शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

स्थलांतरीतांसाठी शिक्षण हमीपत्राची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 12:33 IST

Buldhana News शाळा व्यवस्थापन समितीने हा उपक्रम राबवण्याचा आदेश शिक्षण विभागाने दिला आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : कोविड-१९ रोगाच्या प्रादुर्भावामुळे बालके स्थलांतरीत झाल्यास त्यांना स्थलांतराच्या ठिकाणी शिक्षण हमी पत्रकाव्दारे नियमित शाळेत दाखल करुन गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येते. मुलांचे स्थलांतरण शून्यावर आणण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने हा उपक्रम राबवण्याचा आदेश शिक्षण विभागाने दिला आहे.  शिक्षण  हमी पत्रकाचा नमुना   २७ नोव्हेंबरपर्यंत सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित केला जाणार आहे.   सर्व शिक्षकांना शिक्षण हमी पत्रक म्हणजे काय? त्याची आवश्यकता काय? आहे याबाबत माहिती नाही, असे होऊ नये, शिक्षण यंत्रणेतील सर्व अधिकारी, कर्मचारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकांना शिक्षण हमी पत्रकबाबत माहिती असावी, बालक स्थलांतरीत झाल्यास शिक्षण हमी पत्रक देणे, शिक्षण हमी पत्रकाबाबत शिक्षक तसेच गावातील प्रत्येक व्यक्तीला माहितीसाठी जागृती करण्याच्या दृष्टीने शिक्षण हमी पत्रकाचा नमुना ग्रामपंचायत, शाळा, पंचायत समिती, तहसील कार्यालयाच्या दर्शनी भागावर २७ नोव्हेंबरपर्यंत लावण्यात येणार आहे. या उपक्रमात प्रत्येक शाळेने त्यांच्या गावातील कार्यक्षेत्रातील ६ ते १४ वर्ष वयोगटातील स्थलांतरीत बालकांची पाहणी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शुक्रवारी करुन यादी तयार करावी, स्थलांतरीत होणाऱ्या प्रत्येक बालकाचे, सर्व नोंदी भरुन विहित नमुन्यातील शिक्षण हमी पत्रक मूळ गावातील शाळेने त्यांच्या पालकांकडे द्यावे, स्थलांतरणामुळे बालक ज्या शाळेत दाखल होईल त्या ठिकाणी त्यांच्या पालकांनी मूळ शाळेने दिलेले शिक्षण हमी पत्रक संबंधित नवीन शाळेच्या मुख्याध्यापकाकडे द्यावे, मुख्याध्यापकांनी शिक्षण हमी पत्रकामधील नोंदीनुसार बालकाला वर्गात दाखल करुन शिक्षणाची सोय उपलब्ध करुन द्यावी. शिक्षणाच्या सर्व योजनांचा लाभ उपलब्ध करुन द्यावा, स्थलांतरण एका पेक्षा जास्त ठिकाणी होत असल्यास ज्या ज्या गावातून स्थलांतरण होत आहे त्या त्या गावातील शाळेने सर्व माहिती भरलेले शिक्षण हमी पत्रक पालकांना द्यावे, स्थलांतरण कालावधी संपल्यानंतर पालक बालकांसह मूळ गावी आल्यानंतर शेवटचे स्थलांतरण झालेल्या कार्यक्षेत्रातील शाळेकडून प्राप्त झालेल्या शिक्षण हमी पत्रकानुसार बालकास मूळ गावातील शाळेने प्रवेश द्यावे, असे उपक्रम या अभियानातून केले जाणार आहे. त्यामुळे दिलासा मिळणार आहे. 

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरEducationशिक्षण