शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

विद्युत टॉवरमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना दुप्पट मोबदला मिळणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:20 IST

बुलडाणा : ३१ मे २0१७ च्या शासन निर्णयानुसार शेतकर्‍यांना नुकसानीचा दुप्पट मोबदला मिळणार आहे, यासाठी प्रत्येक विद्युत टॉवरग्रस्त शेतकर्‍यांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन टॉवर विरोधी कृती समिती, महाराष्ट्रचे अध्यक्ष मिलिंद पाटील व अनिल नागरे यांनी केले आहे.

ठळक मुद्देनुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी अर्ज दाखल करावे - कृती समितीचे अध्यक्ष मिलिंद पाटील

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ३१ मे २0१७ च्या शासन निर्णयानुसार शेतकर्‍यांना नुकसानीचा दुप्पट मोबदला मिळणार आहे, यासाठी प्रत्येक विद्युत टॉवरग्रस्त शेतकर्‍यांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन टॉवर विरोधी कृती समिती, महाराष्ट्रचे अध्यक्ष मिलिंद पाटील व अनिल नागरे यांनी केले आहे.महाराष्ट्र राज्यामध्ये सन २00८ पासून ४00 के.व्ही. व त्यापुढील विद्युत लाइनची कामे सुरू झाली, ही कामे करताना शेतकर्‍यांना नुकसानीचा योग्य मोबदला दिला जात नव्हता. यासाठी टॉवर विरोधी कृती समिती, महाराष्ट्रचे अध्यक्ष मिलिंद पाटील व सरचिटणीस अनिल नागरे यांनी संपूर्ण राज्यात विद्युत टॉवरग्रस्त शेतकर्‍यांना मोबदला मिळावा, यासाठी आंदोलने केली. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात मंत्रालयात जवळपास ४0 बैठका घेतल्या आणि महाराष्ट्र शासनाने ३१ मे २0१७ रोजी जाहीर केले असून, राज्यातील ६६ के.व्ही. व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या अतिउच्चदाब पारेषण वाहिनीच्या व्याप्त जागेच्या मोबदल्यात वाढ करण्याबाबत व वाहिनीच्या तारेखालील जमिनीचा मोबदला देणे बाबतचे धोरण तयार केले आहे. त्यानुसार सदर अर्ज विद्युत टॉवरग्रस्त व विद्युत टॉवरच्या तारेखालील आलेल्या जमिनीच्या नुकसानीचा मोबदला मिळावा, यासाठी अर्ज करावयाचा आहे. चंद्रपूर, नागपूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली, सोलापूर, अहमदनगर, धुळे, जळगाव या जिल्ह्यातून जास्त टॉवर गेले असून, राज्यात एकूण १ लाख ५0 हजार टॉवर असून, २ टॉवरमधील अंतर १ हजार फूट आहे. या दोन टॉवरमध्ये ५/७ शेतकर्‍यांच्या शेतावरून विद्युत तार जाते. राज्यात एकूण ७ ते ८ लाख शेतकर्‍यांना याचा फटका बसलेला आहे.विद्युत टॉवरखाली आलेल्या जमिनीचे क्षेत्र मोजून त्या क्षेत्राच्या दीडपट करून तसेच जमिनीचा त्या भागातील रेडिरेकनरचा दर दुप्पट करून मोबदला द्यायचा आहे. यापूर्वी विद्युत टॉवरग्रस्त शेतकर्‍यांना जो मोबदला देण्यात आला, तो मोबदला पिकाच्या नुकसानीचा असून, जी कंपनी संबंधित काम करीत आहे, त्यांनी दिलेला आहे. त्यांनी जमिनीचे मूल्यांकन काढून नुकसानाचा मोबदला दिलेला नाही. तसेच विद्युत टॉवरग्रस्त शेतकर्‍यांच्या ७/१२ वर टावरची नोंद घेतलेली नाही. आता टॉवरची नोंद ७/१२ वर घेणे बंधनकारक झाले आहे.त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांनी टॉवरची नोंद त्वरित करावी, तसेच ३१ मे २0१७ च्या शासन निर्णयानुसार शेतकर्‍यांना नुकसानाचा मोबदला मिळावा, यासाठी प्रत्येक विद्युत टॉवरग्रस्त शेतकर्‍यांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन टॉवर विरोधी कृती समिती, महाराष्ट्रचे अध्यक्ष मिलिंद पाटील व अनिल नागरे यांनी केले आहे. - 

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरी