शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

खडकपूर्णाचे पाणी सोडल्याने पिकांना जीवदान

By admin | Updated: July 22, 2015 23:59 IST

चिखली तालुक्यातील सहा हजार हेक्टरवरील पिकांना संजीवनी.

चिखली (जि. बुलडाणा) : जिल्हय़ात सर्वत्र पावसाअभावी खरिपाची पिके कोमेजून जात आहेत. शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत असल्याचे विदारक चित्र सर्वत्र दिसत आहे. शेतकर्‍यांना अशा बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागणार, याची जाणीव असलेल्या माजी मंत्री भारत बोंद्रे यांच्या दूरदृष्टीपणामुळे तालुक्यातील सुमारे सहा हजार हेक्टरवरील पिकांना नवसंजीवनी मिळाली. ९ जुलैपासून खडकपूर्णा प्रकल्प उपसा जलसिंचन टप्पा क्र.४ मध्ये पाणी सोडण्यात आल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आणि लाभक्षेत्रातील अनेक शेतकर्‍यांची पिके वाचविण्यात यश आले. जिल्ह्यामध्ये सिंचनाचे क्षेत्र तसे फारच कमी आहे, केवळ विहिरी आणि नद्यावरूनच शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी मिळत असे; मात्र चिखलीचे तत्कालीन आमदार भारत बोंद्रे यांच्या पुढाकाराने पैनगंगा नदीवर मेहकर तालुक्यातील पेनटाकळी येथे पेनटाकळी प्रकल्पाचे काम सुरु झाले. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात भारत भाऊंचा पाटबंधारे मंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर त्यांनी खडकपूर्णा आणि जिगाव प्रकल्पाच्या कामासाठी वेगाने प्रयत्न करून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडून खडकपूर्णा प्रकल्पाला मंजुरात मिळवूनही घेतली. खडकपूर्णा प्रकल्पाचे भूमिपूजन ना.शरदचंद्र पवार यांच्या हस्ते झाले आणि या खडकपूर्णाचे काम पुर्णत्वाकडे जात असतानाच प्रकल्पातील पाण्याचा लाभ तालुक्यातील शेतकर्‍यांना होत असल्याचे समाधान आज या प्रकल्पाच्या उपसा जलसिंचन टप्पा क्रमांक ४ ची पाहणी करताना शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर दिसून येत होते.खडकपूर्णा प्रकल्पाच्या उपसा जलसिंचन टप्पा क्रमांक ४ चा लाभ हा पुर्णपणे चिखली तालुक्यातील शेतकर्‍यांना होणार आहे. यामध्ये तालुक्यातील भरोसा, रामनगर, रोहडा, गांगलगाव, कवठळ, मुरादपूर, देऊळगाव घुबे, अमोना, कोनड, कोलारा, भालगाव अश्या गावांना या टप्प्याचा लाभ होणार आहे. काहींना आजच होत आहे. यावर्षी मृग नक्षत्रामध्ये समाधानकारक पाऊस पडल्यानंतर महिनाभरापासून पावसाने उघाड दिल्याने परिसरातील शेतकरी संकटात सापडला होता. अश्यातच माजी मंत्री भारत बोंद्रे यांनी अमरावती विभागीय आयुक्त आणि जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांकडे पाठपुरावा करुन या परिसरातील शेतकर्‍यांना खरीप हंगामातील पिके वाचविण्यासाठी पाणी सोडण्याबाबत चर्चा केली आणि ९ जुलैपासून खडकपूर्णा प्रकल्प उपसा जलसिंचन टप्पा क्र.४ मध्ये पाणी सोडण्यात आले. त्यामुळे परिसरातील जवळपास सहा हजार हेक्टरवरील पिकांना नवसंजीवनी मिळाली