शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

शेती मालाचे बाजारभाव कोसळल्यामुळे बळीराजा हतबल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 17:05 IST

सिंदखेडराजा :  शेतमालाचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कापूस, सोयाबीन, तूरीला पुरेसा बाजारभाव नाही. उत्पादन खर्चही निघत नसल्याने संसाराचा गाडा कसा चालवावा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. 

ठळक मुद्देसात हजारापर्यंत विकल्या गेलेला कापूस आज चार ते पाच हजार रुपयाने विकत आहे. सिझनमध्ये अडीच हजार ते अठ्ठाविससे रुपये सोयाबीनचे भाव होते. सध्या शेतकऱ्यांजवळील सोयाबीन संपल्यावर २७०० रुपयावर गेले.शासनाने तूर, हरभरा खरेदी बंद केल्यामुळे बाजारभाव कोसळले असून बळीराजा हतबल झाल्याचे दिसत आहे.

 सिंदखेडराजा :  शेतमालाचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कापूस, सोयाबीन, तूरीला पुरेसा बाजारभाव नाही. उत्पादन खर्चही निघत नसल्याने संसाराचा गाडा कसा चालवावा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. 

स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यां चा गांभीर्याने विचार केला नाही. पाच वर्षांपुर्वी कापसाला ६ ते ७ हजार प्रतीक्विंटलचा बाजारभाव मिळाला होता. तोच कापूस आज ४ ते ५ हजार रुपयापर्यंत विकावा लागत आहे. यावर्षी सिझनमध्ये अडीच हजार ते अठ्ठाविससे रुपये सोयाबीनचे भाव होते. सध्या शेतकऱ्यांजवळील सोयाबीन संपल्यावर २७०० रुपयावर गेले. शासनाने तूर, हरभरा खरेदी बंद केल्यामुळे बाजारभाव कोसळले असून बळीराजा हतबल झाल्याचे दिसत आहे. मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, संसाराचा गाडा चालविताना शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून आत्महत्येचे पाऊल उचलत आहे.

निसर्गाचासुद्धा समतोल ढासळत चालला आहे. कधी अतिवृष्टी, कधी गारपीट तर कधी उघाड पडल्यामुळे नापिकी होऊन शेतकरी त्रस्त आहे. एवढ्या संकटामधून हाती आलेल्या शेतमालाला शासनाच्या आयात निर्यात धोरणाचा फटका बसत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला. राज्यकर्त्यांनी खुर्च्या टिकविण्यासाठी सबसीडीच्या नावावर कांदाचाळ, पीयुसी पाईप, विहिरी, मोटारपंप, शेडनेट, शेततळे देऊन शेतकऱ्यांप्रती मदत देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला. परंतु आजही असंख्य शेतकऱ्यांचे सबसीडीचे पैसे जमा न झाल्याने शेतकरी त्रस्त आहे. केंद्र शासनाने एक वर्षापुर्वी लाखो टन तूरदाळ, चनादाळ, तेल, रुईच्या गाठी, गहू आयात केल्याने शेतीमालाचे बाजारभाव कोसळले असून शेतकऱ्यांच्या शेतमालाला मातीमोल भाव मिळत आहे. उत्पादन खर्च सुद्धा वसुल होत नाही. सात हजारापर्यंत विकल्या गेलेला कापूस आज चार ते पाच हजार रुपयाने विकत आहे. त्यामुळे अनेक शेतकºयांच्या घरात कापूस साठवून आहे. 

 

 तूर खरेदी घटली

गत वर्षी सिंदखेडराजा तालुक्यात ५५ हजार क्विंटल तुरीची खरेदी शासनाने केली. यावर्षी मात्र १०-१२ हजार क्विंटल तूर खरेदी झाली. तर ३० ते ३५ हजार क्विंटल तूर शेतकºयांच्या घरात पडून आहे. सिझनमध्ये २५०० ते २८०० रु. सोयाबीनचे भाव होते. शेतकºयांचे सोयाबीन संपले व सध्या २७०० रुपयाने बाजारभाव वाढले. टोमॅटो ५ रुपये किलोने विकत आहे. कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही वस्तुस्थिती असून शासन शेतकºयांचा विचार कधी करणार हा खरा प्रश्न आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSindkhed Rajaसिंदखेड राजाFarmerशेतकरी