मुंबई : वाहतूक पोलिसांनी ‘ऑपरेशन ईगल’ या विशेष मोहिमेत मुंबईतील 51 हजार नियम तोडणा:या बेशिस्त चालकांविरोधात कारवाई केली. 28 मे 15 जून या कालावधीत शहरात पार पडलेल्या कारवाईत 44.15 लाख रुपयांचा दंड जमा करण्यात आला. नो पार्किग, सिग्नल तोडणो, नो एण्ट्री अशा विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
‘ऑपरेशन ईगल’अंतर्गत वाहतूक पोलिसांनी शहरातील 25 ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली. या ऑपरेशनसाठी काम करणा:या प्रत्येक टीममध्ये एक अधिकारी आणि सात ते आठ पोलीस शिपायांचा समावेश होता. या ऑपरेशनदरम्यान काही वाहतूक अधिकारी साध्या गणवेशात होते. कारवाईच्यावेळी चालकांनी नियम मोडल्याचे लक्षात येताच हे अधिकारी काही अंतरावर उभ्या असणा:या सहका:यांना याची सूचना देत असत. ‘ऑपरेशन ईगल’ची ही कारवाई सकाळी आठ ते रात्रौ आठर्पयत यावेळेत पार पडली.
ऑपरेशन ईगलमध्ये एकूण 51 हजार 47 चालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यात 22 हजार 293 चालकांनी हेल्मेट घातले नव्हते, तर 17 हजार 2क्3 चालकांनी वाहतुकीदरम्यान सिग्नल तोडला. कारवाईत 7 हजार 591 चालकांनी ङोब्रा क्रॉसिंग नियम आणि 3 हजार 768 चालकांनी ‘नो एण्ट्री’ नियमाचे उल्लंघन केले. वाहतुकीचे व्यवस्थापनाचेही इतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 192 चालकांविरोधात कारवाई केली. या मोहिमेदरम्यान आजही शहरातील अनेक चालक सर्रास वाहतुकीचे नियम मोडताना दिसले. त्यामुळे याप्रमाणोच काही विशेष ऑपरेशन भविष्यात राबविण्यात येतील, असे डॉ. बी. के. उपाध्याय, सहपोलीस आयुक्त यांनी सांगितले.