शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
5
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
7
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
8
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
9
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
10
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
11
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
12
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
13
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
14
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
15
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
16
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
17
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
18
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
19
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
20
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार

निवडणूक प्रक्रिया राष्ट्रीय उत्सव - गौरी सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 6:41 PM

. विधानसभा निवडणुकीबाबत उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गौरी सावंत यांच्याशी साधलेला संवाद...

ब्रम्हानंद जाधव विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सध्या लागू आहे. या आरचासंहितेचा भंग झाल्याची तक्रार आल्यास १०० मिनीटाच्या आत त्याचा निपटारा लावला जातो. तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतात. विधानसभा निवडणुकीबाबत उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गौरी सावंत यांच्याशी साधलेला संवाद...

निर्भय व नि:पक्ष वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत?

- जिल्ह्याची भौगोलिक सीमा मध्य प्रदेश राज्यास लागून असल्याने निवडणुकीच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दोन्ही राज्यातील संबंधित जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे बैठक घेण्यात आली. जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भूजबळ यांच्या नेतृत्वाखाली ‘एफएसटी’ ‘एसएसटी’ ‘व्हीएसटी’ टीम नियुक्त करण्यात आले आहेत. आंतरराज्यस्तरावरील चार आणि जिल्हास्तरावर १२ चेकपोस्टवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.  जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात एकूण २ हजार २६३ मतदान केंद्र असून सर्व केंद्रावर ‘एएमएफ’ उपलब्ध करून दिली आहे. केंद्रावर जवळपास १० हजार ६०० निवडणूक अधिकारी, कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तर २१७ क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.

खर्चाचे नियोजन कसे आहे?

- विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २३ कोटी ५० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा प्रशासनाकडे पहिल्या टप्प्यात २८ लाख तर दुसºया टप्प्यात १४ कोटी असा एकुण १४ कोटी २८ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. आणखी निधीची आवश्यकता भासल्यास तसे इस्टीमेट राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवून निधीची उपलब्धता करून घेता येईल.

कामाच्या व्यापात आरोग्य कसे सांभाळता?

- निवडणुकीची कामे करताना रात्री अनेकवेळा उशीरही होतो. तर कधी सकाळपासूनच कामे सुरू असतात, त्यामुळे आरोग्याकडे थोडे दुर्लक्ष होते. त्यासाठी आवश्यक तो पुरेसा आहार व थोडा व्यायाम कार्यक्षमता टिकविण्यासाठी करते.

लोकसभा निवडणुकीच्या अनुभवाचा फायदा काय?

- लोकसभा निवडणूक २०१९ चा अनुभव पाठीशी असल्याने त्याचप्रमाणे त्यावेळी आलेल्या अडचणी पुन्हा येऊ नये, यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वच गोष्टींची आवश्यक ती काळजी घेण्यात आली आहे. ही निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. लोकसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ‘गो व्होट’ सारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. निवडणूक प्रक्रिया हा राष्ट्रीय उत्सव असतो. ही प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी महसूल सोबतच सर्वच विभागाची आहे

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखतMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019