शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जिल्ह्यातील टरबुजांची गुजरात, दिल्लीला निर्यात; ट्रान्सपोर्ट खर्च निघूनही मिळतो जास्त भाव

By विवेक चांदुरकर | Updated: March 30, 2024 15:05 IST

ट्रान्सपोर्ट खर्च वगळूनही शेतकर्यांना चांगला भाव मिळत असल्याने शेतकर्यांचा भर गुजरात व दिल्लीकडे टरबुज पाठविण्यावर आहे.

खामगाव : सिंचनाची सुविधा असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी आता टरबुजाची शेती करण्याकडे वळले आहेत. शेकडो हेक्टरवर टरबुजांची लागवड करण्यात आली असून, गुजरातदिल्लीला निर्यात करण्यात येत आहे. ट्रान्सपोर्ट खर्च वगळूनही शेतकर्यांना चांगला भाव मिळत असल्याने शेतकर्यांचा भर गुजरातदिल्लीकडे टरबुज पाठविण्यावर आहे.

विविध सिंचन प्रकल्प व विहिरींमध्ये पाणी असल्याने जिल्ह्यातील शिरला नेमाणे, अडगाव खुर्द, राहे, पिंपळखूटा, सावनी, पिंपळराव राजा, माटरगाव, वाडेगाव, या भागात टरबुजाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. केवळ ७० ते ७५ दिवसांचे पीक असल्याने शेतकरी एका वर्षात तीन पिके घेवू शकतात. खरीप व रब्बी हंगामातील पिकांसह अनेक शेतकरी टरबुजाची लागवड करण्याकडे वळले आहेत. केवळ दोन ते अडीच महिन्यात शेतकर्यांना लाखो रूपयांचा फायदा होतो. त्यामुळे अनेक शेतकरी टरबुजांची लागवड करतात. उन्हाळ्यामध्ये टरबुजांना विशेष मागणी असते. जिल्ह्यात टरबुजांना ७ ते ८ रूपयांना मागणी आहे. तर गुजरात व दिल्लीमध्ये टरबूज पाठविले तर शेतकर्यांना १५ ते १६ रूपये प्रती टरबूज मिळत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात टरबुजांची मागणी असल्याने ट्रक भरून शेतकरी टरबूजांची निर्यात करीत आहेत. दररोज ट्रकव्दारे टरबुजांची निर्यात करण्यात येत आहे.

एकरी ७० हजार रूपये खर्चटरबुजाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच टरबुजाची लागवड करण्याकरिता लागणारे बियाणे, खत व विविध साहित्याचे दरही वाढले आहेत. एका एकराकरिता जवळपास ७० हजार रूपये खर्च येतो. पीक कमी दिवसाचे असून टरबुजाला मागणी असल्याने शेतकरी लागवड करण्यावर भर देत आहेत.जिल्ह्यात तसेच आपल्या भागात टरबुजांची विक्री केली तर दर कमी मिळतो. मात्र गुजरात व दिल्लीला टरबुजांची निर्यात केल्यावर जास्त दर मिळत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात टरबुजांची खरेदी करण्यात येते. शेतातून टरबुज गुजरातला पाठविण्यात येतात. शेतकर्यांना परवडत असल्याने अनेक शेतकरी निर्यात करण्यावर भर देत आहेत.- इश्वर पाचपोर टरबूज उत्पादक, शेतकरी

मल्चिंग पेपरचे दर वाढले मल्चिंग पेपरचेही दर वाढले -टरबुजाची शेती करण्याकरिता लागणार्या मल्चिंग पेपरचे दर वाढले आहेत. मल्चिंग पेपर पूर्वी १२०० रूपयांना मिळत होता तर आता १७५० रूपयांना मिळत आहे. महागाइ वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्या तुलनेत टरबुजांच्या भावात वाढ झाली नाही. दरवर्षी खताच्या भावात वाढ होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीGujaratगुजरातdelhiदिल्ली