शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

संचारबंदीच्या काळातच ४४ टक्क्यांनी वाढले रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:56 IST

कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लादत संचारबंदी घोषित केली आहे. मात्र त्याचा अपेक्षित असा परिणाम अद्याप जिल्ह्यात जाणवत ...

कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लादत संचारबंदी घोषित केली आहे. मात्र त्याचा अपेक्षित असा परिणाम अद्याप जिल्ह्यात जाणवत नसल्याचे चित्र आहे. नेमक्या याच काळात पूर्वीच्या तुलनेत ४४ टक्के अर्थात १५ हजार ३३ रुग्ण वाढले असून, संपलेल्या पंधरवड्यात ९२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ३१ मार्च ते १४ एप्रिल या १५ दिवसांच्या कालावधीत ५५ व्यक्तींचा मृत्यू झाला होता. यावरून संचारबंदीच्या काळातच कोरोनाचा संसर्ग अधिक वाढल्याचे एकंदरीत चित्र जिल्ह्यात आहे. ३१ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान जिल्ह्यात ७६ हजार ५९ संदिग्ध रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात १४ टक्के पॉझिटिव्हिटी रेटनुसार दहा हजार ३७० जण बाधित निघाले, तर याच कालावधीत २,१३२ जणांनी कोरोनावर मात केली होती. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे अवघे २१ टक्केच होते.

त्याच्या तुलनेच १५ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान जिल्ह्यात एक लाख एक हजार ४१० संदिग्धांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये १५ टक्के पॉझिटिव्हिटी रेटनुसार १५ हजार ३३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे संचारबंदीतही कोरोनाचा आलेख जिल्ह्यात चढाच असल्याचे निदर्शनास येत आहे.

..या कारणामुळे वाढली रुग्णसंख्या

अ) सकाळी ७ ते ११ यावेळेतच भाजीपाला, दूध, किराणा वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची मुभा होती. त्यामुळे बाजारात एकाच वेळी मोठी गर्दी होत होती. व्यावसायिकांनी निर्धारित करून दिलेली वेळ पाळली नाही. त्याचाही फटका बसला.

ब) संदिग्धांचे अहवाल जवळपास ७ ते ८ दिवसांनंतर कळत होते. या विलंबाचा हातभार कोरोना संसर्ग वाढण्यास झाला. स्वॅब दिल्यानंतर संदिग्ध घरीच क्वाॅरण्टीनमध्ये न राहता फिरत होते.

क) १५ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान पूर्वीच्या तुलनेत संदिग्धांच्या चाचण्या २५ टक्क्यांनी वाढविण्यात आल्या होत्या. त्यामुळे कोरोनाबाधितांचेही प्रमाण वाढले.

ग्रामीण भागात रुग्ण वाढले

जिल्ह्यातील बहुतांश रुग्णालये तथा कोविड सेंटर हे तालुक्याच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी कुटुंबातील व्यक्ती तालुक्याच्या ठिकाणी राहत होत्या तसेच जेवणाचे डबेही घरूनच काही जण आणत होते. यासोबतच ग्रामीण भागात अपेक्षित सतर्कता बाळगली जात नसल्याचाही परिणाम रुग्ण वाढण्यात झाला. एकूण बाधितांपैकी जवळपास ४४ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित हे ग्रामीण भागातील आहेत.

----

३१ मार्च ते १४ एप्रिल टेस्टिंग : ७६,०५९

पॉझिटिव्ह : १०,३७०

रुग्णालयातून सुटी : २,१३२

पॉझिटिव्हिटी रेट : १३.६४

कोरोनामुक्ती दर : २०.५४

----------

१५ एप्रिल ते ३० एप्रिल टेस्टिंग : १,०१,४१०

पॉझिटिव्ह : १५,०३३

रुग्णालयातून सुटी : १३,६६८

पॉझिटिव्हिटी रेट : १४.८२

कोरोनामुक्ती दर -- ९०.९१