शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

चाचण्यांमधील चढउतारानंतरही सरासरी ८०७ जण होताहेत बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:36 IST

बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या एक महिन्यात कोरोना चाचण्यांच्या प्रमाणात चढउतार झाले असले तरी जिल्ह्यात दररोज सरासरी ८०७ जण कोरोना ...

बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या एक महिन्यात कोरोना चाचण्यांच्या प्रमाणात चढउतार झाले असले तरी जिल्ह्यात दररोज सरासरी ८०७ जण कोरोना बाधित येत असल्याचे एकंदरीत चित्र असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा १५ टक्क्यांवर कायम आहे. ३ व ४ मे रोजी कोरोना चाचण्यांची संख्या घटल्यानंतरही या दोन्ही दिवसांचा पॉझिटिव्हिटी रेट हा अनुक्रमे ३४ आणि २४ टक्के राहिला आहे. त्यामुळे या कालावधीत जिल्ह्यात कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. दुसरीकडे ५ मे पर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार ५१ संदिग्धांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याची वर्तमान स्थितीतील लोकसंख्या ही २९ लाख ६४ हजार २२० आहे. त्याच्याशी तुलना करता गेल्या १३ महिन्यात जिल्ह्यातील १६ टक्के नागरिकांच्या कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असल्याचे एकंदरीत चित्र आहे. त्यानुषंगाने जिल्ह्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट हा १५ टक्क्यांवर कायम आहे. जो की डिसेंबर २०२० दरम्यान ११ टक्क्यांच्या आसपास स्थिरावला होता. परिणामी वर्तमान स्थितीत कोरोना संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी आणखी जोरकस प्रयत्न करण्याची अवश्यकता आहे. त्यातच जिल्ह्याचे कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण ३५.३ दिवसावर आले. गेल्या वर्षी हे प्रमाण ८७ दिवसांच्या आसपास होते. त्यानंतर ते ६६ दिवसांवर आले होते. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून बाधितांची संख्या मात्र जिल्ह्यात कमी होत आहे, ही एक सकारात्मक बाब म्हणावी लागेल.

--ग्रामीण भागात चाचण्या कमी--

एका अंदाजानुसार जिल्ह्यातील शहरी भागात जवळपास ५५ टक्क्यांच्या आसपास रुग्ण सापडून येत असले तरी ग्रामीण भागातही हे प्रमाण वाढत आहे. त्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याची अवश्यकता व्यक्त होत आहे. नाही म्हणायला आता आरोग्य विभागाने ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांसाठी गावातच थेट शिबिर घेण्यास प्रारंभ केला आहे. मात्र त्याची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे. तपासणी झालेले अहवाल त्वरित संबंधितांना मिळाल्यास उपाययोजना होऊन कोरोना नियंत्रणात आणण्यास मदत होईल.

--रॅपिड टेस्टवर जोर--

गेल्या १३ महिन्यात जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार ५१ नागरिकांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी ५२ टक्के चाचण्यांसाठी रॅपिड टेस्ट किटचा वापर करण्यात आला तर आरटीपीसीआरद्वारे ४५ टक्के नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. ट्रुनॅटद्वारे अवघ्या तीन टक्के नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.