्यांनी जमिनीचे मूल्यांकन काढून नुकसानाचा मोबदला दिलेला नाही. तसेच विद्युत टॉवरग्रस्त शेतकर्‍यांच्या ७/१२ वर टावरची नोंद घेतलेली नाही. आता टॉवरची नोंद ७/१२ वर घेणे बंधनकारक झाले आहे.त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांनी टॉवरची नोंद त्वरित करावी, तसेच ३१ मे २0१७ च्या शासन निर्णयानुसार शेतकर्‍यांना नुकसानाचा मोबदला मिळावा, यासाठी प्रत्येक विद्युत टॉवरग्रस्त शेतकर्‍यांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन टॉवर विरोधी कृती समिती, महाराष्ट्रचे अध्यक्ष मिलिंद पाटील व अनिल नागरे यांनी केले आहे. - 

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरी