शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

पावसाचे दोन महिने लोटले, तरी १८ गावांची तहान अधिग्रहीत विहिरींवर

By ब्रह्मानंद जाधव | Updated: August 10, 2023 17:06 IST

उन्हाळ्यात तालुक्यातील ३६ गावांत पाणीटंचाई निवारणार्थ पंचायत समितीने वेळीच उपाययोजना करत विहिरींचे अधिग्रहण केले होते.

चिखली : पावसाळ्यातील दोन महिने उलटूनही पुरेसा पाऊस झालेला नसल्याने तालुक्यातील १८ गावांत उन्हाळा लागल्यापासून उद्भवलेली पाणी टंचाईची झळ अद्यापही कमी झालेली नाही. प्रशासनाने या गावातील पाणीटंचाई निवारणार्थ उन्हाळ्यात अधिग्रहीत केलेल्या विहिरी अद्यापही कायम ठेवलेल्या आहेत. परिणामी १८ गावांतील नागरिकांना पावसाळ्यातही अधिग्रहण केलेल्या विहिरींवरूनच तहान भागवावी लागत आहे.

तालुक्यात यंदा पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. आतापर्यंत सरासरी ४५० मी.मी. पावसाची नोंद होणे अपेक्षित होते. मात्र आजवर केवळ २७१.७ मी.मी. पावसाची नोंद झालेली आहे. अद्याप कुठेही सार्वत्रिक व दमदार स्वरूपाचा पाऊस झालेला नसल्याने अनेक गावात पावसाळ्यातही पाणीटंचाई कायम आहे. यापृष्ठभूमीवर पंचायत समिती प्रशासनास पाणीटंचाई निवारणार्थ पावसाळ्याच्या दिवसातही विहीर अधिग्रहण कायम ठेवण्याची वेळ आली आहे. आजरोजी तालुक्यातील १८ गावात फेब्रुवारी ते मे महिन्यादरम्यान पाणीटंचाई निवारणार्थ केलेल्या उपाययोजनाअंतर्गत अधिग्रहीत विहिर अद्यापही कायम आहेत. याच विहिरींवरून गावांची तहान भागविली जात असल्याने दमदार पावसाची गरज आहे. नसता पाणीटंचाईची दाहकता वाढण्याचे चित्र आहे.

३६ गावांसाठी झाले होते विहिरींचे अधिग्रहण

गत उन्हाळ्यात तालुक्यातील ३६ गावांत पाणीटंचाई निवारणार्थ पंचायत समितीने वेळीच उपाययोजना करत विहिरींचे अधिग्रहण केले होते. दरम्यान, पावसाळा लागल्यानंतर अल्पशा पावसानेही १८ गावांना दिलासा मिळाला आहे. ३६ पैकी १८ गावांमध्ये अधिग्रहीत विहिरींवरून पाणीपुरवठा बंद झालेला आहे. १८ गावांमध्ये आजही अधिग्रहीत विहिरींवरूनच पाणीपुरवठा सुरू आहे.

पाणीटंचाई असलेली गावे

तालुक्यातील बोरगाव वसु, आमखेड, हातणी, बोरगाव काकडे, पेठ, वळती, खोर, सवणा, डासाळा, अमोना, सोमठाणा, खैरव, कोनड खु., बेराळा, धोत्रा भनगोजी, रोहडा, पेठ आणि गांगलगाव या गावांचा पाणीपुरवठा अधिग्रहीत विहिरींवर अवलंबून आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई