शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पावसाचे दोन महिने लोटले, तरी १८ गावांची तहान अधिग्रहीत विहिरींवर

By ब्रह्मानंद जाधव | Updated: August 10, 2023 17:06 IST

उन्हाळ्यात तालुक्यातील ३६ गावांत पाणीटंचाई निवारणार्थ पंचायत समितीने वेळीच उपाययोजना करत विहिरींचे अधिग्रहण केले होते.

चिखली : पावसाळ्यातील दोन महिने उलटूनही पुरेसा पाऊस झालेला नसल्याने तालुक्यातील १८ गावांत उन्हाळा लागल्यापासून उद्भवलेली पाणी टंचाईची झळ अद्यापही कमी झालेली नाही. प्रशासनाने या गावातील पाणीटंचाई निवारणार्थ उन्हाळ्यात अधिग्रहीत केलेल्या विहिरी अद्यापही कायम ठेवलेल्या आहेत. परिणामी १८ गावांतील नागरिकांना पावसाळ्यातही अधिग्रहण केलेल्या विहिरींवरूनच तहान भागवावी लागत आहे.

तालुक्यात यंदा पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. आतापर्यंत सरासरी ४५० मी.मी. पावसाची नोंद होणे अपेक्षित होते. मात्र आजवर केवळ २७१.७ मी.मी. पावसाची नोंद झालेली आहे. अद्याप कुठेही सार्वत्रिक व दमदार स्वरूपाचा पाऊस झालेला नसल्याने अनेक गावात पावसाळ्यातही पाणीटंचाई कायम आहे. यापृष्ठभूमीवर पंचायत समिती प्रशासनास पाणीटंचाई निवारणार्थ पावसाळ्याच्या दिवसातही विहीर अधिग्रहण कायम ठेवण्याची वेळ आली आहे. आजरोजी तालुक्यातील १८ गावात फेब्रुवारी ते मे महिन्यादरम्यान पाणीटंचाई निवारणार्थ केलेल्या उपाययोजनाअंतर्गत अधिग्रहीत विहिर अद्यापही कायम आहेत. याच विहिरींवरून गावांची तहान भागविली जात असल्याने दमदार पावसाची गरज आहे. नसता पाणीटंचाईची दाहकता वाढण्याचे चित्र आहे.

३६ गावांसाठी झाले होते विहिरींचे अधिग्रहण

गत उन्हाळ्यात तालुक्यातील ३६ गावांत पाणीटंचाई निवारणार्थ पंचायत समितीने वेळीच उपाययोजना करत विहिरींचे अधिग्रहण केले होते. दरम्यान, पावसाळा लागल्यानंतर अल्पशा पावसानेही १८ गावांना दिलासा मिळाला आहे. ३६ पैकी १८ गावांमध्ये अधिग्रहीत विहिरींवरून पाणीपुरवठा बंद झालेला आहे. १८ गावांमध्ये आजही अधिग्रहीत विहिरींवरूनच पाणीपुरवठा सुरू आहे.

पाणीटंचाई असलेली गावे

तालुक्यातील बोरगाव वसु, आमखेड, हातणी, बोरगाव काकडे, पेठ, वळती, खोर, सवणा, डासाळा, अमोना, सोमठाणा, खैरव, कोनड खु., बेराळा, धोत्रा भनगोजी, रोहडा, पेठ आणि गांगलगाव या गावांचा पाणीपुरवठा अधिग्रहीत विहिरींवर अवलंबून आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई