शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
4
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
5
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
6
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
7
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
8
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
9
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
10
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
11
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
12
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
13
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
14
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
15
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
16
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
17
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
18
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
19
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
20
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान

शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच नाही- आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 5:53 PM

मेहकर : राज्यात सरकारने कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र अद्यापपर्यंत शेतकºयांची कर्जमाफी झाली नाही. तरी आजही ‘अच्छे दिन आणेवाले है’ हे आपण एैकतो. शिवसेनेसाठी समाजकारण हेच महत्वाचे आहे. शिवसेनेने ज्या ज्या ठिकाणी राजकारण केले असेल त्या ठिकाणचे खासदार, आमदार यांनी लोकांच्या सेवेसाठीच राजकारण केले, असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : राज्यात सरकारने कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र अद्यापपर्यंत शेतकºयांची कर्जमाफी झाली नाही. तरी आजही ‘अच्छे दिन आणेवाले है’ हे आपण एैकतो. शिवसेनेसाठी समाजकारण हेच महत्वाचे आहे. शिवसेनेने ज्या ज्या ठिकाणी राजकारण केले असेल त्या ठिकाणचे खासदार, आमदार यांनी लोकांच्या सेवेसाठीच राजकारण केले, असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.  स्थानिक स्वातंत्र्य मैदानावर सोमवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. प्रतापराव जाधव हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, दत्ता पाटील, भास्करराव मोरे, शांताराम दाणे, आशिष रहाटे, माजी नगराध्यक्ष संजय जाधव आदी उपस्थित होते. आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेनेचा जन्म हा राजकारणासाठी नाही तर सेवेसाठी झाला. शिवसेनेने २०१२ मध्ये मुंबई येथे ७५ गावांना पाणीटँकर, धान्य दिले. २०१३-१४ मध्ये मराठवाड्यात ४०० गावांना मदत केली. बिडमध्ये सर्व जातीधर्माच्या लोकांचे सामूहीक विवाह सोहळा आयोजित करून १११ जोडप्यांचे लग्न लावले. यापुर्वी मार्च ते एप्रिल या महिन्यात दुष्काळ असायचे; मात्र आता आॅक्टोबर पासूनच राज्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. शेतकºयांना ते म्हणाले की, आत्महत्याचा विचार कधी मनात आणू नका. मदतीची हाक मारायची असेल तर सेनेला हाक मारा ती तुमच्यासाठी धावून येईल. कधी रडायचं नाही, लढायचं. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त लोकांना दिलेले मदतीचे त्यांनी कौतूक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवासेनेचे ऋषी जाधव यांनी केले. आ. डॉ. संजय रायमुलकर यांनीही यावेळी मतदार संघात शेतकºयांसाठी केलेले कार्याची माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना संसार उपयोगी वस्तू आदित्य ठाकरे यांच्याहस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सेना शहरप्रमुख जयचंद बाठीया यांनी  केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेना तालुकाप्रमुख सुरेश वाळुकर, बळीराम मापारी, पांडुरंग सरकटे सह शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले. यावेळी आत्महत्या केलेल्या शेतकºयांना श्रध्दांजली अर्पण करून राष्टÑगिताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी राष्टÑवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांचे शिवसेनेत प्रवेश करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)       जिल्ह्यात ५५० आत्महत्याग्रस्त परिवाराला मदत -जाधव    विदर्भात ज्या शेतकºयांनी आत्महत्या केल्या त्या शेतकºयांना मदतीचा हात प्रत्यक्ष कोणी दिला नाही. शिवसेनाच त्यांचे अडीअडचणीत धावून गेली व आत्महत्याग्रस्त परिवाराला मदत केली. जिल्ह्यात ५५० आत्महत्याग्रस्त परिवाराला मदत करण्यात आली असून, शेतकºयांच्या कुटुंबासाठी शिवसैनिक सदैव तत्पर आहे, असे प्रतिपादन खा. प्रतापराव जाधव यांनी केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाMehkarमेहकर