शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

‘स्व’पासून दुरावल्यानेच मनुष्याची जीवनात अधोगती! -  शकुंतला दीदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 6:01 PM

प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्राच्या शकुंतला दीदी यांच्याशी साधलेला संवाद... 

अनिल गवई।लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: आजच्या आधुनिक युगात प्रत्येकाच्या अपेक्षा आणि इच्छा वाढल्यात. त्यामुळे मनुष्याच्या आयुष्यात समाधान नाही. भौतिक सुख आणि स्पर्धांत्मक परिस्थितीमुळं मनुष्य स्वत:शीही वैरत्व पत्करत आहे. मात्र, अधात्मामुळे स्व:ची ओळख होते. तसेच अधात्म हेच सर्व विकार आणि वाईट गोष्टीपासून मुक्त करते.प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्राच्या शकुंतला दीदी यांच्याशी साधलेला संवाद... निकोप समाज निर्मितीसाठी काय करणे अपेक्षीत आहे? अपेक्षा आणि इच्छा वाढीस लागल्याने मनुष्य नैराश्य आणि तणावाकडे जात आहे. ही वस्तुस्थिती आहे. मात्र, प्रत्येकाने आपल्या जीवनात प्रेम...आदर आणि नि:स्वार्थ भावनेची देवाण-घेवाण केल्यास, निकोप समाजाची निर्मिती सहज शक्य आहे. आपल्या मते जगातील सर्वांत दु:खी व्यक्ती कोण?  मनुष्याला आपल्या जीवनात नानाविध दु:ख आहेत. आयुष्यभर वेगवेगळ्या दु:खामुळे मनुष्य व्यथीत राहतो. मनाच्या विपरीत घडलं की, साध्या साध्या गोष्टीने निराश होतो.  मनुष्याच्या आयुष्यात अनेक दु:ख असले तरी,  रिकामे ‘मन’असलेला व्यक्ती या जगात सर्वात दु:खी असल्याचे आपले प्रामाणिक मत आहे.सुख-समाधान प्राप्तीसाठी काय केलं पाहीजे? अंहकार मानवाचा सर्वातमोठा शत्रू आहे. शास्त्राने तर अंहकाराला दुराचारी कंसाची उपमा दिली आहे. सुख आणि समाधान प्राप्तीसाठी प्रत्येकाने आपल्या जीवनातील अंहकाररूपी कंसाला आपल्यापासून दूर ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहीजे. सर्व विकारांना शत्रु मानण्यात येते. आपल्या अंगी असलेले विविध विकार हे शत्रु असले तरी, जीवनात माणसाचा कुणीही शत्रु नसला पाहीजे. विकारांचा त्याग केल्या मनुष्य सुखी आहे.चिंता आणि चिता या दोन्हीत केवळ एका अनुस्वाराचा फरक आहे. मात्र, दोघांचेही कार्य समान आहे. चिंता ही माणसाला जीवंतपणी, तर चिता ही मेल्यावर जाळत असते. चिंतेमुळे दु:खाची तीव्रता कितीतरी पटीने वाढत जाते. म्हणून, माणसाने आपल्या आयुष्यात चिंतेला दोन हात लांबच ठेवावे.

 समाजातील वाढत्या कलहास जबाबदार कोण?सद्भावना आणि शिवभावना नाहीशी झाल्यामुळे समाजात कलह वाढीस लागले आहेत. क्षणिक स्वार्थ आणि भौतिक सुखासाठी मनुष्य हपापल्यानेच घरांघरांमध्ये गृहक्लेश वाढीस लागलेत. मनुष्य स्व:तपासूनच दूर गेला असून तो भरकटत आहे. आदर्श बाजूला ठेवल्यानेच समाजात अनेक वाईट घटना घडताहेत. ‘पूत कपूत होते है; माता कुमाता नाही होती!’ मात्र, सद्यस्थितीत  स्वत:च्या स्वार्थासाठी अनेक ठिकाणी आई मुलाच्या जीवावर उठल्याचेही दिसून येते. ही बाब समाजासाठी घातक ठरतेय!

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखतkhamgaonखामगाव