शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

पाण्याअभावी कांदा, मिरची धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 17:43 IST

बुलडाणा: जिल्ह्यातील नळगंगा धरणाच्या भरवश्यावर अनेक शेतकºयांनी कांदा, मिरची व इतर भाजीपालावर्गीय पिकांची लागवड केलेली आहे.

बुलडाणा: जिल्ह्यातील नळगंगा धरणाच्या भरवश्यावर अनेक शेतकºयांनी कांदा, मिरची व इतर भाजीपालावर्गीय पिकांची लागवड केलेली आहे. परंतू सध्या शेतकºयांना पाणी देणे बंद केल्याने नळगंगा धरणालगतचे कांदा, मिरची ही पिके धोक्यात सापडली आहेत. जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. तळणी, पिंपळपाटी, शेलापूर, पिंप्रीगवळी, काबरखेड, चिंचपूर, नळगंगा धरणपात्राजवळील शेतकºयांचे पीक अंतीम टप्प्यात आले असताना प्रशासनाकडून शेतकºयांना दिला जाणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या शेतकºयांचे कांदा, मिरची, तूर व इतर भाजीपालार्गीय पिकांना पाण्याची गरज भासत आहे. कांदा, मिरची व भाजापाला वर्गीय पिकांना एक पाणी मिळाले नाही, तर या पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. नळगंगा धरणातील गेल्या १० वर्षातील पाणी साठ्याचा विचार केल्यास जेम-तेम कमी जास्त पाणी आजपर्यंत या धरणात राहिले आहे. पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त १२ दलघमी एकूण साठ्यातून अल्पशा पाण्यावरती या शेतकºयांचे सुक्ष्म सिंचन असल्यामुळे कोणत्याचाही पाण्याचा अपव्यय न होता, चांगल्या प्रकारे पाणी पुरू शकेल असा दावा, परिसरातील शेतकºयांनी केला आहे.

जिल्हाधिकाºयांकडे शेतकºयांची धाव

सर्व नळगंगा उपसा सिंचन धारक शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे धाव घेऊन पीक अंतीम टप्प्यात असताना नळगंगा धरणाचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. २९ आॅक्टोबर रोजी शेकडो शेतकºयांच्या सह्याचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी डॉ. डांगे यांना देण्यात आले. या निवेदनावर राहुल झोपे, सागर नारखडे, बन्सीलाल राठी, रविंद्र सुपे, वसंत नारखेडे, श्रीकांत खर्चे, जनार्दन खर्चे, वसंत पाचपांडे, प्रभाकर खर्चे, निवृत्ती पाचपांडे, विष्णू नारखेडे, सोमा नाफडे यांच्यासह अनेक शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत.

 पाटबंधारे विभागीय कार्यालयासमोर शेतकºयांची गर्दी

पाटबंधारे विभागाने महसूल विभागासोबत धरणातून अवैध पाणी उपसा करणाºयांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सर्वत्र अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. त्यात करडी धरणामध्ये अवैध पाणी उपसा होत असल्याने पाटबंधारे विभाग व महसूल विभागाने काही शेतकºयांवर कारवाई केली. दरम्यान, सोमवारला सकाळी बुलडाणा येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी अनेक शेतकºयांनी कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती