शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

शेती मालाचे बाजारभाव कोसळल्यामुळे बळीराजा हतबल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 17:05 IST

सिंदखेडराजा :  शेतमालाचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कापूस, सोयाबीन, तूरीला पुरेसा बाजारभाव नाही. उत्पादन खर्चही निघत नसल्याने संसाराचा गाडा कसा चालवावा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. 

ठळक मुद्देसात हजारापर्यंत विकल्या गेलेला कापूस आज चार ते पाच हजार रुपयाने विकत आहे. सिझनमध्ये अडीच हजार ते अठ्ठाविससे रुपये सोयाबीनचे भाव होते. सध्या शेतकऱ्यांजवळील सोयाबीन संपल्यावर २७०० रुपयावर गेले.शासनाने तूर, हरभरा खरेदी बंद केल्यामुळे बाजारभाव कोसळले असून बळीराजा हतबल झाल्याचे दिसत आहे.

 सिंदखेडराजा :  शेतमालाचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कापूस, सोयाबीन, तूरीला पुरेसा बाजारभाव नाही. उत्पादन खर्चही निघत नसल्याने संसाराचा गाडा कसा चालवावा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. 

स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यां चा गांभीर्याने विचार केला नाही. पाच वर्षांपुर्वी कापसाला ६ ते ७ हजार प्रतीक्विंटलचा बाजारभाव मिळाला होता. तोच कापूस आज ४ ते ५ हजार रुपयापर्यंत विकावा लागत आहे. यावर्षी सिझनमध्ये अडीच हजार ते अठ्ठाविससे रुपये सोयाबीनचे भाव होते. सध्या शेतकऱ्यांजवळील सोयाबीन संपल्यावर २७०० रुपयावर गेले. शासनाने तूर, हरभरा खरेदी बंद केल्यामुळे बाजारभाव कोसळले असून बळीराजा हतबल झाल्याचे दिसत आहे. मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, संसाराचा गाडा चालविताना शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून आत्महत्येचे पाऊल उचलत आहे.

निसर्गाचासुद्धा समतोल ढासळत चालला आहे. कधी अतिवृष्टी, कधी गारपीट तर कधी उघाड पडल्यामुळे नापिकी होऊन शेतकरी त्रस्त आहे. एवढ्या संकटामधून हाती आलेल्या शेतमालाला शासनाच्या आयात निर्यात धोरणाचा फटका बसत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला. राज्यकर्त्यांनी खुर्च्या टिकविण्यासाठी सबसीडीच्या नावावर कांदाचाळ, पीयुसी पाईप, विहिरी, मोटारपंप, शेडनेट, शेततळे देऊन शेतकऱ्यांप्रती मदत देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला. परंतु आजही असंख्य शेतकऱ्यांचे सबसीडीचे पैसे जमा न झाल्याने शेतकरी त्रस्त आहे. केंद्र शासनाने एक वर्षापुर्वी लाखो टन तूरदाळ, चनादाळ, तेल, रुईच्या गाठी, गहू आयात केल्याने शेतीमालाचे बाजारभाव कोसळले असून शेतकऱ्यांच्या शेतमालाला मातीमोल भाव मिळत आहे. उत्पादन खर्च सुद्धा वसुल होत नाही. सात हजारापर्यंत विकल्या गेलेला कापूस आज चार ते पाच हजार रुपयाने विकत आहे. त्यामुळे अनेक शेतकºयांच्या घरात कापूस साठवून आहे. 

 

 तूर खरेदी घटली

गत वर्षी सिंदखेडराजा तालुक्यात ५५ हजार क्विंटल तुरीची खरेदी शासनाने केली. यावर्षी मात्र १०-१२ हजार क्विंटल तूर खरेदी झाली. तर ३० ते ३५ हजार क्विंटल तूर शेतकºयांच्या घरात पडून आहे. सिझनमध्ये २५०० ते २८०० रु. सोयाबीनचे भाव होते. शेतकºयांचे सोयाबीन संपले व सध्या २७०० रुपयाने बाजारभाव वाढले. टोमॅटो ५ रुपये किलोने विकत आहे. कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही वस्तुस्थिती असून शासन शेतकºयांचा विचार कधी करणार हा खरा प्रश्न आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSindkhed Rajaसिंदखेड राजाFarmerशेतकरी