शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

डिसेंबर लागला तरी शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहचले नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 15:03 IST

नळगंगा धरणामध्ये पुरेसा जलसाठा असल्यानंतरही अद्याप पाणी सोडल्या गेले नसल्याने पिकांना पाणी मिळू शकत नसल्याचे वास्तव आहे.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: बुलडाणा जिल्हयातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या नळगंगा प्रकल्पामध्ये १०० टक्के जलसाठा उपलब्ध असल्यानंतरही अद्याप क्षेत्रातील शेतकर्यांच्या बांधावर पाणी पोहचले नसल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे याप्रकाराकडे लोकप्रतिनिधींचे सुद्धा दुर्लक्ष असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.नळगंगा प्रकल्प हा मोताळा तालुक्यात आहे. मलकापूर शहराची तहान भागविण्यासोबत मलकापूर, मोताळा व नांदुरा तालुक्यातील शेतकºयांना रब्बी हंगामाला पाणी यामाध्यमातून उपलब्ध करून दिले जाते. या प्रकल्पाची साठवण क्षमता ९९.६६ द.ल.घ.मी. एवढी आहे. गत पाच वर्षापासून बुलडाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ पडला होता. यामुळे शेतीतून उत्पन्न निघू न शकल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले. याउलट यावर्षी सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने पिकेही चांगली होती. मात्र ऐन पिकांच्या काढणीच्यावेळी अतिवृष्टी झाल्याने शेतकºयांच्या तोंडचा घास हिरावल्या गेला. बुलडाणा जिल्हयातील मलकापूर, नांदुरा, खामगाव, संग्रामपूर व जळगाव या तालुक्यात सर्वाधीक पाऊस झाल्याची नोंद आहे. पावसाने खरिपाचे पिक हातचे गेले आहे. खरीप गेल्याने आता शेतकºयानी रब्बी हंगामापासून अपेक्षा ठेवल्या आहेत. त्यामुळे हरभरा, कांदा, गहू आदी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. नळगंगा धरणामध्ये पुरेसा जलसाठा असल्यानंतरही अद्याप पाणी सोडल्या गेले नसल्याने पिकांना पाणी मिळू शकत नसल्याचे वास्तव आहे.पैसे भरले तरी पाणी मिळेना!नळगंगा प्रकल्पाअंतर्गत ३३ पाणी वापर संस्था कार्यान्वीत आहेत. समित्यांकडे शेतकºयांनी पैसेही भरले. मात्र अद्याप पाणी न मिळू शकल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. कालव्यांची देखभाल दुरुस्ती व साफसफाई बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे. समित्यांचेही प्रतिनिधीही शेतकºयांपैकीच असल्याने त्यांचीही प्रकल्पाच्या अधिकाºयांकडून दिशाभूल केली जात असल्याचे दिसून येते. खरिप गेला आता रब्बीसाठी तरी वेळेवर पाणी मिळावे अशी अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.

यावर्षी शेतकरी आधीच हतबल झाला आहे. त्यात वेळेवर मदत मिळावी ही अपेक्षा आहे. लवकरात लवकर अडचणी सोडवून शेतकºयांना पाणी उपलब्ध करुन द्यावे जेणे करुन रब्बी हंगामासाठी लाभ होवू शकेल.- निनाजी फरपट,शेतकरी, सिरसोडी

नळगंगा प्रकल्पाअंतर्गत जवळपास ३३ पाणी वापर संस्था येतात. कालव्यांची साफसफाई बाकी आहे. लवकरच हे काम सुरु होईल. शेतकºयांना २० डिसेंबरपासून पाणी मिळेल.- शरद नागरे,शाखाधिकारी,नळगंगा प्रकल्प.

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरीDamधरण