शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

प्रत्येक चांगला व्यक्ती हा साध्या वेषातील पोलिसच! - हेमराजसिंह  राजपूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 18:02 IST

कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक स्वास्थ बिघडणार नाही, याची काळजी घेणारा प्रत्येक जण साध्या वेषातील पोलिस आहे.

- अनिल गवईखामगाव : समाजातील प्रत्येकानं कायद्याचे पालन करण्याची सुरूवात स्वत:पासून करावी. कायद्याविषयी आदर आणि इतरांना त्रास होणार नाही, अशी प्रत्येकाची भावना असली की, सृजनशील समाजाची निर्मिती व्हायला वेळ लागत नाही. नागरिकांच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळं पोलिसांनाही कायदा आणि सुव्यवस्था राखणं सोपं जाते आणि पर्यायाने याचा  सकारात्मक फायदा समाजालाच होतो. अप्पर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्याशी  साधलेला संवाद... 

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजनेबाबत काय सांगाल? - गुन्हेगारीवर नियत्रंणासाठी पोलिसांचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. समाजातील जागरूक नागरिक म्हणून, एखाद्या गुन्ह्याविषयी तसेच गोपनिय माहिती सामान्य व्यक्ती पोलिसांना सांगू शकतात. समाजातील ( सामान्यांकडून )साध्या वेशातील पोलिसांकडून प्राप्त माहितीच्या आधारे योग्य ती कारवाई केली जाईल! पोलिसांना संदेश देणाºयांचे नावाबाबत गुप्तता पाळली जाईल.

लग्नाच्या मिरवणुकीसाठी पोलिसांच्या परवानगी संदर्भात आपली भूमिका काय?  - लग्नाच्या वरातीत अनेक ठिकाणी अनुचित प्रकार घडण्याचे प्रकार वाढीस लागलेत. अनेक ठिकाणी डीजेच्या तालावर लग्नाच्या मिरवणुकी काढल्या जातात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी तसेच कुठेही अनुचित प्रकार घडता कामा नये, यासाठी प्रशासकीय बाब म्हणून पोलिस प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून गुन्हे दाबल्या जातात का? - निश्चितच नाही! पोलिस आपली ड्युटी चोख बजावतात. एखादी घटना अथवा प्रकार दाबल्याची तक्रार आल्यास वरिष्ठांच्या सूचनेवरून प्रामाणिक चौकशी केली जाते. खामगाव येथील एका प्रकरणाचीही नि:पक्ष चौकशी सुरू आहे. पोलिसांची प्रतिमा मलिन होईल, असे कोणतेही कृत्य पोलिसांकडून होत नाही! संवेदशील म्हणून खामगावची ओळख पुसण्यात यश येतंय का?.- निश्चितच...पूर्वी खामगाव शहराची संवेदनशील शहर म्हणून ओळख होती. मात्र, गत काही वर्षांत पोलिस आणि नागरिकांच्या सकारात्मक भूमिकेमुळे खामगाव शहराची शांतप्रीय शहर म्हणून ओळख निर्माण होतेय.  ही आपल्या दृष्टीकोनातून सकारात्मक बाब असून, खामगाव शहराची शांततेकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते. आगामी काळात खामगाव शहराच्या शांततेला कुणाचीही वाकडी नजर पडणार नाही, याची समाजातील प्रत्येक घटकाने खबरदारी घेणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखतPoliceपोलिस