शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

शेतकऱ्यांना ढगाळ वातावरणाची धास्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 11:35 IST

Buldhana, Farmer, Agriculture, Rain गुरूवारी रात्री व शुक्रवारी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मागील वर्षी ऐन सोयाबीन काढण्याच्या हंगामात अवकाळी पावसाचा फटका बसला होता. १५ दिवसांपासून पावसाने विश्रांती दिल्यानंतर आता पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदा सोयाबीनचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकºयांची सोयाबीन काढण्याची धडपड सुरू आहे. गुरूवारी रात्री व शुक्रवारी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.सोयाबनी सोंगणीचा हंगाम सुरू असताना आता पावसाचे वातावरण झाल्याने शेतकºयांची तारांबळ उडाली आहे. शहराच्या मुख्य रस्त्याला लागुनच मोठ्या प्रमाणात मेनकापडाची दुकाने लागलेली दिसून येत आहे. ताडपत्र्यांची दुकाने सजली असून ताडपत्री खरेदीसाठी शेतकºयांची गर्दी वाढली आहे. ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता असल्याने सोयाबीनची सुडी झाकण्यासाठी शेतकरी मेनकापडाची खरेदी करीत आहे. सध्या ताडपत्र्यांचे दर वाढविण्यात आल्याचे दिसून येत आहे. सोयाबीन सोंगणीचा हंगाम आता अंतीम टप्प्यात असल्याने आणि त्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सोयाबीनचे नुकसान होऊ नये, यासाठी सोयाबीन सुडी झाकण्याकरीता शेतकरी ताडपत्र्यांची खरेदी करताना दिसून येत आहेत. बुलडाणा जिल्ह्यामध्ये जालना, आरंगाबाद येथून ताडपत्र्यांचा माल येतो. लॉकाडाऊन काळात यंदा माल येऊ शकला नाही. त्यामुळे सध्या मागील वर्षीचाच माल विक्रीसाठी वापरल्या जात आहे. सध्या ६५ रुपय मिटरने ताडपत्र्यांची विक्री होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीRainपाऊसFarmerशेतकरी