शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

शेतकर्‍यांचे लक्ष विचलित करण्यासाठी बाजार समितीवर खोटे आरोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:16 IST

चिखली: महाराष्ट्रातील शेतकरी आजरोजी सोयाबीन, तूर, ऊस,  उडीद आदी शेतमालाला भाव मिळावा यासाठी झगडत आहे. या  शेतमालाला आघाडी सरकारच्या काळात मिळत असलेल्या  भावाच्या निम्मा भावदेखील भाजपा सरकारकडून सोयाबीनला  मिळत नाही, ही वस्तुस्थिती असल्याने शेतकर्‍यांच्या मनात तीव्र  असंतोष खदखदत आहे.

ठळक मुद्दे भ्रष्टाचार पुराव्यानिशी सिद्ध करण्याचे संचालकांचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: महाराष्ट्रातील शेतकरी आजरोजी सोयाबीन, तूर, ऊस,  उडीद आदी शेतमालाला भाव मिळावा यासाठी झगडत आहे. या  शेतमालाला आघाडी सरकारच्या काळात मिळत असलेल्या  भावाच्या निम्मा भावदेखील भाजपा सरकारकडून सोयाबीनला  मिळत नाही, ही वस्तुस्थिती असल्याने शेतकर्‍यांच्या मनात तीव्र  असंतोष खदखदत आहे, यापासून शेतकर्‍यांचे लक्ष विचलित  करण्यासाठीच बाजार समितीकडे शेतकर्‍यांच्या निवास व  नाममात्र दरात भोजनाची मागणी करण्याचा पुळका श्‍वेता महाले  दाखवित असून, त्यांनी बाजार समितीवर केलेले आरोप  पुराव्यानिशी सिद्ध करावे, असे आव्हान बाजार समिती सभापती,  उपसभापतींसह संचालकांनी दिले आहे.श्‍वेता महाले यांनी केलेली मागणी व बाजार समिती प्रशासनावर  केलेल्या आरोपाच्या पृष्ठभूमीवर बाजार समिती संचालकांनी ६  नोव्हेंबर रोजी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे महाले यांना हे आवाहन  केले आहे. यानुषंगाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात  आले आहे की, चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शे तकर्‍यांना निवास व नाममात्र दरात भोजन देण्याबाबत यापूर्वी पासून माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व आ. राहुल बोंद्रे यांच्या  मार्गदर्शक सूचनेवरून समिती प्रशासन प्रयत्नशील आहे व य थावकाश त्याबाबत कारवाई ही होणारच आहे. मात्र, तत्पूर्वी शेतकर्‍यांना समितीतील निवास व भोजनाऐवजी  सर्व कुटुंबाच्या पालनपोषणासाठी आपल्या शेतमालाला योग्य  भाव हवा आहे. तो सरकारने द्यावा जेणेकरून, जगाला पोसणार्‍या शेतकर्‍याला  अशा नाममात्र दरातील भोजनाची गरज भासणार नाही आणि  यासाठी श्‍वेता महाले यांनी त्यांचे वजन सरकार दरबारी वापरावे  व तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम शेतकर्‍यांना दिलासा  द्यावा, असे आवाहन करण्यासोबतच, शेतकर्‍यांप्रती पुळका  दर्शविणार्‍या व बाजार समिती राजकारण व भ्रष्टाचाराचा अड्डा  बनल्याचा आरोप करणार्‍या महाले यांनी भाजपाची राज्यात व  केंद्रात सत्ता असल्याने या सत्तेचा सदुपयोग घेऊन समितीत  भ्रष्टाचार उघडीस आणावा. भ्रष्ट पदाधिकारी व संचालकांवर  कारवाई करून बाजार समिती बरखास्त करावी, केवळ प्रसिद्धी  माध्यमांत सवंग प्रसिद्धीसाठी बिनबुडाचे आरोप करू नयेत, वास् तवात भाजपाच शेतकर्‍यांप्रती खोटा कळवळा दाखवित असून,  शेतमालाला अशाच प्रकारे कमी भाव देत राहिलात तर खरोखरच  शेतकर्‍यांना स्वत:चे घरदार विकून देशोधडीला लागावे लागणार  आणि त्यांना निवास व नाममात्र दरातील भोजनाची गरज  भासणार असल्याची बहुधा महाले यांना जाणीव झाली  असल्यानेच त्यांनी ही मागणी केली असावी, अशी उपरोधीत  टीकादेखील बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, उ पसभापती ज्ञानेश्‍वर सुरूशे, संचालक विष्णू पाटील, सचिन  शिंगणे, संजय गाडेकर, विजय शेजोळ, रूपराव सावळे, अशोक  मगर, राजू जावळे, सुमन म्हस्के, पुष्पा पडघान, ईश्‍वर इंगळे,  गजानन मोरे, दीपक जाधव, गजानन पवार, मनोज खेडेकर आदी  संचालकांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMarketबाजार