शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

नाफेडच्या केंद्रावर तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

By admin | Updated: April 17, 2017 00:58 IST

मेहकर- शनिवार १५ एप्रिल रोजी शेतकऱ्यांनी आपला माल नाफेडच्या केंद्रावर विक्रीसाठी आणला होता. तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची केंद्रावर एकच गर्दी झाल्याने काही वेळ चांगलाच गोंधळ उडाला.

मेहकर: नाफेडच्या वतीने तूर खरेदीचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे शनिवार १५ एप्रिल रोजी शेतकऱ्यांनी आपला माल नाफेडच्या केंद्रावर विक्रीसाठी आणला होता. तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची केंद्रावर एकच गर्दी झाल्याने काही वेळ चांगलाच गोंधळ उडाला. दरम्यान आ. संजय रायमुलकर, सभापती माधवराव जाधव आणि तहसीलदार संतोष काकडे यांनी घटनास्थळी जाऊन शेतकऱ्यांची समजूत काढत मालाची नोंद करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना केले. शेतकऱ्यांचा सर्व माल नाफेडने खरेदी करावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आ. रायमुलकर यांनी दिला. नाफेडमार्फत तूर खरेदी सुरू झाल्यानंतर बारदान्याचा तुटवडा निर्माण झाल्याने मध्यंतरी तूर खरेदी बंद झाली होती. त्यावेळी शिवसेना व बाजार समितीने संबंधितांशी चर्चा करून बारदाना उपलब्ध करून दिला होता. ही अडचन सुटत नाही तोच, मेहकरचे धान्य गोदाम फुल्ल झाले होते. तेव्हा नांदुरा येथील गोदामात माल साठविण्याचे ठरले होते. शेतकऱ्यांचा माल दररोज बाजारात येत असल्याने गोंधळ उडू नये म्हणून बाजार समितीने नाव नोंदणीची व्यवस्था सुरू केली होती. या दरम्यान नाफेडने १५ एप्रिल सायंकाळी ५ वाजेपर्यंत तूर खरेदी करण्यात येईल, असा आदेश जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी काढल्याने १५ एप्रिल रोजी शेतकऱ्यांनी एकच गर्दी करून जवळपास ५०० ट्रॅक्टर माल नाफेड खरेदी केंद्रावर आणला होता. आपल नंबर आजच लागावा यासाठी शेतकऱ्यांनी गोंधळ केला. त्यामुळे आ. संजय रायमुलकर, सभापती माधवराव जाधव, दत्ता पाटील शेळके, उप सभापती बबनराव तुपे, खविसचे विनोद बापू देशमुख, रविकुमार चुकेवार, माजी उपजिल्हा प्रमुख दिलीप देशमुख, भास्करराव घोडे, गजानन तात्या कृपाळ, तालुका प्रमुख सुरेश वाळुकर आदींनी तहसीलदार संतोष काकडे यांना बोलावून घेतले. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. त्यानुसार ५ वाजेपर्यंत बाजार समिती यार्डात तूर घेऊन येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांची नाव नोंदणी करण्यात येऊन तूर खरेदी करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. काहीनी पांढरी तूर खरेदी केल्या जात नाही, अशी तक्रार करताच सदर तूर खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले. शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे हे नाफेडचे काम असून, मेहकर तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची तूर नाफेड खरेदी करेल. त्यात अडथळा आल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आ. संजय रायमुलकर यांनी उपस्थित हजारो शेतकऱ्यांसमोर दिला. तसेच शासनाने तूर खरेदीसाठी बारदाना, धान्य गोदाम उपलब्ध करून द्यावे व तूर खरेदीची मुदत वाढवून देण्यात यावी, अशीही मागणी आ. रायमुलकर यांनी केली.