शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पर्यावरण मासात उभारले पाच वनराई बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 11:16 IST

Environment : बीजसंकलन, बीजारोपण, वृक्षारोपण आणि खामगाव परिसरात पाच वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : ५ जून ते ५ जुलै या कालावधीत विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवित सृष्टीमंगलम संस्थेने पर्यावरण मास साजरा केला. यामध्ये बीजसंकलन, बीजारोपण, वृक्षारोपण आणि खामगाव परिसरात पाच वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली.देशात श्रावण मास, अधिक मास ,कार्तिक मास मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. अशीच एक संकल्पना पर्यावरण मास म्हणून येथील सृष्टी मंगलम प्रतिष्ठाण, खामगावच्या वतीने ५ जून जागतिक पर्यावरण दिनापासून ते ५ जुलै २०२१ यादरम्यान राबविण्यात आली. या माध्यमातून शहरालगतच्या बोडख्या पडलेल्या टेकड्यांवर वृक्षारोपण तथा बीजारोपण करण्यात आले.  यामध्ये मुख्यत: घाटपुरी शिवारातील सोनबर्डी, लेकुरवाडी व नंदाखोरी तसेच सोबतच सजनपुरी येथील हंड्याबरड, तपोवन, ॠषिसंकुल आणि जनूना शिवारातील टेकडीवरील परिसरात बीजसंकलन, बीजारोपण, वृक्षारोपण यासोबतच भारतीय कमळ रोपण व वनराई बंधारा निर्माण करून मोठ्या उत्साहात पर्यावरण मास साजरा करण्यात आला.  सृष्टी मंगलम प्रतिष्ठानचे संस्थापक संजय गुरव यांनी शहरातील इतरही सामाजिक कार्यकर्ते व संस्थांना या उपक्रमात सामील करून घेतले. या पर्यावरण मासदरम्यान दृष्टीस पडणारे प्राणी, पक्षी, कीटक यांची ओळख व अभ्यास करण्यात आला. या उपक्रमात वयवर्ष १५ ते ७० दरम्यानच्या निसर्गप्रेमींनी सहभाग नोंदवला. यामध्ये सृष्टी मंगलम प्रतिष्ठाणसोबतच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, तरुणाई फाउंडेशन, लायन्स क्लब संस्कृती, राष्ट्रीय रहित सेना, शिक्षक, व्यापारी सहभागी झाले.पर्यावरणप्रेमींचा सहभाग! n कलाध्यापक संजय गुरव यांची ही संकल्पना प्रत्यक्ष साकार करण्यासाठी  किशोर भागवत, वीरेंद्र शहा,चंद्रकांत केडीयाँ, राजेंद्रसिंग राजपूत, सौ. राजपूत, मंगला गुरव,  अमोल जोशी, मंगेश वानखेडे, गौरव इंगळे, गौरव वानखेडे, मंजितसिंग शिख, राजेश कोल्हे, अविनाश सोनटक्के, गोपाल पवार, तेजस्वी भुंबरे, श्रृती वारकड, विकास आंबेकर,  अभय अग्रवाल,  अजय अग्रवाल, नीताताई बोबडे यांनी सहकार्य केले.

‘माळ तिथे ताळ’ उपक्रमात लावली एक हजार झाडे!   ‘माळ तिथे ताळ’ या उपक्रमांतर्गत शहरालगतच्या माळावर (टेकडीवर) ताळ फळाच्या एक हजार बीजांचे रोपण केले.   तसेच वड, पिंपळासोबतच बूच (बकान) वृक्षाची तीन फुट उंचीच्या ३०० रोपांचीही लागवड करण्यात आली. १ जुलै ते ५ जुलै यादरम्यान लेकुरवाडी टेकडीवर व नंदाखोरी परिसरात पाच वनराई बंधारे निर्माण करण्यात आले. 

टॅग्स :environmentपर्यावरणkhamgaonखामगाव