शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
4
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
5
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
6
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
7
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
8
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
10
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
11
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
12
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
13
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
14
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
15
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
16
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
17
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
18
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
19
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
20
ओठ फुटलेत-कोरडे झालेत? मॉइश्चरायझर म्हणून लिप बाम चांगला की ऑइल बाम, ‘असं’ ठरवा..

वर्षभरात बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्त करू - शांतिलाल मुथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:16 IST

सुलतानपूर : शासन, प्रशासन, पदाधिकारी तसेच शेतकरी बांधवांच्या  सहकार्याने विविध उपक्रम राबवून एका वर्षात जिल्हा दुष्काळमुक्त  करण्याचा मानस असून, तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ४ मार्चपासून  लोणार तालुक्यातील धरणांमधील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ  होणार आहे. सोबतच शेतकर्‍यांच्या सुपीक जमिनीत तो टाकण्यात  येईल. शेतकर्‍यांनी या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेऊन आपापली शे ती सुपीक करावी, असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक  अध्यक्ष शांतिलाल मुथा यांनी येथे केले.

ठळक मुद्देसुलतानपूरमध्ये नियोजनाबाबत झाली बैठक मोठय़ा संख्येने होती शे तकर्‍यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर : शासन, प्रशासन, पदाधिकारी तसेच शेतकरी बांधवांच्या  सहकार्याने विविध उपक्रम राबवून एका वर्षात जिल्हा दुष्काळमुक्त  करण्याचा मानस असून, तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ४ मार्चपासून  लोणार तालुक्यातील धरणांमधील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ  होणार आहे. सोबतच शेतकर्‍यांच्या सुपीक जमिनीत तो टाकण्यात  येईल. शेतकर्‍यांनी या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेऊन आपापली शे ती सुपीक करावी, असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक  अध्यक्ष शांतिलाल मुथा यांनी येथे केले.स्थानिक वेदांत आश्रमात २५ फेब्रुवारी रोजी शेतकर्‍यांसाठी आयोजित  सभेत ते बोलत होते. दरम्यान, आगामी सहा महिने हे काम चालणार  असून, यामुळे बुलडाणा जिल्ह्याला एक टीएमसी पाणीसाठा निर्माण  होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावेळी तहसीलदार सुरेश कव्हळे  यांनीदेखील या शेतकरी हिताच्या उपक्रमासाठी शासकीय सुट्यांचा  विचार न करता सर्वतोपरी महसूल प्रशासनाकडून त्यांच्या अखत्यारी तील  अधिकाराचा वापर करून सहकार्य करण्याची ग्वाही दिली.  कार्यक्रमाला जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र जैन, जयचंद भाटिया,  बाफना, भिकमचंद रेदासनी, तुषार बेदमुथा, मयूर गेल्डा, नीलेश नाहटा,  कृषी अधिकारी दांडगे, भैयासाहेब पाटील तसेच जिल्हा परिषद सदस्यप ती दिलीप वाघ, पंचायत समितीचे गटनेते डॉ. हेमराज लाहोटी, पंचायत  समिती सदस्यपती गजानन भोकरे, बाजार समितीचे शिवपाटील  तेजनकर, कांता पाटील, वामनराव झोरे, शिवप्रसाद सारडा, विजय  खोलगडे, दत्तात्रय शेवाळे, मधुकर जैन, ग्रामविकास अधिकारी मो तीराम डव्हळे, सतीश बोराळकर, मोहन जैन यांच्यासह गाव परिसरा तील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. या अभियानाबाबत सक्रियपणे  सहभागी होण्याचे ग्रामीण भागातील नागरिक सांगत आहेत.

खासगी टँकरने पाणी पुरवठासुलतानपुरात जानेवारीपासूनच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. १५  व्या, १६ व्या दिवशी अवघे २0 मिनिटे ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठा  केला जातो, अशी खंत ग्रामस्थांनी या कार्यक्रमात व्यक्त केली. येथून  हाकेच्या अंतरावर बोराखेडी तलाव असला, तरी सुलतानपूर मात्र  तहानलेले असून, खासगी टँकरने पाणी विक्री तेजीत आहे. त्यामुळे  शासन व प्रशासनाप्रती गावकर्‍यांमध्ये संताप आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाShantilal Muttha Foundationशांतीलाल मुथ्था फाउंडेशन