शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

मेहकर तालुक्यात पुरेशी वीज मिळत नसल्याने सिंचनात खोडा; पिकांचे होत आहे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 2:11 PM

मेहकर : बदललेल्या अलिकडीलकाळातील हवामानामुळे मेहकर तालक्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे.  सध्याच्या स्थितीमध्ये रब्बी हंगामात वीज वेळेवर व पुरेशी मिळत नसल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.

ठळक मुद्देवीज वितरण कंपनीविरोधात रोष

मेहकर : बदललेल्या अलिकडीलकाळातील हवामानामुळे मेहकर तालक्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे.  सध्याच्या स्थितीमध्ये रब्बी हंगामात वीज वेळेवर व पुरेशी मिळत नसल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकरी दररोज विजवितरण कार्यालयामध्ये चकरा मारत आहेत. आश्वासनाशिवाय त्यांच्या हाती काहीच पडले नाही. त्याचा फटका रब्बीच्या पिकांना बत आहे.सुरळीत स्वरुपात वीजही शेतकर्यांना उपलब्ध होत नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये  शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या शेतामध्ये गहू, हरभरा, तुर, कपाशी ही पीके आहेत. त्यांना पाण्याची सक्त गरज आहे. मात्र विज वेळेवर मिळत नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पिकांची उत्पादकता घटण्याची भीती आहे.रात्रीतून फक्त चार तास वीजपुरवठा सुरू असतो. तो ही काही भागात पूर्णवेळ नसतो.  त्यातच तांत्रिक दोष निर्माण झाल्याच्या कारणाखाली बर्याचदा वीज प्रवाह बंद असतो.मेहकर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. जे काही थोडेफार पाणी उपलब्ध आहे ते पाणीसुद्धा वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने पिकांना देता येत नाही. या प्रकारामुळे शेतकर्यांमध्ये वीज वितरण कंपनीविरोधात रोष आहे. गेल्या दोन- तिन वर्षापासून मेहकर तालुक्यात दुष्काळ सदृष्य परीस्थीती आहे. नोटाबंदी, पिकांना भाव नसणे, वेळेवर कर्ज न मिळणे यामुळे शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात असताना आता विजेअभावी रब्बी हंगामही शेतक-यांच्या हातून जातो की काय अशी भीती आहे. त्यामुळे शेतीसाठीचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी आहे.चार गावात नुकसान

 अकोला ठाकरे, रत्नापूर, हिवरा साबळे, कोयाळी सास्ते  या भागात वीज पुरवठा होत नसल्याने अनेक हेक्टरवरील पिकांचे नुकसान होत आहे. चायगांव, बाभुळखेड येथील शेतकर्यांनी अधिकार्यांना भेटून अडचणीही सांगितल्या. अकोला ठाकरे येथील माजी सरपंच विष्पुपंत ठाकरे, रंजन पैनकर, विश्राम ठाकरे, शिवाजी ठाकरे, गजानन ठाकरे, सुधाकर ठाकरे, अमोल चव्हाण, गजानन बोरकर, संजय ठाकरे, नागेश ठाकरे, माजी सरपंच अरुण पोपळघट, या शेतकर्यांनी सुरळीत वीज पुरवठ्याची मागणी केली आहे.

 कर्मचार्यांची कमतरता, रोहीत्रही मिळेनाअपुरा कर्मचारी वर्ग असल्याने वीजेसंदर्भाती कामे तालुक्यात खोळंबली आहेत. त्यातून अनेक समस्या निर्माण होत आहे. अधिकार्यांना शेतकर्यांचा रोष सहन करावा लागत आहे. वीज रोहीत्र जळाल्यास त्वरित शेतकर्यांना ते बदलून मिळत नाही. खामगांव येथून वीज रोहीत्र आणण्यासाठी शेतकर्यांनाच खर्च करावा लागतो, अशी ओरड आहे. अन्य साहित्याचाही वीज वितरण कंपनीकडून वेळेत पुरवठा होत नाही, असे शेतकर्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण