शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

आंदोलनातून वित्त व जीवितहानी नको - पुरुषोत्तम खेडेकर यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 14:02 IST

आंदोलनांमधून वित्त हानी आणि जिवित हानी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर यांनी केले आहे.

ठळक मुद्दे पुरूषोत्तम खेडेकर यांनी सकल मराठा समाजबांधवांना प्रसिध्दी माध्यमांसह सोशल मिडीयावर पोस्ट केलेल्या व्हिडीओव्दारे दिल्या आहेत. खोट्या बातम्या पसरवणाºयांना चाप लावण्याची गरज पुरूषोत्तम खेडेकर यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली (बुलडाणा) : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे झालेली घटना समाजासाठी निश्चितच दुर्दैवी आहे. यापुढे आपल्या मागण्यांसाठी करण्यात येणाºया आंदोलनांमधून वित्तहानी आणि जीवितहानी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले. मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी सकल मराठा समाजबांधवांना प्रसिद्धी माध्यमांसह सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून आंदोलनाची कारणमिमांसा केली आहे.खेडकर म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी महाराष्टÑ बंद पुकारण्यात आला होता. यावर सत्ताधारी पक्षासह इतर पक्ष तसेच अन्य क्षेत्रातातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यातून अनेक ठिकाणी बंदला हिंसक वळणदेखील मिळाले असल्याने समाजबांधवांनी शांततामय मार्गाचा अवलंब करावा बहुतांशी मराठा समाज हा कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे; मात्र वाढत चाललेला उत्पादन खर्च आणि घटत चाललेले उत्पादन याचा आर्थिक ताळमेळ बसत नसल्याने मराठा समाज आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असलेली शेती तोट्यात जात असताना किमान आरक्षण मिळावे आणि त्यातून शिक्षण व नोकºयांमध्ये संधी मिळावी यासाठी आरक्षणाची ही मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीची पूर्तता करण्यासाठी ही आंदोलने होत आहेत. मराठा समाजाच्या आंदोलक कार्यकर्त्यांना आवाहन करताना त्यांनी पुढे असे म्हटले की बंद अथवा मोर्चादरम्यान सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही, जनता वेठीस धरली जाणार नाही, याची काळजी घ्यावी तसेच पंढरपूरीतूर परत निघणारे वारकरी वा सामान्य भक्त कुठेही अडकणार नाहीत, याची काळजी घ्यावी, कोणतेही हिंसक प्रकार आंदोलनादरम्यान घडता कामा नये, अनेक समाजकंटक आपल्या भलेपणाचा व भोळसर स्वभावाचा गैरफायदा घेतात.असे ही खेडेकर यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला बदनाम करणारे टोळके वाढत आहेत. याशिवाय मराठा विरुद्ध मराठेतर वाद वाढवणारेच पुढे येत असल्याचा धोका असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच मराठा समाज लढायात जिंकतो; पण तहात हरतो, असे सतत बोलून समाजाचा अपमान करण्यात येत आहे. प्रत्येक वेळी मराठा समाज कुण्यातरी राजकीय पक्षांचे हस्तक असल्याचे बोलले जाते. हा समाजाचा सरसकट अपमान व उपमर्द आहे. आम्ही सर्व एक नाहीत. आता तरी आम्ही सर्व एकमेकास मनापासून समजून घेणे व एकत्रित बसून ‘कॉमन पॉलिसी’ ठरवून काम करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. दोन वर्षे सकल मराठा समाज मूक क्र ांती मोर्चा सुरू होऊन झाले आहेत. आम्ही नेतृत्वहीन मोर्चाची घोषणा केली होती. शासनाच्यासाठी ही बाब जास्तीत जास्त उपयोगी ठरली आहे. समाजाबाबत खोट्या बातम्या पसरवणाºयांना चाप लावण्याची गरज पुरुषोत्तम खेडेकर यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

परिपूर्ण अभ्यासक मंडळाची गरजएक परिपूर्ण अभ्यासक मंडळ तयार करून युवकांना एकत्रित करून नेता व पदाधिकारी जाहीर केले पाहिजेत. नेटवर्क निर्माण करणे गरजेचे आहे. मराठा समाज ओबीसी आरक्षणाच्या निमित्ताने मराठा समाजातील अधिकारी, कर्मचारी, युवक, विचारवंत, अभ्यासक, वैज्ञानिक, संशोधक, आचार्य, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, कलाकार, नाटककार, पत्रकार, व्यावसायिक, व्यापारी, वर्तमानपत्रांचे मालक, शेतकरी, कष्टकरी शेतमजूर, हमाल, श्रमकरी अशा अनेक क्षेत्रातील नामवंत समाजशास्त्रज्ञ, मानवशास्त्रज्ञ वा तत्सम समाज सुधारक यांना भेटणे व चर्चा करून ठरविणे आवश्यक असल्याचे खेडेकर यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :purushottam khedekarपुरुषोत्तम खेडेकरChikhliचिखली