शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

आंदोलनातून वित्त व जीवितहानी नको - पुरुषोत्तम खेडेकर यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 14:02 IST

आंदोलनांमधून वित्त हानी आणि जिवित हानी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर यांनी केले आहे.

ठळक मुद्दे पुरूषोत्तम खेडेकर यांनी सकल मराठा समाजबांधवांना प्रसिध्दी माध्यमांसह सोशल मिडीयावर पोस्ट केलेल्या व्हिडीओव्दारे दिल्या आहेत. खोट्या बातम्या पसरवणाºयांना चाप लावण्याची गरज पुरूषोत्तम खेडेकर यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली (बुलडाणा) : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे झालेली घटना समाजासाठी निश्चितच दुर्दैवी आहे. यापुढे आपल्या मागण्यांसाठी करण्यात येणाºया आंदोलनांमधून वित्तहानी आणि जीवितहानी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले. मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी सकल मराठा समाजबांधवांना प्रसिद्धी माध्यमांसह सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून आंदोलनाची कारणमिमांसा केली आहे.खेडकर म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी महाराष्टÑ बंद पुकारण्यात आला होता. यावर सत्ताधारी पक्षासह इतर पक्ष तसेच अन्य क्षेत्रातातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यातून अनेक ठिकाणी बंदला हिंसक वळणदेखील मिळाले असल्याने समाजबांधवांनी शांततामय मार्गाचा अवलंब करावा बहुतांशी मराठा समाज हा कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे; मात्र वाढत चाललेला उत्पादन खर्च आणि घटत चाललेले उत्पादन याचा आर्थिक ताळमेळ बसत नसल्याने मराठा समाज आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असलेली शेती तोट्यात जात असताना किमान आरक्षण मिळावे आणि त्यातून शिक्षण व नोकºयांमध्ये संधी मिळावी यासाठी आरक्षणाची ही मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीची पूर्तता करण्यासाठी ही आंदोलने होत आहेत. मराठा समाजाच्या आंदोलक कार्यकर्त्यांना आवाहन करताना त्यांनी पुढे असे म्हटले की बंद अथवा मोर्चादरम्यान सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही, जनता वेठीस धरली जाणार नाही, याची काळजी घ्यावी तसेच पंढरपूरीतूर परत निघणारे वारकरी वा सामान्य भक्त कुठेही अडकणार नाहीत, याची काळजी घ्यावी, कोणतेही हिंसक प्रकार आंदोलनादरम्यान घडता कामा नये, अनेक समाजकंटक आपल्या भलेपणाचा व भोळसर स्वभावाचा गैरफायदा घेतात.असे ही खेडेकर यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला बदनाम करणारे टोळके वाढत आहेत. याशिवाय मराठा विरुद्ध मराठेतर वाद वाढवणारेच पुढे येत असल्याचा धोका असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच मराठा समाज लढायात जिंकतो; पण तहात हरतो, असे सतत बोलून समाजाचा अपमान करण्यात येत आहे. प्रत्येक वेळी मराठा समाज कुण्यातरी राजकीय पक्षांचे हस्तक असल्याचे बोलले जाते. हा समाजाचा सरसकट अपमान व उपमर्द आहे. आम्ही सर्व एक नाहीत. आता तरी आम्ही सर्व एकमेकास मनापासून समजून घेणे व एकत्रित बसून ‘कॉमन पॉलिसी’ ठरवून काम करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. दोन वर्षे सकल मराठा समाज मूक क्र ांती मोर्चा सुरू होऊन झाले आहेत. आम्ही नेतृत्वहीन मोर्चाची घोषणा केली होती. शासनाच्यासाठी ही बाब जास्तीत जास्त उपयोगी ठरली आहे. समाजाबाबत खोट्या बातम्या पसरवणाºयांना चाप लावण्याची गरज पुरुषोत्तम खेडेकर यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

परिपूर्ण अभ्यासक मंडळाची गरजएक परिपूर्ण अभ्यासक मंडळ तयार करून युवकांना एकत्रित करून नेता व पदाधिकारी जाहीर केले पाहिजेत. नेटवर्क निर्माण करणे गरजेचे आहे. मराठा समाज ओबीसी आरक्षणाच्या निमित्ताने मराठा समाजातील अधिकारी, कर्मचारी, युवक, विचारवंत, अभ्यासक, वैज्ञानिक, संशोधक, आचार्य, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, कलाकार, नाटककार, पत्रकार, व्यावसायिक, व्यापारी, वर्तमानपत्रांचे मालक, शेतकरी, कष्टकरी शेतमजूर, हमाल, श्रमकरी अशा अनेक क्षेत्रातील नामवंत समाजशास्त्रज्ञ, मानवशास्त्रज्ञ वा तत्सम समाज सुधारक यांना भेटणे व चर्चा करून ठरविणे आवश्यक असल्याचे खेडेकर यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :purushottam khedekarपुरुषोत्तम खेडेकरChikhliचिखली