शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बुलडाणा जिल्ह्यात हत्तीपाय रोग आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 14:04 IST

रुग्णांच्या संख्येत कुठलीच वाढ झाली नसल्याने ट्रिपल ड्रग थेरपीतून जिल्हा वगळला आहे.

सोहम घाडगे ।लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्यात हत्तीरोगाचे ५० हजार रुग्ण आहेत. हत्तीपाय निर्मुलनाच्या दुसऱ्या टप्प्याला २ मार्चपासून सुरुवात झाली. आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे बुलडाणा जिल्ह्यात हत्तीपाय रोग अटोक्यात आहे. जिल्ह्यात जुनेच ३१ रुग्ण आहेत. रुग्णांच्या संख्येत कुठलीच वाढ झाली नसल्याने ट्रिपल ड्रग थेरपीतून जिल्हा वगळला आहे.हत्तीपाय डासामुळे होणारा रोग आहे. डास चावल्यानंतर जंतू शरिरात पोहोचतात. शरिराला खाज सुटणे, वारंवार ताप येणे, पुरळ येणे, जननेंद्रियावर सूज येणे ही हत्तीरोगाची लक्षणे आहेत. हत्तीपाय निर्मुलनासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.  हत्तीपायरोग निर्मुलन मोहिमेंतर्गत ट्रिपल ड्रग थेरपी पथदर्शी प्रयोग राबविण्यास सुरुवात झाली आहे. सर्वेक्षणातून चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा या चार जिल्ह्यासह मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याचा मोहिमेत समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय कीटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत या जिल्ह्यांमध्ये हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविका, स्वयंसेवक यांच्याकडून औषधांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा समन्वय समिती, अ‍ॅडव्होकसी कार्यशाळा, प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

आरोग्य विभागाकडून वेळोवेळी हत्तीपाय रोग रुग्णांची शोध मोहीम राबविण्यात येते. जिल्ह्यात हत्तीपाय रोग नियंत्रणात आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये २ मार्चपासून सुुरु झालेल्या मोहिमेतून बुलडाणा जिल्हा वगळला आहे.- डॉ. बाळकृष्ण कांबळेजिल्हा आरोग्य अधिकारी,जि. प. बुलडाणा

हिवताप विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून हत्तीरोग रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. जिल्ह्यात हत्तीरोगाचे सध्या ३१ रुग्ण आहेत. मात्र हे रुग्ण बरेच जुने असून त्यामध्ये कुठलीच वाढ झालेली नाही.- डॉ. एस. बी. चव्हाणजिल्हा हिवताप अधिकारी,बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाHealthआरोग्य