शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

जिल्ह्यातील टरबुजांची गुजरात, दिल्लीला निर्यात; ट्रान्सपोर्ट खर्च निघूनही मिळतो जास्त भाव

By विवेक चांदुरकर | Updated: March 30, 2024 15:05 IST

ट्रान्सपोर्ट खर्च वगळूनही शेतकर्यांना चांगला भाव मिळत असल्याने शेतकर्यांचा भर गुजरात व दिल्लीकडे टरबुज पाठविण्यावर आहे.

खामगाव : सिंचनाची सुविधा असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी आता टरबुजाची शेती करण्याकडे वळले आहेत. शेकडो हेक्टरवर टरबुजांची लागवड करण्यात आली असून, गुजरातदिल्लीला निर्यात करण्यात येत आहे. ट्रान्सपोर्ट खर्च वगळूनही शेतकर्यांना चांगला भाव मिळत असल्याने शेतकर्यांचा भर गुजरातदिल्लीकडे टरबुज पाठविण्यावर आहे.

विविध सिंचन प्रकल्प व विहिरींमध्ये पाणी असल्याने जिल्ह्यातील शिरला नेमाणे, अडगाव खुर्द, राहे, पिंपळखूटा, सावनी, पिंपळराव राजा, माटरगाव, वाडेगाव, या भागात टरबुजाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. केवळ ७० ते ७५ दिवसांचे पीक असल्याने शेतकरी एका वर्षात तीन पिके घेवू शकतात. खरीप व रब्बी हंगामातील पिकांसह अनेक शेतकरी टरबुजाची लागवड करण्याकडे वळले आहेत. केवळ दोन ते अडीच महिन्यात शेतकर्यांना लाखो रूपयांचा फायदा होतो. त्यामुळे अनेक शेतकरी टरबुजांची लागवड करतात. उन्हाळ्यामध्ये टरबुजांना विशेष मागणी असते. जिल्ह्यात टरबुजांना ७ ते ८ रूपयांना मागणी आहे. तर गुजरात व दिल्लीमध्ये टरबूज पाठविले तर शेतकर्यांना १५ ते १६ रूपये प्रती टरबूज मिळत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात टरबुजांची मागणी असल्याने ट्रक भरून शेतकरी टरबूजांची निर्यात करीत आहेत. दररोज ट्रकव्दारे टरबुजांची निर्यात करण्यात येत आहे.

एकरी ७० हजार रूपये खर्चटरबुजाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच टरबुजाची लागवड करण्याकरिता लागणारे बियाणे, खत व विविध साहित्याचे दरही वाढले आहेत. एका एकराकरिता जवळपास ७० हजार रूपये खर्च येतो. पीक कमी दिवसाचे असून टरबुजाला मागणी असल्याने शेतकरी लागवड करण्यावर भर देत आहेत.जिल्ह्यात तसेच आपल्या भागात टरबुजांची विक्री केली तर दर कमी मिळतो. मात्र गुजरात व दिल्लीला टरबुजांची निर्यात केल्यावर जास्त दर मिळत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात टरबुजांची खरेदी करण्यात येते. शेतातून टरबुज गुजरातला पाठविण्यात येतात. शेतकर्यांना परवडत असल्याने अनेक शेतकरी निर्यात करण्यावर भर देत आहेत.- इश्वर पाचपोर टरबूज उत्पादक, शेतकरी

मल्चिंग पेपरचे दर वाढले मल्चिंग पेपरचेही दर वाढले -टरबुजाची शेती करण्याकरिता लागणार्या मल्चिंग पेपरचे दर वाढले आहेत. मल्चिंग पेपर पूर्वी १२०० रूपयांना मिळत होता तर आता १७५० रूपयांना मिळत आहे. महागाइ वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्या तुलनेत टरबुजांच्या भावात वाढ झाली नाही. दरवर्षी खताच्या भावात वाढ होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीGujaratगुजरातdelhiदिल्ली