शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शेती मालाचे बाजारभाव कोसळल्यामुळे बळीराजा हतबल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 17:05 IST

सिंदखेडराजा :  शेतमालाचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कापूस, सोयाबीन, तूरीला पुरेसा बाजारभाव नाही. उत्पादन खर्चही निघत नसल्याने संसाराचा गाडा कसा चालवावा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. 

ठळक मुद्देसात हजारापर्यंत विकल्या गेलेला कापूस आज चार ते पाच हजार रुपयाने विकत आहे. सिझनमध्ये अडीच हजार ते अठ्ठाविससे रुपये सोयाबीनचे भाव होते. सध्या शेतकऱ्यांजवळील सोयाबीन संपल्यावर २७०० रुपयावर गेले.शासनाने तूर, हरभरा खरेदी बंद केल्यामुळे बाजारभाव कोसळले असून बळीराजा हतबल झाल्याचे दिसत आहे.

 सिंदखेडराजा :  शेतमालाचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कापूस, सोयाबीन, तूरीला पुरेसा बाजारभाव नाही. उत्पादन खर्चही निघत नसल्याने संसाराचा गाडा कसा चालवावा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. 

स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यां चा गांभीर्याने विचार केला नाही. पाच वर्षांपुर्वी कापसाला ६ ते ७ हजार प्रतीक्विंटलचा बाजारभाव मिळाला होता. तोच कापूस आज ४ ते ५ हजार रुपयापर्यंत विकावा लागत आहे. यावर्षी सिझनमध्ये अडीच हजार ते अठ्ठाविससे रुपये सोयाबीनचे भाव होते. सध्या शेतकऱ्यांजवळील सोयाबीन संपल्यावर २७०० रुपयावर गेले. शासनाने तूर, हरभरा खरेदी बंद केल्यामुळे बाजारभाव कोसळले असून बळीराजा हतबल झाल्याचे दिसत आहे. मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, संसाराचा गाडा चालविताना शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून आत्महत्येचे पाऊल उचलत आहे.

निसर्गाचासुद्धा समतोल ढासळत चालला आहे. कधी अतिवृष्टी, कधी गारपीट तर कधी उघाड पडल्यामुळे नापिकी होऊन शेतकरी त्रस्त आहे. एवढ्या संकटामधून हाती आलेल्या शेतमालाला शासनाच्या आयात निर्यात धोरणाचा फटका बसत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला. राज्यकर्त्यांनी खुर्च्या टिकविण्यासाठी सबसीडीच्या नावावर कांदाचाळ, पीयुसी पाईप, विहिरी, मोटारपंप, शेडनेट, शेततळे देऊन शेतकऱ्यांप्रती मदत देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला. परंतु आजही असंख्य शेतकऱ्यांचे सबसीडीचे पैसे जमा न झाल्याने शेतकरी त्रस्त आहे. केंद्र शासनाने एक वर्षापुर्वी लाखो टन तूरदाळ, चनादाळ, तेल, रुईच्या गाठी, गहू आयात केल्याने शेतीमालाचे बाजारभाव कोसळले असून शेतकऱ्यांच्या शेतमालाला मातीमोल भाव मिळत आहे. उत्पादन खर्च सुद्धा वसुल होत नाही. सात हजारापर्यंत विकल्या गेलेला कापूस आज चार ते पाच हजार रुपयाने विकत आहे. त्यामुळे अनेक शेतकºयांच्या घरात कापूस साठवून आहे. 

 

 तूर खरेदी घटली

गत वर्षी सिंदखेडराजा तालुक्यात ५५ हजार क्विंटल तुरीची खरेदी शासनाने केली. यावर्षी मात्र १०-१२ हजार क्विंटल तूर खरेदी झाली. तर ३० ते ३५ हजार क्विंटल तूर शेतकºयांच्या घरात पडून आहे. सिझनमध्ये २५०० ते २८०० रु. सोयाबीनचे भाव होते. शेतकºयांचे सोयाबीन संपले व सध्या २७०० रुपयाने बाजारभाव वाढले. टोमॅटो ५ रुपये किलोने विकत आहे. कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही वस्तुस्थिती असून शासन शेतकºयांचा विचार कधी करणार हा खरा प्रश्न आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSindkhed Rajaसिंदखेड राजाFarmerशेतकरी