शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
5
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
6
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
7
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
10
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
11
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
12
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
13
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
14
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
15
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
16
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
17
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
18
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
19
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
20
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

डिसेंबर लागला तरी शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहचले नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 15:03 IST

नळगंगा धरणामध्ये पुरेसा जलसाठा असल्यानंतरही अद्याप पाणी सोडल्या गेले नसल्याने पिकांना पाणी मिळू शकत नसल्याचे वास्तव आहे.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: बुलडाणा जिल्हयातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या नळगंगा प्रकल्पामध्ये १०० टक्के जलसाठा उपलब्ध असल्यानंतरही अद्याप क्षेत्रातील शेतकर्यांच्या बांधावर पाणी पोहचले नसल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे याप्रकाराकडे लोकप्रतिनिधींचे सुद्धा दुर्लक्ष असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.नळगंगा प्रकल्प हा मोताळा तालुक्यात आहे. मलकापूर शहराची तहान भागविण्यासोबत मलकापूर, मोताळा व नांदुरा तालुक्यातील शेतकºयांना रब्बी हंगामाला पाणी यामाध्यमातून उपलब्ध करून दिले जाते. या प्रकल्पाची साठवण क्षमता ९९.६६ द.ल.घ.मी. एवढी आहे. गत पाच वर्षापासून बुलडाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ पडला होता. यामुळे शेतीतून उत्पन्न निघू न शकल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले. याउलट यावर्षी सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने पिकेही चांगली होती. मात्र ऐन पिकांच्या काढणीच्यावेळी अतिवृष्टी झाल्याने शेतकºयांच्या तोंडचा घास हिरावल्या गेला. बुलडाणा जिल्हयातील मलकापूर, नांदुरा, खामगाव, संग्रामपूर व जळगाव या तालुक्यात सर्वाधीक पाऊस झाल्याची नोंद आहे. पावसाने खरिपाचे पिक हातचे गेले आहे. खरीप गेल्याने आता शेतकºयानी रब्बी हंगामापासून अपेक्षा ठेवल्या आहेत. त्यामुळे हरभरा, कांदा, गहू आदी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. नळगंगा धरणामध्ये पुरेसा जलसाठा असल्यानंतरही अद्याप पाणी सोडल्या गेले नसल्याने पिकांना पाणी मिळू शकत नसल्याचे वास्तव आहे.पैसे भरले तरी पाणी मिळेना!नळगंगा प्रकल्पाअंतर्गत ३३ पाणी वापर संस्था कार्यान्वीत आहेत. समित्यांकडे शेतकºयांनी पैसेही भरले. मात्र अद्याप पाणी न मिळू शकल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. कालव्यांची देखभाल दुरुस्ती व साफसफाई बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे. समित्यांचेही प्रतिनिधीही शेतकºयांपैकीच असल्याने त्यांचीही प्रकल्पाच्या अधिकाºयांकडून दिशाभूल केली जात असल्याचे दिसून येते. खरिप गेला आता रब्बीसाठी तरी वेळेवर पाणी मिळावे अशी अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.

यावर्षी शेतकरी आधीच हतबल झाला आहे. त्यात वेळेवर मदत मिळावी ही अपेक्षा आहे. लवकरात लवकर अडचणी सोडवून शेतकºयांना पाणी उपलब्ध करुन द्यावे जेणे करुन रब्बी हंगामासाठी लाभ होवू शकेल.- निनाजी फरपट,शेतकरी, सिरसोडी

नळगंगा प्रकल्पाअंतर्गत जवळपास ३३ पाणी वापर संस्था येतात. कालव्यांची साफसफाई बाकी आहे. लवकरच हे काम सुरु होईल. शेतकºयांना २० डिसेंबरपासून पाणी मिळेल.- शरद नागरे,शाखाधिकारी,नळगंगा प्रकल्प.

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरीDamधरण