शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

नेत्रदानात महिलांचा टक्का वाढला!

By admin | Updated: June 10, 2015 02:41 IST

दिन विशेष ; १५0 महिलांचा नेत्रदानाचा संकल्प.

अनुराधा जाधव / बुलडाणा : 'डोळे हे मनाचा आरसा' असे म्हटले जाते. या उक्तीप्रमाणे डोळे आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वपूर्ण भाग असून, डोळे नसतील तर आयुष्यच बेरंग होऊन जाते. नेत्रदानाचे महत्त्व जाणून जिल्ह्यातील १५0 जागृत महिलांनी आपल्यानंतर हे सुंदर जग दुसर्‍या कुणाला स्वत:च्या डोळय़ाने पाहता यावे याकरिता नेत्रदान करण्याचा संकल्प करून सामाजिक दायित्व जोपासले आहे. नेत्रदानासाठी संपूर्ण भारतात मोहीम राबविली जात असताना अनेक सामाजिक संस्थासुद्धा शिबिरांच्या माध्यमातून याविषयी प्रबोधन करताना आढळून येतात. जिल्हा सामान्य रुग्णालयात गत वर्षभरात जवळपास ६५0 स्त्री व पुरुषांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला. यामध्ये १५0 स्त्रिया आणि ५00 पुरुषांनी आपली नावे नोंदविली. इतर अवयव दान करण्याबरोबरच नेत्रदानामुळे आपले डोळे आपल्या मृत्यूनंतर गरजू व्यक्तीच्या कामी येईल. या भावनेतून नेत्रदानाचा संकल्प केल्यानंतर जिल्ह्यातील लोकांमध्ये जनजागृती होताना दिसत आहे. मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठी १८ ते ४0 वयोगटातील कोणतीही व्यक्ती संकल्पपत्र भरून आपली इच्छा पूर्ण करू शकतो. अशी व्यक्ती अपघातात किंवा नैसर्गिकरीत्या मरण पावली असता त्या व्यक्तीचे डोळे सहा तासाच्या आत काढल्यास त्याचा उपयोग दृष्टिहीन व्यक्तीला होतो. डोळ्याचे रोपन करण्याआधी त्याच्या आजाराची योग्य ती तपासणी करण्यात येऊन डोळय़ाची अवस्था निरोगी आढळून आली तरच ते रोपन केल्या जाते. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही या माहिमेची जागृती होणे आवश्यक असून, सामाजिक संस्थेबरोबरच आरोग्य विभागानेही याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामीण भागात नेत्रदात्याचे प्रमाण कमी असण्याचे कारण म्हणजे त्यांच्यामध्ये असलेली अंधश्रद्धा व नेत्रदानाविषयी असलेले अज्ञान, पुनर्जन्मावर असलेला ठाम विश्‍वास यामुळे ते लोक नेत्रदान करण्यास धजावत नाहीत. नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान कसे आहे, याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.