शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबर लागला तरी शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहचले नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 15:03 IST

नळगंगा धरणामध्ये पुरेसा जलसाठा असल्यानंतरही अद्याप पाणी सोडल्या गेले नसल्याने पिकांना पाणी मिळू शकत नसल्याचे वास्तव आहे.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: बुलडाणा जिल्हयातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या नळगंगा प्रकल्पामध्ये १०० टक्के जलसाठा उपलब्ध असल्यानंतरही अद्याप क्षेत्रातील शेतकर्यांच्या बांधावर पाणी पोहचले नसल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे याप्रकाराकडे लोकप्रतिनिधींचे सुद्धा दुर्लक्ष असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.नळगंगा प्रकल्प हा मोताळा तालुक्यात आहे. मलकापूर शहराची तहान भागविण्यासोबत मलकापूर, मोताळा व नांदुरा तालुक्यातील शेतकºयांना रब्बी हंगामाला पाणी यामाध्यमातून उपलब्ध करून दिले जाते. या प्रकल्पाची साठवण क्षमता ९९.६६ द.ल.घ.मी. एवढी आहे. गत पाच वर्षापासून बुलडाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ पडला होता. यामुळे शेतीतून उत्पन्न निघू न शकल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले. याउलट यावर्षी सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने पिकेही चांगली होती. मात्र ऐन पिकांच्या काढणीच्यावेळी अतिवृष्टी झाल्याने शेतकºयांच्या तोंडचा घास हिरावल्या गेला. बुलडाणा जिल्हयातील मलकापूर, नांदुरा, खामगाव, संग्रामपूर व जळगाव या तालुक्यात सर्वाधीक पाऊस झाल्याची नोंद आहे. पावसाने खरिपाचे पिक हातचे गेले आहे. खरीप गेल्याने आता शेतकºयानी रब्बी हंगामापासून अपेक्षा ठेवल्या आहेत. त्यामुळे हरभरा, कांदा, गहू आदी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. नळगंगा धरणामध्ये पुरेसा जलसाठा असल्यानंतरही अद्याप पाणी सोडल्या गेले नसल्याने पिकांना पाणी मिळू शकत नसल्याचे वास्तव आहे.पैसे भरले तरी पाणी मिळेना!नळगंगा प्रकल्पाअंतर्गत ३३ पाणी वापर संस्था कार्यान्वीत आहेत. समित्यांकडे शेतकºयांनी पैसेही भरले. मात्र अद्याप पाणी न मिळू शकल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. कालव्यांची देखभाल दुरुस्ती व साफसफाई बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे. समित्यांचेही प्रतिनिधीही शेतकºयांपैकीच असल्याने त्यांचीही प्रकल्पाच्या अधिकाºयांकडून दिशाभूल केली जात असल्याचे दिसून येते. खरिप गेला आता रब्बीसाठी तरी वेळेवर पाणी मिळावे अशी अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.

यावर्षी शेतकरी आधीच हतबल झाला आहे. त्यात वेळेवर मदत मिळावी ही अपेक्षा आहे. लवकरात लवकर अडचणी सोडवून शेतकºयांना पाणी उपलब्ध करुन द्यावे जेणे करुन रब्बी हंगामासाठी लाभ होवू शकेल.- निनाजी फरपट,शेतकरी, सिरसोडी

नळगंगा प्रकल्पाअंतर्गत जवळपास ३३ पाणी वापर संस्था येतात. कालव्यांची साफसफाई बाकी आहे. लवकरच हे काम सुरु होईल. शेतकºयांना २० डिसेंबरपासून पाणी मिळेल.- शरद नागरे,शाखाधिकारी,नळगंगा प्रकल्प.

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरीDamधरण