शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

ऑनलाईन अर्जात तांत्रिक अडचणींचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 11:09 IST

पीक विमा काढण्याची मुदत ३१ जुलै पर्यंत असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : खरीप पीक विम्याचे आॅनलाईन अर्ज भरताना शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पीक विमा काढण्याची मुदत ३१ जुलै पर्यंत असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे.महाभूमीलेख, आधार आणि विमा कंपनीची वेबसाईट एकाच वेळी सुरळीत सुरू राहील्यास आॅनलाईन अर्जाची प्रक्रीया पूर्ण होते. या तीनपैकी काही वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने पीक विमा काढण्यापासून अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दरवर्षी शेतकऱ्यांना अनियमीत पावसाचा फटका बसतो. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळावा, यासाठी पीक विमा योजना सुरू केली आहे. यावर्षीपासून ही योजना तीन वर्षांसाठी लागू करण्यात आली आहे.शेतकºयांना शेतमालच्या अनिश्चित उत्पन्नाची नुकसान भरपाई सामुहिक स्वरूपात मिळावी, या उद्देशाने ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. शेतकºयांना प्रतिकुल हवामान घटकांमुळे पेरणी, लावणी, उगवण न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान, पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती याबाबींकरीता विम्याचे संरक्षण मिळणार आहे.विम्याचे अर्ज भरण्यासाठी ३१ जुलै ही मुदत आहे. मात्र; गत दोन दिवसांपासून ‘लोड’ वाढल्याने विमा कंपनीचे सर्व्हरची गती मंदावलीे आहे. त्यामुळे, अनेक शेतकºयांचे अर्ज भरल्याच गेले नाहीत. विम्याचे अर्ज भरताना सर्वात आधी आधार प्रमाणिकरण करण्याची गरज आहे. त्यानंतर सात बारा प्रमाणीत करण्यात येतो. या बाबींची पडताळणी झाल्यानंतर फॉर्म भरला जातो. अनेक शेतकरी एकाच वेळी फार्म भरत असल्याने अडचणी येत आहेत.

एक अर्ज भरण्यासाठी लागतो अर्धा तासग्रामीण भागात वीजेचा लपंडाव सुरू आहे. तसेच नेटवर्कही राहत नसल्याने पिक विम्याचे अर्ज भरण्यासाठी शेतकºयांना ताटकळत रहावे लागत आहे.सात बारासाठी आठ ते दहा वेळा गट नंबर टाकल्यानंतर प्रमाणीकरण होत असल्याने शेतकºयांचा वेळ जात आहे. तांत्रिक बिघाडामुळे एक अर्ज भरण्यासाठी २५ ते ३० मिनीट लागत आहेत.तसेच मिश्र पिक एकत्र टाकल्यास अर्ज सबमिट होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, प्रत्येक वेळी एका एका पिकाची निवड करावी लागत असल्याने अर्ज भरण्यास विलंब होत आहे.

सर्व शेतकरी एकाच वेळी आॅनलाईन अर्ज भरत असल्याने अडचणी येत आहेत. सर्व्हरची क्षमता वाढविण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविला आहे. ही अडचण लवकरच दूर होणार आहे.-विजय सरोदे,प्रभारी तालुका कृषी अधिकारी,लोणार

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी