शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

वर्षभरात बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्त करू - शांतिलाल मुथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:16 IST

सुलतानपूर : शासन, प्रशासन, पदाधिकारी तसेच शेतकरी बांधवांच्या  सहकार्याने विविध उपक्रम राबवून एका वर्षात जिल्हा दुष्काळमुक्त  करण्याचा मानस असून, तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ४ मार्चपासून  लोणार तालुक्यातील धरणांमधील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ  होणार आहे. सोबतच शेतकर्‍यांच्या सुपीक जमिनीत तो टाकण्यात  येईल. शेतकर्‍यांनी या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेऊन आपापली शे ती सुपीक करावी, असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक  अध्यक्ष शांतिलाल मुथा यांनी येथे केले.

ठळक मुद्देसुलतानपूरमध्ये नियोजनाबाबत झाली बैठक मोठय़ा संख्येने होती शे तकर्‍यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर : शासन, प्रशासन, पदाधिकारी तसेच शेतकरी बांधवांच्या  सहकार्याने विविध उपक्रम राबवून एका वर्षात जिल्हा दुष्काळमुक्त  करण्याचा मानस असून, तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ४ मार्चपासून  लोणार तालुक्यातील धरणांमधील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ  होणार आहे. सोबतच शेतकर्‍यांच्या सुपीक जमिनीत तो टाकण्यात  येईल. शेतकर्‍यांनी या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेऊन आपापली शे ती सुपीक करावी, असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक  अध्यक्ष शांतिलाल मुथा यांनी येथे केले.स्थानिक वेदांत आश्रमात २५ फेब्रुवारी रोजी शेतकर्‍यांसाठी आयोजित  सभेत ते बोलत होते. दरम्यान, आगामी सहा महिने हे काम चालणार  असून, यामुळे बुलडाणा जिल्ह्याला एक टीएमसी पाणीसाठा निर्माण  होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावेळी तहसीलदार सुरेश कव्हळे  यांनीदेखील या शेतकरी हिताच्या उपक्रमासाठी शासकीय सुट्यांचा  विचार न करता सर्वतोपरी महसूल प्रशासनाकडून त्यांच्या अखत्यारी तील  अधिकाराचा वापर करून सहकार्य करण्याची ग्वाही दिली.  कार्यक्रमाला जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र जैन, जयचंद भाटिया,  बाफना, भिकमचंद रेदासनी, तुषार बेदमुथा, मयूर गेल्डा, नीलेश नाहटा,  कृषी अधिकारी दांडगे, भैयासाहेब पाटील तसेच जिल्हा परिषद सदस्यप ती दिलीप वाघ, पंचायत समितीचे गटनेते डॉ. हेमराज लाहोटी, पंचायत  समिती सदस्यपती गजानन भोकरे, बाजार समितीचे शिवपाटील  तेजनकर, कांता पाटील, वामनराव झोरे, शिवप्रसाद सारडा, विजय  खोलगडे, दत्तात्रय शेवाळे, मधुकर जैन, ग्रामविकास अधिकारी मो तीराम डव्हळे, सतीश बोराळकर, मोहन जैन यांच्यासह गाव परिसरा तील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. या अभियानाबाबत सक्रियपणे  सहभागी होण्याचे ग्रामीण भागातील नागरिक सांगत आहेत.

खासगी टँकरने पाणी पुरवठासुलतानपुरात जानेवारीपासूनच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. १५  व्या, १६ व्या दिवशी अवघे २0 मिनिटे ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठा  केला जातो, अशी खंत ग्रामस्थांनी या कार्यक्रमात व्यक्त केली. येथून  हाकेच्या अंतरावर बोराखेडी तलाव असला, तरी सुलतानपूर मात्र  तहानलेले असून, खासगी टँकरने पाणी विक्री तेजीत आहे. त्यामुळे  शासन व प्रशासनाप्रती गावकर्‍यांमध्ये संताप आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाShantilal Muttha Foundationशांतीलाल मुथ्था फाउंडेशन